शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
3
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
4
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
5
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
6
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
7
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
8
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
9
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
10
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
11
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
12
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
13
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
14
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
15
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
16
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
17
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

शाळांची गुणवत्ता वाढवा

By admin | Updated: October 13, 2015 00:12 IST

ऐश्वर्या घोसाळकर : वालोपे शाळेचा अमृत महोत्सव

चिपळूण : मराठी शाळांच्या कमी होत चाललेल्या पटसंख्येचा विषय चिंंतेची बाब आहे. पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत आहेत. पालकांचा ओढा खासगी शाळांकडे का आहे? हे लक्षात घेऊन मराठी शाळांनी त्याप्रमाणे आपलीही गुणवत्ता वाढवली तर मराठी शाळांची पटसंख्याही वाढेल, असा विश्वास जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समिती सभापती ऐश्वर्या घोसाळकर यांनी व्यक्त केला. चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, वालोपे नं. १चा अमृत महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिपळूण-संगमेश्वरचे आमदार सदानंद चव्हाण होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्वास सुर्वे, शिवसेनेचे पंचायत समितीमधील गटनेते अभय सहस्त्रबुध्दे, पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम, शशिकांत चाळके, गटशिक्षणाधिकारी श्रीधर शिगवण, केंद्रप्रमुख सायली शिंंदे, वालोपेच्या सरपंच मयुरी मूरकर, उपसरपंच रवींद्र तांबिटकर, शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा संदे, प्रेरणा जाधव, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अस्मिता आयरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अशोक आयरे, झोलाईदेवी देवस्थानचे खोत - मानकरी पांडुरंग आयरे, कळंबस्तेच्या सरपंच आशा राक्षे, उपसरपंच विवेक महाडिक, दळवटणेचे सरपंच शेट्ये आदी उपस्थित होते.यावेळी गटनेते अभय सहस्त्रबुध्दे, माजी सभापती शौकतभाई मुकादम, गटशिक्षणाधिकारी श्रीधर शिगवण, केंद्रप्रमुख सायली शिंंदे, पदवीधर शिक्षिका प्रेरणा जाधव, निवृत्त मुख्याध्यापक उदेग, तांबे, तिवरेकर गुरूजीं यांनीही विचार मांडले. प्रास्ताविक करताना अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र तांबिटकर यांनी शाळेच्या पंच्याहत्तर वर्षांच्या कालावधीचा आढावा घेतला. याप्रसंगी सर्व मान्यवरांचा जास्वंदीचे रोप व श्रीफळ देऊन आगळ्या पद्धतीने सत्कार करण्यात आला. अमृत महोत्सव समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन सदानंद चव्हाण व सभापती ऐश्वर्या घोसाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला आर. सी. काळे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रामप्रसाद कान्हेरे, शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक तांबे, उदेग, तिवरेकर, पिंंपुटकर गुरूजी तसेच सावंत, तांबे, पिंंपुटकर, नागेश आदी शिक्षिका, अमृत महोत्सव समितीचे दिलीप मयेकर, मंगेश मुरकर, अंकुश नागवेकर, राजेंद्र टाकळे, विलास पवार, शांताराम जाधव, शंकर जाधव, धोंडिराम कदम, मोहन सुर्वे, सुभाष मयेकर, रविंउदय आयरे, सोनल आयरे, मंगला देवळेकर, प्रिया शिर्के, बाळकृष्ण कदम, सायली जाधव, समृध्दी वालोपकर, प्रभा शिंंदे, गामसेवक गावडे, कृषी सहाय्यक उमा जाधव, दत्ताराम आयरे उपस्थित होते. संदेश पवार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)चिंतेची बाब : शाळांची पटसंख्या वाढेलमराठी शाळांमधून विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत चालली आहे. पालकांचा ओढा खासगी शाळांकडे अधिक आहे. हा ओढा वाढण्याचे नेमके कारण काय आहे? याचा विचार केला पाहिजे. मराठी शाळांनी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ऐश्वर्या घोसाळकर यांनी सांगितले.पटसंख्या रोडावलीजिल्हा परिषद मराठी माध्यमाच्या शाळांमधून पटसंख्या कमी होत चालली आहे. हा चिंतेचा विषय असून, शाळा ओस पडू लागल्या आहेत.