शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

शाळांची गुणवत्ता वाढवा

By admin | Updated: October 13, 2015 00:12 IST

ऐश्वर्या घोसाळकर : वालोपे शाळेचा अमृत महोत्सव

चिपळूण : मराठी शाळांच्या कमी होत चाललेल्या पटसंख्येचा विषय चिंंतेची बाब आहे. पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत आहेत. पालकांचा ओढा खासगी शाळांकडे का आहे? हे लक्षात घेऊन मराठी शाळांनी त्याप्रमाणे आपलीही गुणवत्ता वाढवली तर मराठी शाळांची पटसंख्याही वाढेल, असा विश्वास जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समिती सभापती ऐश्वर्या घोसाळकर यांनी व्यक्त केला. चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, वालोपे नं. १चा अमृत महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिपळूण-संगमेश्वरचे आमदार सदानंद चव्हाण होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्वास सुर्वे, शिवसेनेचे पंचायत समितीमधील गटनेते अभय सहस्त्रबुध्दे, पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम, शशिकांत चाळके, गटशिक्षणाधिकारी श्रीधर शिगवण, केंद्रप्रमुख सायली शिंंदे, वालोपेच्या सरपंच मयुरी मूरकर, उपसरपंच रवींद्र तांबिटकर, शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा संदे, प्रेरणा जाधव, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अस्मिता आयरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अशोक आयरे, झोलाईदेवी देवस्थानचे खोत - मानकरी पांडुरंग आयरे, कळंबस्तेच्या सरपंच आशा राक्षे, उपसरपंच विवेक महाडिक, दळवटणेचे सरपंच शेट्ये आदी उपस्थित होते.यावेळी गटनेते अभय सहस्त्रबुध्दे, माजी सभापती शौकतभाई मुकादम, गटशिक्षणाधिकारी श्रीधर शिगवण, केंद्रप्रमुख सायली शिंंदे, पदवीधर शिक्षिका प्रेरणा जाधव, निवृत्त मुख्याध्यापक उदेग, तांबे, तिवरेकर गुरूजीं यांनीही विचार मांडले. प्रास्ताविक करताना अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र तांबिटकर यांनी शाळेच्या पंच्याहत्तर वर्षांच्या कालावधीचा आढावा घेतला. याप्रसंगी सर्व मान्यवरांचा जास्वंदीचे रोप व श्रीफळ देऊन आगळ्या पद्धतीने सत्कार करण्यात आला. अमृत महोत्सव समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन सदानंद चव्हाण व सभापती ऐश्वर्या घोसाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला आर. सी. काळे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रामप्रसाद कान्हेरे, शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक तांबे, उदेग, तिवरेकर, पिंंपुटकर गुरूजी तसेच सावंत, तांबे, पिंंपुटकर, नागेश आदी शिक्षिका, अमृत महोत्सव समितीचे दिलीप मयेकर, मंगेश मुरकर, अंकुश नागवेकर, राजेंद्र टाकळे, विलास पवार, शांताराम जाधव, शंकर जाधव, धोंडिराम कदम, मोहन सुर्वे, सुभाष मयेकर, रविंउदय आयरे, सोनल आयरे, मंगला देवळेकर, प्रिया शिर्के, बाळकृष्ण कदम, सायली जाधव, समृध्दी वालोपकर, प्रभा शिंंदे, गामसेवक गावडे, कृषी सहाय्यक उमा जाधव, दत्ताराम आयरे उपस्थित होते. संदेश पवार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)चिंतेची बाब : शाळांची पटसंख्या वाढेलमराठी शाळांमधून विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत चालली आहे. पालकांचा ओढा खासगी शाळांकडे अधिक आहे. हा ओढा वाढण्याचे नेमके कारण काय आहे? याचा विचार केला पाहिजे. मराठी शाळांनी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ऐश्वर्या घोसाळकर यांनी सांगितले.पटसंख्या रोडावलीजिल्हा परिषद मराठी माध्यमाच्या शाळांमधून पटसंख्या कमी होत चालली आहे. हा चिंतेचा विषय असून, शाळा ओस पडू लागल्या आहेत.