शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

कारच्या धडकेने सहाजणी जखमी

By admin | Updated: May 29, 2014 00:43 IST

जखमींमध्ये पाच विद्यार्थिनी, एक गंभीर

रत्नागिरी : शहरातील गोेगटे जोगळेकर महाविद्यालयाजवळ एका 'ुंदाई कारने (क्र. एमएच०८ झेड ३५३२) रस्त्याच्या कडेने चालणार्‍या ५ विद्यार्थिनींसह सहा जणींना धडक दिली. त्यात उर्वी उदय पैठणकर (२०, रा. मालाड, मुंबई, सध्या रा.रत्नागिरी) ही गंभीर जखमी झाली असून उपचारासाठी रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. उर्वी ही मुंबईत शिक्षण घेत असून ती आपल्या आईला घेऊन महाविद्यालयात आली होती. त्यानंतर आपल्या अन्य मैत्रिणी व आईसह ती परत निघाली असता महाविद्यालयाजवळील मुलींच्या वसतीगृहाजवळ एका कारने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात उर्वी हिच्या उजव्या पायाला व उजव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. तिच्यासमवेत गाडीने धडक दिल्याने उत्सवी विलास नार्वेकर (२०, रत्नागिरी), अनुप्रिता पवार, कार्तिकी पिलणकर, उर्वीची आई रेखा व फगरे अशा पाचजणी किरकोळ जखमी झाल्या. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यात रत्नागिरीत वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यातच अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. बेदरकारपणे गाड्या चालविणार्‍यांमुळेच अपघात वाढल्याची चर्चा असून याबाबत उपप्रादेशिक परिवहन खात्याने, वाहतूक पोलिसांनी मोहीम राबविण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)