शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
5
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
6
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
7
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
8
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
9
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
10
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
11
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
12
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
13
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
14
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
15
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
16
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
17
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
18
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
19
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
20
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले

उत्पादकता वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:20 IST

एसटी बंद राजापूर : राजापूर-गोवळ-बुरंबेवाडी मार्गावर पन्हळे येथील मोरी अतिवृष्टीत खचल्याने यामार्गावरील एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे. पंधरा ...

एसटी बंद

राजापूर : राजापूर-गोवळ-बुरंबेवाडी मार्गावर पन्हळे येथील मोरी अतिवृष्टीत खचल्याने यामार्गावरील एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे. पंधरा दिवस उलटूनही मोरीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नसल्याने या मार्गावरील प्रवाशांना खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे.

नेटवर्कअभावी गैरसोय

रत्नागिरी : तालुक्यातील जाकादेवी, खालगाव पंचक्रोशीमध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांपासून भारत संचार व खासगी मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क गायब असल्याने ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. गेले आठ ते दहा दिवस नेटवर्कअभावी शासकीय, बॅंकांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे.

वृक्षारोपण कार्यक्रम

दापोली : कृषिदिनाचे औचित्य साधून गिम्हवणे - दुबळेवाडी येथे दापोली कृषी महाविद्यालयाच्या विस्तार शिक्षण विभागातर्फे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गिम्हवणे दुबळेवाडी पासष्टतील स्मशानभूमीत वृक्षलागवड करण्यात आली. वड, काजू, बकुळ, चाफा या वृक्षांची लागवड करण्यात आली.

बासष्ट फेऱ्या सुरू

लांजा : अनलाॅकनंतर एसटीची आंतरजिल्हा व ग्रामीण मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. लांजा आगारातून दिवसाला ६२ फेऱ्या सुरू झाल्या आहेत. कल्याण, मुंबई, अक्कलकोट या मार्गावरील फेऱ्याही सुरू करण्यात आल्या आहेत.

तेली समाजाकडून निवेदन

रत्नागिरी : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक इम्पिरिकल डाटा ताबडतोब सुप्रीम कोर्टात सादर करून ओबीसी आरक्षणाचा स्थगिती आदेश रद्द करावा. ओबीसीची जातिनिहाय जनगणना करून आरक्षणाचा कायदा संमत करावा या मागणीसाठी जिल्हा तेली समाजातर्फे जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.

उमेश मोहितेचे यश

रत्नागिरी : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गोंदिया जिल्ह्यात राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्वरचित ऑनलाइन काव्यलेखन स्पर्धेत उमेश मोहितेंची कविता उत्कृष्ट ठरली आहे.

कृषी सप्ताहाची सांगता

दापोली : महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे आयोजित कृषी संजीवनी सप्ताहाची सांगता झाली. कात्रण, दमामे, तामोंड, भडवळे गावांमध्ये विविध कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. बीजप्रक्रिया, सुधारित भात लागवड तंत्रज्ञान, जमीन आरोग्यपत्रिकेनुसार खतांचा वापर, काळा भात, काजू, हळद लागवडीबाबत माहिती देण्यात आली.

पीकविमा योजनेची जनजागृती

रत्नागिरी : जिल्ह्यात प्रधानमंत्री पीकविमा योजना जनजागृती मोहिमेचा आरंभ करण्यात आला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी उपक्रमाचा भाग म्हणून या योजनेसाठी पीकविमा सप्ताह सुरू करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा, यासाठी जनजागृती केली जाणार आहे.

नांदळज येथे वृक्षारोपण

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील नांदळज येथे ग्रामदेवता श्री सुखाईदेवी मंदिर परिसरात शेतकरी लाकूड व्यापारी संघटना, वनविभाग परिमंडल देवरूख, ग्रामपंचायत नांदळल यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षलागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.