शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
3
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
5
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
6
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
7
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
8
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
9
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
10
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
11
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
12
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
13
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
14
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
15
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
16
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
17
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
18
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
19
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
20
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?

अर्थचक्रासाठी औद्योगिकरण हवे अन् लोकांची सुरक्षितताही हवीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:30 IST

सुनील आंब्रे लोकमत न्यूज नेटवर्क आवाशी : औद्योगिकरणामुळे येणारी असुरक्षितता नकोशी झाली असली तरी हजारो कुटुंबांच्या आर्थिक स्थितीत बदल ...

सुनील आंब्रे

लोकमत न्यूज नेटवर्क

आवाशी : औद्योगिकरणामुळे येणारी असुरक्षितता नकोशी झाली असली तरी हजारो कुटुंबांच्या आर्थिक स्थितीत बदल घडवणारे, स्थानिक अर्थकारणाला गती देणारे कारखानेही हवेच आहेत. अशावेळी गरज आहे ती सक्षम यंत्रणा उभारण्याची आणि यंत्रणांनी सक्षम राहण्याची. सुरक्षेचे निकष कंपन्यांकडून पाळले जात आहेत की नाहीत, याची कडक तपासणी व्हावी आणि जिथे चूक असले तिथे कडक कारवाईही व्हावी, तरच सुरक्षितता आणि अर्थकारण यात सुवर्णमध्य साधला जाईल.

लोटे येथे महामार्गालगतच उजाड माळरानावर एक एक कारखाना उभा राहिला आणि आता खूप मोठी औद्योगिक वसाहत निर्माण झाली आहे. १९८५/८६ साली या वसाहतीमध्ये कारखाने दाखल होण्यास सुरुवात झाली. त्याआधी या परिसरात शेती हाच मुख्य व्यवसाय होता. कारखान्यांनी अर्थकारणाला गती दिली. लोकांच्या हाताला काम दिले. साहजिकच परिसरात सुबत्ता आली. छोटे-मोठे व्यवसाय उभे राहिले. शिक्षण, आरोग्य सुविधा, महिला सक्षमीकरण या क्षेत्रात औद्योगिकरणामुळेच मोठा बदल झाला आहे. उच्च माध्यमिक विद्यालयापासून अभियांत्रिकीपर्यंतचे शिक्षण देणाऱ्या या वसाहतीचा लाभ केवळ रत्नागिरीच नाही तर लगतच्या जिल्ह्यांमध्येही होत आहे.

एका बाजूला या कंपन्यांमुळे निर्माण झालेला असुरक्षितपणा आहे, या कंपन्यांमधील स्फोटांमुळे, अपघातांमुळे होणारे नुकसान आहे, तर दुसऱ्या बाजूला या कंपन्यांमुळे अर्थकारण, सामाजिक, शैक्षणिक सकारात्मक बदल आहेत. असुरक्षितपणा आहे म्हणून कंपन्या नाकारणे तोट्याचे आहे आणि फायदा होत आहे म्हणून आहे ती परिस्थिती जशीच्या तशी स्वीकारणेही तोट्याचे आहे. त्यामुळे यातून सुवर्णमध्य काढणे गरजेचे आहे. कंपन्या टिकायला हव्यात आणि या परिसरातील लोकांचे आरोग्यही टिकायला हवे. त्यासाठी कंपन्यांच्या सुरक्षिततेसाठी काम करणाऱ्या यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. लोटे भागात रासायनिक कारखाने असल्याने या यंत्रणा लोटेमध्येच कार्यरत असणेही गरजेचे आहे. या यंत्रणांनी नि:पक्षपाती काम करावे, यासाठी त्यांच्यावर राजकीय दबावही तेवढाच गरजेचा आहे.

उद्योग टिकले तर रोजगार कायम राहील आणि माणसे टिकली तर उद्योगांना कामगार, कर्मचारी मिळत राहतील. या दोन्ही गोष्टी परस्पर पूरक आहेत. जर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणा सक्षम असतील तर अपघातांचे प्रसंग कमीत कमी करण्यावर भर दिला जाऊ शकतो आणि त्याने असुरक्षितपणाचे ओझे काहीसे कमी होऊ शकते.

(समाप्त)

..................................

आरोग्य सुविधाही मिळाल्या

येथील काही कंपन्यांनी गावागावात आरोग्य केंद्रे उभारली आहेत. तेथे स्थानिकांना मोफत औषधोपचार केला जातो. जीवघेण्या आजारावर मोठ्या रुग्णालयात जाऊन उपचार घेण्यासाठी स्थानिकांना कंपन्यांकडून अर्थसाह्यही केले जाते. काही कंपन्यांनी महिला सक्षमीकरणावर भर दिला असून, महिला स्वावलंबी व्हाव्यात, यासाठी विविध प्रशिक्षणे, शिबिरे घेतली जात आहेत. ही बाब सीएसआर फंडातून करणे अनिवार्य असले तरी त्याचा खूप मोठा सकारात्मक परिणाम या परिसरावर झाला आहे.