शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
4
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
5
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
6
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
7
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
8
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
9
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
10
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
11
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
12
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
13
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
14
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
15
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
16
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
17
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
18
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
19
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
20
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर

अनलाॅकनंतर भाजीपाल्याचे वाढलेले दर आवाक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी परवानगी देण्यात आली असली तरी कडक निर्बंधामुळे विक्रीवर ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी परवानगी देण्यात आली असली तरी कडक निर्बंधामुळे विक्रीवर परिणाम झाला होता. अनलाॅक करण्यात आल्यानंतरही काही दिवस भाज्यांचे दर वाढलेलेच होते. पावसामुळे भाजीपाला आवक मंदावली असली तरी भाज्यांचे दर बऱ्यापैकी खाली आले आहेत. बटाट्याचे दर स्थिर असले तरी कांदा व टोमॅटोचे दर मात्र खाली आल्याने ग्राहकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

लाॅकडाऊनमुळे कडक निर्बंध असल्याने विक्रीवर परिणाम झाला होता, परंतु अनलाॅकनंतर व्यवहार शिथिल झाले आहेत. भाज्या उपलब्ध होत असून मागणीही वाढली आहे. लाॅकडाऊन काळात तसेच अनलाॅक झाल्यानंतर काही दिवस भाजीचे दर शंभरच्या पटीत होते; मात्र पुन्हा दर हळूहळू खाली येऊ लागल्याने ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

लाॅकडाऊन काळात भाज्यांची उपलब्धता कमी होती, शिवाय दरही भरमसाठ होते. अनलाॅकनंतर सुरुवातीला काही दिवस दर तसेच राहिले मात्र आवक वाढली तसे दर खाली आले. परंतु भाज्यांच्या दरामुळे कंबरडे मोडत असून मोजक्याच भाज्या खरेदी करतो.

- सुनीता कदम, गृहिणी

कुटुंबात जास्त सदस्य असतील तर दरामुळे भाज्या परवडत नाही. अशावेळी कडधान्यांची निवड करावी लागते. मात्र कडधान्यांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे अनेकवेळा भाज्या, उसळी रद्द करून वरणभातावरच भागवावे लागत आहे.

- अनिता पागदे, गृहिणी

लाॅकडाऊन काळात तसेच त्यानंतरही चार-पाच दिवस भाज्यांची आवक अत्यल्प प्रमाणात होत होती. त्यामुळे त्यावेळी घाऊक दरातच वाढ असल्याने किरकोळ विक्रीवर परिणाम झाला होता. पावसामुळे आवक थोडी कमी असली तरी दर मात्र स्थिर आहेत.

- संतोष चव्हाण, विक्रेता

परजिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात भाजीपाला विक्रीसाठी येतो. बाजार समिती आवारात लिलाव झाल्यानंतर भाज्या विक्रीसाठी स्थानिक बाजारात येतात. परगावातून येणाऱ्या भाज्यांचे दर कमी/अधिक असतील त्याप्रमाणेच किरकोळ विक्री करावी लागते.

- दर्शन रोकडे, विक्रेता

मे महिन्यात झालेल्या ‘तौक्ते’ वादळामुळे शेतातील भाजीपाल्याचे नुकसान झाले. त्यानंतर सुरू झालेला पाऊस आतापर्यंत कायम होता. त्यामुळे शेतातील पिकाचे नुकसान झाले. भाज्यांना मागणी असताना वादळाचा फटका बसला आहे.

- रमेश शिंदे, शेतकरी

यावर्षी लांबलेला पाऊस, वादळी वारे, गारपीट यामुळे पिकाचे नुकसान झाले. उत्पादनासाठी केलेला खर्चसुद्धा निघाला नाही. त्यामुळे मागणी असताना, भाज्या उपलब्ध करू शकलो नाही. आर्थिक भुर्दंड मात्र चांगलाच बसला.

- स्वप्नील कुळये, शेतकरी