शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

अर्थचक्रासाठी औद्योगिकरण हवे अन् लोकांची सुरक्षितताही हवीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:30 IST

सुनील आंब्रे लोकमत न्यूज नेटवर्क आवाशी : औद्योगिकरणामुळे येणारी असुरक्षितता नकोशी झाली असली तरी हजारो कुटुंबांच्या आर्थिक स्थितीत बदल ...

सुनील आंब्रे

लोकमत न्यूज नेटवर्क

आवाशी : औद्योगिकरणामुळे येणारी असुरक्षितता नकोशी झाली असली तरी हजारो कुटुंबांच्या आर्थिक स्थितीत बदल घडवणारे, स्थानिक अर्थकारणाला गती देणारे कारखानेही हवेच आहेत. अशावेळी गरज आहे ती सक्षम यंत्रणा उभारण्याची आणि यंत्रणांनी सक्षम राहण्याची. सुरक्षेचे निकष कंपन्यांकडून पाळले जात आहेत की नाहीत, याची कडक तपासणी व्हावी आणि जिथे चूक असले तिथे कडक कारवाईही व्हावी, तरच सुरक्षितता आणि अर्थकारण यात सुवर्णमध्य साधला जाईल.

लोटे येथे महामार्गालगतच उजाड माळरानावर एक एक कारखाना उभा राहिला आणि आता खूप मोठी औद्योगिक वसाहत निर्माण झाली आहे. १९८५/८६ साली या वसाहतीमध्ये कारखाने दाखल होण्यास सुरुवात झाली. त्याआधी या परिसरात शेती हाच मुख्य व्यवसाय होता. कारखान्यांनी अर्थकारणाला गती दिली. लोकांच्या हाताला काम दिले. साहजिकच परिसरात सुबत्ता आली. छोटे-मोठे व्यवसाय उभे राहिले. शिक्षण, आरोग्य सुविधा, महिला सक्षमीकरण या क्षेत्रात औद्योगिकरणामुळेच मोठा बदल झाला आहे. उच्च माध्यमिक विद्यालयापासून अभियांत्रिकीपर्यंतचे शिक्षण देणाऱ्या या वसाहतीचा लाभ केवळ रत्नागिरीच नाही तर लगतच्या जिल्ह्यांमध्येही होत आहे.

एका बाजूला या कंपन्यांमुळे निर्माण झालेला असुरक्षितपणा आहे, या कंपन्यांमधील स्फोटांमुळे, अपघातांमुळे होणारे नुकसान आहे, तर दुसऱ्या बाजूला या कंपन्यांमुळे अर्थकारण, सामाजिक, शैक्षणिक सकारात्मक बदल आहेत. असुरक्षितपणा आहे म्हणून कंपन्या नाकारणे तोट्याचे आहे आणि फायदा होत आहे म्हणून आहे ती परिस्थिती जशीच्या तशी स्वीकारणेही तोट्याचे आहे. त्यामुळे यातून सुवर्णमध्य काढणे गरजेचे आहे. कंपन्या टिकायला हव्यात आणि या परिसरातील लोकांचे आरोग्यही टिकायला हवे. त्यासाठी कंपन्यांच्या सुरक्षिततेसाठी काम करणाऱ्या यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. लोटे भागात रासायनिक कारखाने असल्याने या यंत्रणा लोटेमध्येच कार्यरत असणेही गरजेचे आहे. या यंत्रणांनी नि:पक्षपाती काम करावे, यासाठी त्यांच्यावर राजकीय दबावही तेवढाच गरजेचा आहे.

उद्योग टिकले तर रोजगार कायम राहील आणि माणसे टिकली तर उद्योगांना कामगार, कर्मचारी मिळत राहतील. या दोन्ही गोष्टी परस्पर पूरक आहेत. जर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणा सक्षम असतील तर अपघातांचे प्रसंग कमीत कमी करण्यावर भर दिला जाऊ शकतो आणि त्याने असुरक्षितपणाचे ओझे काहीसे कमी होऊ शकते.

(समाप्त)

..................................

आरोग्य सुविधाही मिळाल्या

येथील काही कंपन्यांनी गावागावात आरोग्य केंद्रे उभारली आहेत. तेथे स्थानिकांना मोफत औषधोपचार केला जातो. जीवघेण्या आजारावर मोठ्या रुग्णालयात जाऊन उपचार घेण्यासाठी स्थानिकांना कंपन्यांकडून अर्थसाह्यही केले जाते. काही कंपन्यांनी महिला सक्षमीकरणावर भर दिला असून, महिला स्वावलंबी व्हाव्यात, यासाठी विविध प्रशिक्षणे, शिबिरे घेतली जात आहेत. ही बाब सीएसआर फंडातून करणे अनिवार्य असले तरी त्याचा खूप मोठा सकारात्मक परिणाम या परिसरावर झाला आहे.