शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

अर्थचक्रासाठी औद्योगिकरण हवे अन् लोकांची सुरक्षितताही हवीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:30 IST

सुनील आंब्रे लोकमत न्यूज नेटवर्क आवाशी : औद्योगिकरणामुळे येणारी असुरक्षितता नकोशी झाली असली तरी हजारो कुटुंबांच्या आर्थिक स्थितीत बदल ...

सुनील आंब्रे

लोकमत न्यूज नेटवर्क

आवाशी : औद्योगिकरणामुळे येणारी असुरक्षितता नकोशी झाली असली तरी हजारो कुटुंबांच्या आर्थिक स्थितीत बदल घडवणारे, स्थानिक अर्थकारणाला गती देणारे कारखानेही हवेच आहेत. अशावेळी गरज आहे ती सक्षम यंत्रणा उभारण्याची आणि यंत्रणांनी सक्षम राहण्याची. सुरक्षेचे निकष कंपन्यांकडून पाळले जात आहेत की नाहीत, याची कडक तपासणी व्हावी आणि जिथे चूक असले तिथे कडक कारवाईही व्हावी, तरच सुरक्षितता आणि अर्थकारण यात सुवर्णमध्य साधला जाईल.

लोटे येथे महामार्गालगतच उजाड माळरानावर एक एक कारखाना उभा राहिला आणि आता खूप मोठी औद्योगिक वसाहत निर्माण झाली आहे. १९८५/८६ साली या वसाहतीमध्ये कारखाने दाखल होण्यास सुरुवात झाली. त्याआधी या परिसरात शेती हाच मुख्य व्यवसाय होता. कारखान्यांनी अर्थकारणाला गती दिली. लोकांच्या हाताला काम दिले. साहजिकच परिसरात सुबत्ता आली. छोटे-मोठे व्यवसाय उभे राहिले. शिक्षण, आरोग्य सुविधा, महिला सक्षमीकरण या क्षेत्रात औद्योगिकरणामुळेच मोठा बदल झाला आहे. उच्च माध्यमिक विद्यालयापासून अभियांत्रिकीपर्यंतचे शिक्षण देणाऱ्या या वसाहतीचा लाभ केवळ रत्नागिरीच नाही तर लगतच्या जिल्ह्यांमध्येही होत आहे.

एका बाजूला या कंपन्यांमुळे निर्माण झालेला असुरक्षितपणा आहे, या कंपन्यांमधील स्फोटांमुळे, अपघातांमुळे होणारे नुकसान आहे, तर दुसऱ्या बाजूला या कंपन्यांमुळे अर्थकारण, सामाजिक, शैक्षणिक सकारात्मक बदल आहेत. असुरक्षितपणा आहे म्हणून कंपन्या नाकारणे तोट्याचे आहे आणि फायदा होत आहे म्हणून आहे ती परिस्थिती जशीच्या तशी स्वीकारणेही तोट्याचे आहे. त्यामुळे यातून सुवर्णमध्य काढणे गरजेचे आहे. कंपन्या टिकायला हव्यात आणि या परिसरातील लोकांचे आरोग्यही टिकायला हवे. त्यासाठी कंपन्यांच्या सुरक्षिततेसाठी काम करणाऱ्या यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. लोटे भागात रासायनिक कारखाने असल्याने या यंत्रणा लोटेमध्येच कार्यरत असणेही गरजेचे आहे. या यंत्रणांनी नि:पक्षपाती काम करावे, यासाठी त्यांच्यावर राजकीय दबावही तेवढाच गरजेचा आहे.

उद्योग टिकले तर रोजगार कायम राहील आणि माणसे टिकली तर उद्योगांना कामगार, कर्मचारी मिळत राहतील. या दोन्ही गोष्टी परस्पर पूरक आहेत. जर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणा सक्षम असतील तर अपघातांचे प्रसंग कमीत कमी करण्यावर भर दिला जाऊ शकतो आणि त्याने असुरक्षितपणाचे ओझे काहीसे कमी होऊ शकते.

(समाप्त)

..................................

आरोग्य सुविधाही मिळाल्या

येथील काही कंपन्यांनी गावागावात आरोग्य केंद्रे उभारली आहेत. तेथे स्थानिकांना मोफत औषधोपचार केला जातो. जीवघेण्या आजारावर मोठ्या रुग्णालयात जाऊन उपचार घेण्यासाठी स्थानिकांना कंपन्यांकडून अर्थसाह्यही केले जाते. काही कंपन्यांनी महिला सक्षमीकरणावर भर दिला असून, महिला स्वावलंबी व्हाव्यात, यासाठी विविध प्रशिक्षणे, शिबिरे घेतली जात आहेत. ही बाब सीएसआर फंडातून करणे अनिवार्य असले तरी त्याचा खूप मोठा सकारात्मक परिणाम या परिसरावर झाला आहे.