शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

लोककलावंतांना मदत करण्याचा उपक्रम कौतुकास्पद : अनिल लाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:42 IST

रत्नागिरी : लोककलावंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. कोरोनाकाळात पत्रकारांनी महत्त्वाची भूमिका बाजवली आहे. पत्रकारिता करतानाच ...

रत्नागिरी : लोककलावंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. कोरोनाकाळात पत्रकारांनी महत्त्वाची भूमिका बाजवली आहे. पत्रकारिता करतानाच सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारांनी लोककलावंताना मदत करण्याचा केलेला प्रयत्न प्रोत्साहन देणार ठरेल, असे प्रतिपादन रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी केले.

सोमवारी माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

आधार प्रतिष्ठान आयोजित पत्रकार आणि मित्र व पल्लवी फाउंडेशनच्या विद्यमाने रत्नागिरीतील ३०० गरजू लोककलावंताना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत, संदीप तावडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, सचिव राजेश कळंबटे, पत्रकार विजय पाडावे, राकेश गुडेकर, तन्मय दाते, गुरुप्रसाद सावंत, गणेश भिंगार्डे, सूरज आयरे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातील प्रतिष्ठानचे सचिव राजेश कळंबटे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर लोककलावंतांना मदत करण्याच्या कार्यक्रमाचे स्वरूप उपस्थितांसमोर मांडले. नमन, जाखडी या कोकणच्या प्रमुख लोककला. या पाहण्यासाठी देशासह परदेशातील पर्यटक येथे येतात. गावेगावच्या लोककलावंतांनी ही कला जिवंत ठेवली आहे. गेली दोन वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे प्रत्येकजण अडचणीत आहे. आपले लोककलावंत शेतकरी, शेती करून कुटुंब चालवतात. त्यातूनच आपली लोककला जिवंत ठेवतात. त्यांना खारीचा वाटा म्हणून मदत करण्यासाठी मुंबईतील पत्रकार व मित्र, पल्लवी फाउंडेशन पुढे आले आहे. राज्यातील गरजू लोककलावंताना मदत करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. रत्नागिरीत आधार प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांची भेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असल्याचे कळंबटे यांनी सांगितले.

यावेळी जाखडी, नमन मंडळाच्या प्रतिनिधींना प्रातिनिधिक स्वरूपात पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी सोमेश्वर नाट्य नमन मंडळ वांद्री, संगमेश्वरी बाज आदी मंडळाच्या प्रतिनिधींना साहित्याचे वाटप करण्यात आले.