शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

औद्योगिक वसाहतीमुळेच हजारो लोकांना मिळाले उत्पन्नाचे साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आवाशी : स्फोट आणि अपघातांमुळे लाेटे औद्योगिक वसाहत असुरक्षित झाली असली, शापदायी झाली असली तरी या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आवाशी : स्फोट आणि अपघातांमुळे लाेटे औद्योगिक वसाहत असुरक्षित झाली असली, शापदायी झाली असली तरी या औद्योगिक वसाहतीमुळेच हजारो लोकांना उत्पन्नाचे साधन मिळाले आहे. कारखानदारीमुळेच मनिऑर्डरवर अवलंबून असलेला हा परिसर स्वयंपूर्ण झाला आहे, हेही सत्य नाकारता येणार नाही.

लाेटेच्या उजाड माळावर १९८६/८७ सालापासून औद्योगिक वसाहत उभी राहू लागली. तोपर्यंत येथील रहिवासी शेतीच्या आधारानेच जगत होते. भातशेती हाच येथील प्रमुख व्यवसाय होता. प्रत्येक गावाच्या प्रत्येक वाडीतील प्रत्येक कुटुंबातील एकतरी व्यक्ती मुंबईत नोकरी करत होती आणि मनिऑर्डर हा जगण्याचा एक आधार होता. शेती आणि चाकरमानी मुंबईकर असेल ते घर सधन म्हणून ओळखले जात होते.

या माळरानावर कारखाने उभे राहू लागले आणि त्यानंतर स्थानिक तरुणांच्या हाताला काम मिळू लागले. ज्यांना मुंबईला जाणे शक्य नव्हते, ज्यांची स्वत:ची फारशी शेती नव्हती, अशा कुटुंबांमधील तरुणांना या कारखान्यांमुळे मोठा आधार मिळाला. काही कंपन्यांनी दहावीपेक्षा कमी शिकलेल्या मुलांनाही कंपन्यांमध्ये सामावून घेतले. त्यामुळे उत्पन्नाचे एस ठोस साधन बहुतांश कुटुंबांकडे आले.

कारखानदारीमुळे आवाशी, गुणदे, शेल्डी, लोटे, पीरलोटे सोनगाव, चिरणी, धामणदेवी, कोतवली, घाणेखुंट, असगणी, आयनी, लवेल, दाभिळ, बोरज या आसपासच्या गावांमधील दहावी पास/नापासांनाही रोजगार मिळू लागला. त्यामुध्ये जुनी नोसिल, एक्सेल, घरडा, यूएसव्ही, हिंदुस्थान युनिलिव्हर, पेठे निहॉन (आताची एम्को), बंद पडलेली सिरीन या कंपन्यांचा उल्लेख करावा लागेल. सुरुवातीच्या काळात मोजक्याच असलेल्या या कंपन्यांमध्ये अनेक गावांतील तरुणांना रोजगार मिळाला. घरच्या घरी राहून काम मिळाल्याने शेती सांभाळणेही त्यांना शक्य झाले.

१९९४/९५पासून या वसाहतीमधील कंपन्यांची संख्या वाढू लागली. येथे कारखाने येण्याचे प्रमाण वाढले. साहजिकच कामगारांची मागणी वाढली. त्यामुळे परिसरातील गावांप्रमाणेच खेड व चिपळूण तालुक्यातील गावांमधील तरुणांना रोजगार मिळाला. केवळ इतकेच नाहीतर, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, मिरज येथील तरुणही नोकरीसाठी या कारखान्यांमध्ये येऊ लागले. आता हा व्याप अजूनच वाढत गेला असल्याने परराज्यातील कामगारांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे या कारखान्यांनी हजारो कुटुंबांना उत्पन्नाचे साधन मिळवून दिले आहे.