शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

लोटे येथील वीज उपकेंद्र जळाल्याने उद्योग ठप्प

By admin | Updated: March 12, 2015 00:06 IST

लाखोंची हानी : ४० गावांतील पुरवठा खंडित; साडेसात हजार ग्राहक अंधारात

आवाशी : खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीसह परिसरातील ४० गावांना वीजपुरवठा करणारे उपकेंद्र मंगळवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे जळाले. त्यामुळे वसाहतीसह जवळपास साडेसात हजार वीज ग्राहक अंधारात बुडाले आणि ४० हून अधिक कारखाने ठप्प झाले. त्यामुळे कारखान्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. केवळ आठ ते दहा मोठ्या कंपन्याच स्वत:ची पर्यायी सुविधा वापरून सुरू होत्या.वीज उपकेंद्रातून अनेक दिवसांपासून सतत वीजपुरवठा खंडित होणे, नैसर्गिक आपत्तीवेळी दिवसभर वीजपुरवठा बंद ठेवणे, अनेकदा ट्रान्स्फॉर्मर जळणे, वीजवाहिन्या तुटणे, सोमवारी पूर्ण दिवस वीजपुरवठा बंद ठेवणे अशा अनेक तक्रारींनी नागरिकांसह लघु उद्योजक त्रस्त आहेत. त्यातच मंगळवारी रात्री लोटे येथील वीज उपकेंद्र जळाले. त्यामुळे या समस्यांमध्ये आणखीनच भर पडली आहे.काळोखात बुडालेल्या ४० गावांपैकी काही गावांना वीजपुरवठा करण्याचा प्रयत्न उशिरापर्यंत सुरू होता. उर्वरित ग्राहकांची समस्या उद्या, गुरुवारी सायंकाळपर्यंत मिटण्याची शक्यता महावितरणने व्यक्त केली आहे. पॅनल व उच्च दाबाच्या तारा जळाल्या आहेत. त्या उपलब्ध नसल्याने रत्नागिरी वा अन्य ठिकाणाहून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रात्री वीज खंडित झाल्यापासून औद्योगिक कंपन्यांचे बरेच हाल झाले. लघु आणि मध्यम कारखाने सकाळच्या शिफ्टपासून सुरू होतात. मात्र, वीज नसल्यामुळे ४० हून अधिक कारखाने बंद राहिले. कर्मचारी कामावर हजर झाले. मात्र, वीज नसल्यामुळे त्यांना बसूनच राहावे लागले. वीजपुरवठा लवकर सुरू व्हावा, यासाठी अनेक कंपन्यांचे अधिकारी महावितरण कंपनीच्या मदतीला धावले.एक पूर्ण दिवस कामकाज बंदच राहिल्यामुळे कंपन्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तीनही शिफ्टमध्ये काम करणाऱ्या आठ ते दहा मोठ्या कंपन्यांची स्वत:ची पर्यायी व्यवस्था असल्यामुळे त्यांचे कामकाज ठप्प झाले नाही. मात्र, त्यांनाही या प्रकाराची झळ बसली आहे. (वार्ताहर)उंदराने केला प्रतापमध्यरात्री एक वाजता येथील कंट्रोल पॅनलमध्ये उंदीर शिरल्याने शॉर्टसर्किट होऊन संपूर्ण पॅनल जळाले. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले. मोबाईल चार्जिंगसाठी धावाधाववीज खंडित झाल्यामुळे मोबाईलधारकांची पंचाईत झाली. अनेकांनी आपले ‘डिस्चार्ज’ झालेले मोबाईल घेऊन बँका-पतसंस्थांमध्ये धाव घेतली. बँका-पतसंस्थांमध्ये इन्व्हर्टर सुविधा असल्यामुळे तेथे आपल्या ओळखीच्या लोकांना मोबाईल चार्ज करण्यासाठी विनंती केली जात होती.काही कंपन्यांनी तशा प्रकारची सामग्री व मनुष्यबळ देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यास औद्योगिक संघटनेने प्राधान्य दिले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने वसाहतीसह परिसरातील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली असून, बुधवारी सायंकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल. - प्रशांत पटवर्धन, औद्योगिक संघटना अध्यक्ष