शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

अनलाॅकनंतर भाजीपाल्याचे वाढलेले दर आवाक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी परवानगी देण्यात आली असली तरी कडक निर्बंधामुळे विक्रीवर ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी परवानगी देण्यात आली असली तरी कडक निर्बंधामुळे विक्रीवर परिणाम झाला होता. अनलाॅक करण्यात आल्यानंतरही काही दिवस भाज्यांचे दर वाढलेलेच होते. पावसामुळे भाजीपाला आवक मंदावली असली तरी भाज्यांचे दर बऱ्यापैकी खाली आले आहेत. बटाट्याचे दर स्थिर असले तरी कांदा व टोमॅटोचे दर मात्र खाली आल्याने ग्राहकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

लाॅकडाऊनमुळे कडक निर्बंध असल्याने विक्रीवर परिणाम झाला होता, परंतु अनलाॅकनंतर व्यवहार शिथिल झाले आहेत. भाज्या उपलब्ध होत असून मागणीही वाढली आहे. लाॅकडाऊन काळात तसेच अनलाॅक झाल्यानंतर काही दिवस भाजीचे दर शंभरच्या पटीत होते; मात्र पुन्हा दर हळूहळू खाली येऊ लागल्याने ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

लाॅकडाऊन काळात भाज्यांची उपलब्धता कमी होती, शिवाय दरही भरमसाठ होते. अनलाॅकनंतर सुरुवातीला काही दिवस दर तसेच राहिले मात्र आवक वाढली तसे दर खाली आले. परंतु भाज्यांच्या दरामुळे कंबरडे मोडत असून मोजक्याच भाज्या खरेदी करतो.

- सुनीता कदम, गृहिणी

कुटुंबात जास्त सदस्य असतील तर दरामुळे भाज्या परवडत नाही. अशावेळी कडधान्यांची निवड करावी लागते. मात्र कडधान्यांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे अनेकवेळा भाज्या, उसळी रद्द करून वरणभातावरच भागवावे लागत आहे.

- अनिता पागदे, गृहिणी

लाॅकडाऊन काळात तसेच त्यानंतरही चार-पाच दिवस भाज्यांची आवक अत्यल्प प्रमाणात होत होती. त्यामुळे त्यावेळी घाऊक दरातच वाढ असल्याने किरकोळ विक्रीवर परिणाम झाला होता. पावसामुळे आवक थोडी कमी असली तरी दर मात्र स्थिर आहेत.

- संतोष चव्हाण, विक्रेता

परजिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात भाजीपाला विक्रीसाठी येतो. बाजार समिती आवारात लिलाव झाल्यानंतर भाज्या विक्रीसाठी स्थानिक बाजारात येतात. परगावातून येणाऱ्या भाज्यांचे दर कमी/अधिक असतील त्याप्रमाणेच किरकोळ विक्री करावी लागते.

- दर्शन रोकडे, विक्रेता

मे महिन्यात झालेल्या ‘तौक्ते’ वादळामुळे शेतातील भाजीपाल्याचे नुकसान झाले. त्यानंतर सुरू झालेला पाऊस आतापर्यंत कायम होता. त्यामुळे शेतातील पिकाचे नुकसान झाले. भाज्यांना मागणी असताना वादळाचा फटका बसला आहे.

- रमेश शिंदे, शेतकरी

यावर्षी लांबलेला पाऊस, वादळी वारे, गारपीट यामुळे पिकाचे नुकसान झाले. उत्पादनासाठी केलेला खर्चसुद्धा निघाला नाही. त्यामुळे मागणी असताना, भाज्या उपलब्ध करू शकलो नाही. आर्थिक भुर्दंड मात्र चांगलाच बसला.

- स्वप्नील कुळये, शेतकरी