शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

अनलाॅकनंतर भाजीपाल्याचे वाढलेले दर आवाक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी परवानगी देण्यात आली असली तरी कडक निर्बंधामुळे विक्रीवर ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी परवानगी देण्यात आली असली तरी कडक निर्बंधामुळे विक्रीवर परिणाम झाला होता. अनलाॅक करण्यात आल्यानंतरही काही दिवस भाज्यांचे दर वाढलेलेच होते. पावसामुळे भाजीपाला आवक मंदावली असली तरी भाज्यांचे दर बऱ्यापैकी खाली आले आहेत. बटाट्याचे दर स्थिर असले तरी कांदा व टोमॅटोचे दर मात्र खाली आल्याने ग्राहकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

लाॅकडाऊनमुळे कडक निर्बंध असल्याने विक्रीवर परिणाम झाला होता, परंतु अनलाॅकनंतर व्यवहार शिथिल झाले आहेत. भाज्या उपलब्ध होत असून मागणीही वाढली आहे. लाॅकडाऊन काळात तसेच अनलाॅक झाल्यानंतर काही दिवस भाजीचे दर शंभरच्या पटीत होते; मात्र पुन्हा दर हळूहळू खाली येऊ लागल्याने ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

लाॅकडाऊन काळात भाज्यांची उपलब्धता कमी होती, शिवाय दरही भरमसाठ होते. अनलाॅकनंतर सुरुवातीला काही दिवस दर तसेच राहिले मात्र आवक वाढली तसे दर खाली आले. परंतु भाज्यांच्या दरामुळे कंबरडे मोडत असून मोजक्याच भाज्या खरेदी करतो.

- सुनीता कदम, गृहिणी

कुटुंबात जास्त सदस्य असतील तर दरामुळे भाज्या परवडत नाही. अशावेळी कडधान्यांची निवड करावी लागते. मात्र कडधान्यांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे अनेकवेळा भाज्या, उसळी रद्द करून वरणभातावरच भागवावे लागत आहे.

- अनिता पागदे, गृहिणी

लाॅकडाऊन काळात तसेच त्यानंतरही चार-पाच दिवस भाज्यांची आवक अत्यल्प प्रमाणात होत होती. त्यामुळे त्यावेळी घाऊक दरातच वाढ असल्याने किरकोळ विक्रीवर परिणाम झाला होता. पावसामुळे आवक थोडी कमी असली तरी दर मात्र स्थिर आहेत.

- संतोष चव्हाण, विक्रेता

परजिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात भाजीपाला विक्रीसाठी येतो. बाजार समिती आवारात लिलाव झाल्यानंतर भाज्या विक्रीसाठी स्थानिक बाजारात येतात. परगावातून येणाऱ्या भाज्यांचे दर कमी/अधिक असतील त्याप्रमाणेच किरकोळ विक्री करावी लागते.

- दर्शन रोकडे, विक्रेता

मे महिन्यात झालेल्या ‘तौक्ते’ वादळामुळे शेतातील भाजीपाल्याचे नुकसान झाले. त्यानंतर सुरू झालेला पाऊस आतापर्यंत कायम होता. त्यामुळे शेतातील पिकाचे नुकसान झाले. भाज्यांना मागणी असताना वादळाचा फटका बसला आहे.

- रमेश शिंदे, शेतकरी

यावर्षी लांबलेला पाऊस, वादळी वारे, गारपीट यामुळे पिकाचे नुकसान झाले. उत्पादनासाठी केलेला खर्चसुद्धा निघाला नाही. त्यामुळे मागणी असताना, भाज्या उपलब्ध करू शकलो नाही. आर्थिक भुर्दंड मात्र चांगलाच बसला.

- स्वप्नील कुळये, शेतकरी