शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक सुरक्षेचे यंत्र बिघडलेलेच!

By admin | Updated: November 2, 2014 00:49 IST

वाऱ्यावरची वरात : कंपन्या एकीकडे, सुरक्षेचे कार्यालय दुसरीकडेच...

श्रीकांत चाळके, खेड : खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील सुरक्षाव्यवस्था सध्या धोक्यात आली आहे. कंपन्यांमध्ये विविध कारणाने अपघात होत आहेत. कारखान्यांच्या सुरक्षिततेच्या दुुष्टीने या वसाहतीमध्ये कोणतीही सुरक्षा यंत्रणा उभारण्यात आली नाही. यामुळे या अपघातांना आमंत्रण मिळत असल्याचे बोलले जात आहे़ मात्र यामध्ये कामगारांचा हकनाक बळी जात असून औद्योगिक सुरक्षा विभागाचे अधिकारी येथे येऊन नेमके काय करतात? याविषयीच आता शंका उपस्थित होऊ लागले आहे.सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली यंत्रणा आणि तिचे कार्यालय कोल्हापूर येथे असल्याने येथील कंपन्या बेफिकिरपणे काम करीत आहेत. शिवाय येथील उद्योजकांचे पैशासाठी वाट्टेल ते करायची तयारी आहे़ राजकीय पुढारी आपले मोठमोठे ठेके हातून जातील, या भीतीने कंपन्यांविरोधात ब्र काढायला तयार नाहीत़ यामुळे अपघात होऊनही कंपन्यांना जाब विचारण्यास धजावत नाहीत. यामुळे या वसाहतीतील सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ अनेक कामगारांचे हकनाक बळी गेले आहेत़ औद्यौगिक सुरक्षेसाठी असलेले कार्यालय येथे नसल्याने आणि कंपन्यांना विचारणारे कोणी नसल्याने लोटे औद्यौगिक वसाहतीच्या कारखान्यांतील कामगारांचे भवितव्य मात्र टांगणीला लागले आहे.वर्षभरात याच औद्यौगिक वसाहतीतील रत्नागिरी केमिकल्स प्रा. लि. आणि सुप्रिया लाईफसायन्सेस लि़ या कारखान्यात वायूगळती झाली होती़ यातील रत्नागिरी केमिकल्स कंपनीमध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला तर सुप्रिया लाईफसायन्सेसमध्ये १२ कामगारांना वायुबाधा झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करावे लागले होते़ यानंतर आठवडाभरातच याच कंपनीत एका कामगाराच्या अंगावर लोखंडी टाकीचा स्टॅण्ड पडला होता़ यामुळे त्याच्या चेहऱ्यावर रसायन उडाल्याने तो भाजल्याची घटना घडली होती़ याप्रकरणी दोन्ही कंपन्यांच्या मालक आणि व्यवस्थापन आणि आॅपरेटरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़ या घटनेच्या काही महिने अगोदर डॉ़ खान कंपनीत झालेल्या शक्तिशाली स्फोटात ३ कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता.वर्षभरात अशा अनेक आगीच्या आणि स्फोटाच्या घटना घडत असताना जखमी व मृत कामगारांची यादी मात्र वाढतच चालली आहे. याला मानवी चुका आणि तांत्रिक दोषदेखील जबाबदार आहेत़ तरीदेखील औद्यौगिक सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते कोल्हापूर येथील पथक अद्याप सुस्तच आहे. कारखान्यांच्या तपासणीसाठी वारंवार येत असलेले हे अधिकारी नेमके काय करतात? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मोठमोठे अपघात घडूनही हे अधिकारी कंपनीला जबाबदार धरीत नाहीत, तसेच अधिकाऱ्यांना दोषही देत नाहीत़ अनेक कारखान्यांमध्ये आजही सुरक्षेविषयक आवश्यक साधनसामुग्रीचा अभाव आहे.कंपन्यांच्या सांडपाण्याचा प्रश्न आजही गंभीर बनला आहे. या दूषित पाण्यामुळे खाडीतील पाणी प्रदूषित होत असून मासेमारी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. यामुळे येथील कंपन्यांचे भवितव्यदेखील टांगणीला लागले आहे. कमी पगारात येथील अशिक्षित स्थानिक तसेच परप्रांतीय कामगारांना राबवून घेतले जात असून त्यांनाच हे अधिकारी व कंपन्या जबाबदार धरीत आहेत़ लागोपाठ घडत असलेल्या या घटनांच्या पार्श्वभूमीवर कोणालाही कसलेही गांभीर्य नसल्याचे समोर आले आहे़ पंजाब केमिकल कंपनीतील गेल्या दोन वर्षातील स्फोटांची गंभीर समस्या कंपनीसमोर आहेच़ घर्डा कंपनीमध्ये तर अधूनमधून लहानमोठे अपघात घडत असतात़ मात्र या कंपनीने विविध प्रकारच्या अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा उभारल्या आहेत. यामुळे येथील कामगार काहीअंशी सुरक्षित असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे़ औद्यैगिक सुरक्षा व्यवस्थेचे कार्यालय येथे नसल्याने या वसाहतीतील अनेक कंपन्यांवर आजही धोक्याची टांगती तलवार आहे.