शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
3
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
4
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
5
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
6
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
7
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
8
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
9
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
10
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
11
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
12
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
13
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
14
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
15
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
16
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
17
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
18
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
20
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना

मुर्शी चेक पोस्टवर स्थानिक वाहनचालकांना दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:34 IST

देवरुख : रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाट अवजड वाहनांसाठी बंद आहे. तब्बल दीड महिना झाला ...

देवरुख : रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाट अवजड वाहनांसाठी बंद आहे. तब्बल दीड महिना झाला तरी हा मार्ग मोकळा करण्यात आला नाही. आता केवळ हलक्या वाहनांची येथून ये-जा सुरू आहे. मुर्शी साखरपा येथे पोलीस चेकपोस्ट येथे सहाचाकी वाहने कोल्हापूरच्या दिशेने घेऊन जाण्यास पोलिसांकडून अटकाव केला जातो. मात्र, रात्री पैसे घेऊन काही वाहने सोडण्यात येतात, असा आरोप स्थानिक वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

आंबा घाट येथे घाट वाहतुकीस बंद असल्याबाबत सूचना देणारे माहिती फलक किंवा कोणीही पोलीस कर्मचारी तैनात केलेला नाही. त्यामुळे बाहेरील मोठ-मोठी अवजड वाहने थेट मुर्शी साखरप्यापर्यंत बिनदिक्कतपणे येतात. साखरपा येथे घाटातून आलेल्या वाहनांवर केवळ जुजबी दंडाची कारवाई करून त्यांना सोडून दिले जाते. पाचशे रुपये दंड आकारून अवजड वाहने सोडली जातात. त्यामुळे स्थानिक वाहनांनासुद्धा मालवाहतुकीस परवानगी दिली जावी, अशी मागणी आहे.

तालुक्यातील चाळीसहून अधिक वाहनधारकांनी सोमवारी साखरपा पोलीस चेकपोस्ट येथे धडक दिली. जर अवजड मालवाहतुकीला परवानगी देण्यात आली नाही, तर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी संगमेश्वर तालुका शेतकरी लाकूड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण जाधव, उमेश गांधी, योगेश चव्हाण, ओंकार सुर्वे, महेश पाटील, योगेश केतकर, राजन मोहिरे यांच्यासह साखरपा, देवरूख विभागातील वाहनधारक उपस्थित होते.

200921\343855161735-img-20210920-wa0033.jpg~200921\34385517img-20210920-wa0034.jpg

फलक मुर्शी~या सारखी अनेक अवजड वाहने साखरपा येथे पोलीसांकडुन 500रुपये जुजबी दंड घेऊन सोडुन दिली