शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
3
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
4
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
5
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
6
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
7
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
8
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
9
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
10
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
11
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
12
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
13
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
14
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
15
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
16
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
17
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
18
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
19
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
20
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक वसाहतीमुळेच हजारो लोकांना मिळाले उत्पन्नाचे साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आवाशी : स्फोट आणि अपघातांमुळे लाेटे औद्योगिक वसाहत असुरक्षित झाली असली, शापदायी झाली असली तरी या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आवाशी : स्फोट आणि अपघातांमुळे लाेटे औद्योगिक वसाहत असुरक्षित झाली असली, शापदायी झाली असली तरी या औद्योगिक वसाहतीमुळेच हजारो लोकांना उत्पन्नाचे साधन मिळाले आहे. कारखानदारीमुळेच मनिऑर्डरवर अवलंबून असलेला हा परिसर स्वयंपूर्ण झाला आहे, हेही सत्य नाकारता येणार नाही.

लाेटेच्या उजाड माळावर १९८६/८७ सालापासून औद्योगिक वसाहत उभी राहू लागली. तोपर्यंत येथील रहिवासी शेतीच्या आधारानेच जगत होते. भातशेती हाच येथील प्रमुख व्यवसाय होता. प्रत्येक गावाच्या प्रत्येक वाडीतील प्रत्येक कुटुंबातील एकतरी व्यक्ती मुंबईत नोकरी करत होती आणि मनिऑर्डर हा जगण्याचा एक आधार होता. शेती आणि चाकरमानी मुंबईकर असेल ते घर सधन म्हणून ओळखले जात होते.

या माळरानावर कारखाने उभे राहू लागले आणि त्यानंतर स्थानिक तरुणांच्या हाताला काम मिळू लागले. ज्यांना मुंबईला जाणे शक्य नव्हते, ज्यांची स्वत:ची फारशी शेती नव्हती, अशा कुटुंबांमधील तरुणांना या कारखान्यांमुळे मोठा आधार मिळाला. काही कंपन्यांनी दहावीपेक्षा कमी शिकलेल्या मुलांनाही कंपन्यांमध्ये सामावून घेतले. त्यामुळे उत्पन्नाचे एस ठोस साधन बहुतांश कुटुंबांकडे आले.

कारखानदारीमुळे आवाशी, गुणदे, शेल्डी, लोटे, पीरलोटे सोनगाव, चिरणी, धामणदेवी, कोतवली, घाणेखुंट, असगणी, आयनी, लवेल, दाभिळ, बोरज या आसपासच्या गावांमधील दहावी पास/नापासांनाही रोजगार मिळू लागला. त्यामुध्ये जुनी नोसिल, एक्सेल, घरडा, यूएसव्ही, हिंदुस्थान युनिलिव्हर, पेठे निहॉन (आताची एम्को), बंद पडलेली सिरीन या कंपन्यांचा उल्लेख करावा लागेल. सुरुवातीच्या काळात मोजक्याच असलेल्या या कंपन्यांमध्ये अनेक गावांतील तरुणांना रोजगार मिळाला. घरच्या घरी राहून काम मिळाल्याने शेती सांभाळणेही त्यांना शक्य झाले.

१९९४/९५पासून या वसाहतीमधील कंपन्यांची संख्या वाढू लागली. येथे कारखाने येण्याचे प्रमाण वाढले. साहजिकच कामगारांची मागणी वाढली. त्यामुळे परिसरातील गावांप्रमाणेच खेड व चिपळूण तालुक्यातील गावांमधील तरुणांना रोजगार मिळाला. केवळ इतकेच नाहीतर, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, मिरज येथील तरुणही नोकरीसाठी या कारखान्यांमध्ये येऊ लागले. आता हा व्याप अजूनच वाढत गेला असल्याने परराज्यातील कामगारांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे या कारखान्यांनी हजारो कुटुंबांना उत्पन्नाचे साधन मिळवून दिले आहे.