शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक वसाहतीमुळेच हजारो लोकांना मिळाले उत्पन्नाचे साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आवाशी : स्फोट आणि अपघातांमुळे लाेटे औद्योगिक वसाहत असुरक्षित झाली असली, शापदायी झाली असली तरी या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आवाशी : स्फोट आणि अपघातांमुळे लाेटे औद्योगिक वसाहत असुरक्षित झाली असली, शापदायी झाली असली तरी या औद्योगिक वसाहतीमुळेच हजारो लोकांना उत्पन्नाचे साधन मिळाले आहे. कारखानदारीमुळेच मनिऑर्डरवर अवलंबून असलेला हा परिसर स्वयंपूर्ण झाला आहे, हेही सत्य नाकारता येणार नाही.

लाेटेच्या उजाड माळावर १९८६/८७ सालापासून औद्योगिक वसाहत उभी राहू लागली. तोपर्यंत येथील रहिवासी शेतीच्या आधारानेच जगत होते. भातशेती हाच येथील प्रमुख व्यवसाय होता. प्रत्येक गावाच्या प्रत्येक वाडीतील प्रत्येक कुटुंबातील एकतरी व्यक्ती मुंबईत नोकरी करत होती आणि मनिऑर्डर हा जगण्याचा एक आधार होता. शेती आणि चाकरमानी मुंबईकर असेल ते घर सधन म्हणून ओळखले जात होते.

या माळरानावर कारखाने उभे राहू लागले आणि त्यानंतर स्थानिक तरुणांच्या हाताला काम मिळू लागले. ज्यांना मुंबईला जाणे शक्य नव्हते, ज्यांची स्वत:ची फारशी शेती नव्हती, अशा कुटुंबांमधील तरुणांना या कारखान्यांमुळे मोठा आधार मिळाला. काही कंपन्यांनी दहावीपेक्षा कमी शिकलेल्या मुलांनाही कंपन्यांमध्ये सामावून घेतले. त्यामुळे उत्पन्नाचे एस ठोस साधन बहुतांश कुटुंबांकडे आले.

कारखानदारीमुळे आवाशी, गुणदे, शेल्डी, लोटे, पीरलोटे सोनगाव, चिरणी, धामणदेवी, कोतवली, घाणेखुंट, असगणी, आयनी, लवेल, दाभिळ, बोरज या आसपासच्या गावांमधील दहावी पास/नापासांनाही रोजगार मिळू लागला. त्यामुध्ये जुनी नोसिल, एक्सेल, घरडा, यूएसव्ही, हिंदुस्थान युनिलिव्हर, पेठे निहॉन (आताची एम्को), बंद पडलेली सिरीन या कंपन्यांचा उल्लेख करावा लागेल. सुरुवातीच्या काळात मोजक्याच असलेल्या या कंपन्यांमध्ये अनेक गावांतील तरुणांना रोजगार मिळाला. घरच्या घरी राहून काम मिळाल्याने शेती सांभाळणेही त्यांना शक्य झाले.

१९९४/९५पासून या वसाहतीमधील कंपन्यांची संख्या वाढू लागली. येथे कारखाने येण्याचे प्रमाण वाढले. साहजिकच कामगारांची मागणी वाढली. त्यामुळे परिसरातील गावांप्रमाणेच खेड व चिपळूण तालुक्यातील गावांमधील तरुणांना रोजगार मिळाला. केवळ इतकेच नाहीतर, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, मिरज येथील तरुणही नोकरीसाठी या कारखान्यांमध्ये येऊ लागले. आता हा व्याप अजूनच वाढत गेला असल्याने परराज्यातील कामगारांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे या कारखान्यांनी हजारो कुटुंबांना उत्पन्नाचे साधन मिळवून दिले आहे.