शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

भारताने तीन मुद्द्यांकडे लक्ष द्यायला हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2016 00:20 IST

अनिल काकोडकर : वेळणेश्वर महाविद्यालयात दोन विज्ञान विभागांचे उद्घाटन

गुहागर : भारताला नवीन विकासाची क्षितिजे पादाक्रांत करायची असतील तर भारताने शिक्षण, सुविधा व दळणवळण या तीन मुद्द्यांकडे लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी केले.महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर येथे विद्याप्रसारक मंडळाचे सेंटर फॉर करियर अ‍ॅड स्कील डेव्हलोपमेंट आणि कौन्सिल आॅफ सिनिअर सायंटिस्ट या दोन विभागांचे उद्घाटन काकोडकर व प्रसिध्द उद्योगपती दीपक घैसास यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी काकोडकर म्हणाले की, आज आपण ज्ञान युगात वावरत आहोत. या ज्ञान युगात टिकून राहण्यासाठी प्रक्रिया आधारित दृष्टीकोन व व्यावसायिकता यांचा अंतर्भाव करणे आवश्यक आहे. तसेच शिक्षणाकडे संशोधनात्मक दृष्टीकोनातून पाहणे आवश्यक आहे. शिक्षण, उद्योग, संशोधन यांचा एकत्रित असा दृष्टीकोन म्हणजेच होलिस्टिक अ‍ॅप्रोच अंगिकारला पाहिजे. शैक्षणिक संस्थांनी शिक्षणात हा सकारात्मक बदल करणे अपेक्षित आहे, असे ते म्हणाले.भारतातील बहुसंख्य लोक हे आजही खेडेगावात राहतात. शहरातील बेरोजगारांपेक्षा खेड्यातील सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण हे अधिक आहे. त्यासाठी खेडेगावातच उद्योग व तंत्रज्ञान यांचा विकास करणे आवश्यक आहे, असे काकोडकर म्हणाले. अनुभवी शास्त्रज्ञांचा ग्रामीण भागातील विद्यार्थांना फायदा मिळावा, यासाठी विद्या प्रसारक मंडळाने निर्माण केलेले कौन्सिल आॅफ सिनिअर सायंटिस्ट हा उपक्रम खरोखर स्तुत्य आहे. व्याख्याने, प्रकल्प यांच्या माध्यमातून याचा निश्चितच फायदा होईल. आपण सर्वांनी समाजातील या नवीन तंत्रज्ञानाच्या युगाचा अंगिकार केला पाहिजे, असे ते म्हणाले.या कार्यक्रमप्रसंगी उद्योगपती दीपक घैसास यांनी त्यांच्या अनुभवात आलेल्या अनेक गोष्टींचा उल्लेख करून उद्योग, उद्योजकता व उद्योजक यांच्या विविध पैलूंविषयी माहिती सांगितली. चांगला उद्योजक होण्यासाठी अभिजात कल्पकता असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. प्रास्ताविक विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी केले. शिक्षणामुळे कौशल्य असलेले विद्यार्थी तर घडायला हवेतच, पण सुजाण, सुसंस्कृत नागरिक घडणेही आवश्यक आहे. या कार्यक्रमप्रसंगी विविध विज्ञान शाखांच्या महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी कौन्सिल आॅफ सिनिअर सायंटिस्ट या संकल्पनेचे जनक व विद्या प्रसारक मंडळाचे सचिव जयंत कयाल, नातू प्रतिष्ठानचे संचालक डॉ. विनय नातू, महाविद्यालयाचे संचालक डॉ. कमलाकर देसाई, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शिल्पा कामत उपस्थित होत्या.या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर अभियांत्रिकी शाखेच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थांचे व डॉ. अनिल काकोडकरांचे चर्चा सत्र आयोजित केले होते. बुधवारी दिवसभर विविध वर्षातील अभियांत्रिकी विद्यार्थांसाठी कौन्सिल आॅफ सिनिअर सायंटिस्ट शास्त्रज्ञांची व्याख्याने पार पाडली. या व्याख्यानात डॉ. राजेंद्र आगरकर यांनी आरोग्यविषयक व्याख्यान दिले. (प्रतिनिधी)ज्ञान युगात टिकून राहण्यासाठी प्रक्रिया आधारित दृष्टीकोनाचा अंतर्भाव हवा : काकोडकर.उद्योग, उद्योजकता व उद्योजकांच्या विविध पैलूंविषयी घैसास यांनी दिली माहिती.उद्योजकांसाठी अभिजात कल्पकता हवी : घैसास.