शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
4
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
5
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
6
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
7
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
8
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
9
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
10
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
11
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
12
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
13
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
14
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
15
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
16
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
17
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
18
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
19
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

अनलाॅकनंतर भाजीपाल्याचे वाढलेले दर आवाक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी परवानगी देण्यात आली असली तरी कडक निर्बंधामुळे विक्रीवर ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी परवानगी देण्यात आली असली तरी कडक निर्बंधामुळे विक्रीवर परिणाम झाला होता. अनलाॅक करण्यात आल्यानंतरही काही दिवस भाज्यांचे दर वाढलेलेच होते. पावसामुळे भाजीपाला आवक मंदावली असली तरी भाज्यांचे दर बऱ्यापैकी खाली आले आहेत. बटाट्याचे दर स्थिर असले तरी कांदा व टोमॅटोचे दर मात्र खाली आल्याने ग्राहकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

लाॅकडाऊनमुळे कडक निर्बंध असल्याने विक्रीवर परिणाम झाला होता, परंतु अनलाॅकनंतर व्यवहार शिथिल झाले आहेत. भाज्या उपलब्ध होत असून मागणीही वाढली आहे. लाॅकडाऊन काळात तसेच अनलाॅक झाल्यानंतर काही दिवस भाजीचे दर शंभरच्या पटीत होते; मात्र पुन्हा दर हळूहळू खाली येऊ लागल्याने ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

लाॅकडाऊन काळात भाज्यांची उपलब्धता कमी होती, शिवाय दरही भरमसाठ होते. अनलाॅकनंतर सुरुवातीला काही दिवस दर तसेच राहिले मात्र आवक वाढली तसे दर खाली आले. परंतु भाज्यांच्या दरामुळे कंबरडे मोडत असून मोजक्याच भाज्या खरेदी करतो.

- सुनीता कदम, गृहिणी

कुटुंबात जास्त सदस्य असतील तर दरामुळे भाज्या परवडत नाही. अशावेळी कडधान्यांची निवड करावी लागते. मात्र कडधान्यांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे अनेकवेळा भाज्या, उसळी रद्द करून वरणभातावरच भागवावे लागत आहे.

- अनिता पागदे, गृहिणी

लाॅकडाऊन काळात तसेच त्यानंतरही चार-पाच दिवस भाज्यांची आवक अत्यल्प प्रमाणात होत होती. त्यामुळे त्यावेळी घाऊक दरातच वाढ असल्याने किरकोळ विक्रीवर परिणाम झाला होता. पावसामुळे आवक थोडी कमी असली तरी दर मात्र स्थिर आहेत.

- संतोष चव्हाण, विक्रेता

परजिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात भाजीपाला विक्रीसाठी येतो. बाजार समिती आवारात लिलाव झाल्यानंतर भाज्या विक्रीसाठी स्थानिक बाजारात येतात. परगावातून येणाऱ्या भाज्यांचे दर कमी/अधिक असतील त्याप्रमाणेच किरकोळ विक्री करावी लागते.

- दर्शन रोकडे, विक्रेता

मे महिन्यात झालेल्या ‘तौक्ते’ वादळामुळे शेतातील भाजीपाल्याचे नुकसान झाले. त्यानंतर सुरू झालेला पाऊस आतापर्यंत कायम होता. त्यामुळे शेतातील पिकाचे नुकसान झाले. भाज्यांना मागणी असताना वादळाचा फटका बसला आहे.

- रमेश शिंदे, शेतकरी

यावर्षी लांबलेला पाऊस, वादळी वारे, गारपीट यामुळे पिकाचे नुकसान झाले. उत्पादनासाठी केलेला खर्चसुद्धा निघाला नाही. त्यामुळे मागणी असताना, भाज्या उपलब्ध करू शकलो नाही. आर्थिक भुर्दंड मात्र चांगलाच बसला.

- स्वप्नील कुळये, शेतकरी