शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

उत्पादकता वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:20 IST

एसटी बंद राजापूर : राजापूर-गोवळ-बुरंबेवाडी मार्गावर पन्हळे येथील मोरी अतिवृष्टीत खचल्याने यामार्गावरील एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे. पंधरा ...

एसटी बंद

राजापूर : राजापूर-गोवळ-बुरंबेवाडी मार्गावर पन्हळे येथील मोरी अतिवृष्टीत खचल्याने यामार्गावरील एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे. पंधरा दिवस उलटूनही मोरीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नसल्याने या मार्गावरील प्रवाशांना खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे.

नेटवर्कअभावी गैरसोय

रत्नागिरी : तालुक्यातील जाकादेवी, खालगाव पंचक्रोशीमध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांपासून भारत संचार व खासगी मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क गायब असल्याने ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. गेले आठ ते दहा दिवस नेटवर्कअभावी शासकीय, बॅंकांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे.

वृक्षारोपण कार्यक्रम

दापोली : कृषिदिनाचे औचित्य साधून गिम्हवणे - दुबळेवाडी येथे दापोली कृषी महाविद्यालयाच्या विस्तार शिक्षण विभागातर्फे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गिम्हवणे दुबळेवाडी पासष्टतील स्मशानभूमीत वृक्षलागवड करण्यात आली. वड, काजू, बकुळ, चाफा या वृक्षांची लागवड करण्यात आली.

बासष्ट फेऱ्या सुरू

लांजा : अनलाॅकनंतर एसटीची आंतरजिल्हा व ग्रामीण मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. लांजा आगारातून दिवसाला ६२ फेऱ्या सुरू झाल्या आहेत. कल्याण, मुंबई, अक्कलकोट या मार्गावरील फेऱ्याही सुरू करण्यात आल्या आहेत.

तेली समाजाकडून निवेदन

रत्नागिरी : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक इम्पिरिकल डाटा ताबडतोब सुप्रीम कोर्टात सादर करून ओबीसी आरक्षणाचा स्थगिती आदेश रद्द करावा. ओबीसीची जातिनिहाय जनगणना करून आरक्षणाचा कायदा संमत करावा या मागणीसाठी जिल्हा तेली समाजातर्फे जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.

उमेश मोहितेचे यश

रत्नागिरी : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गोंदिया जिल्ह्यात राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्वरचित ऑनलाइन काव्यलेखन स्पर्धेत उमेश मोहितेंची कविता उत्कृष्ट ठरली आहे.

कृषी सप्ताहाची सांगता

दापोली : महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे आयोजित कृषी संजीवनी सप्ताहाची सांगता झाली. कात्रण, दमामे, तामोंड, भडवळे गावांमध्ये विविध कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. बीजप्रक्रिया, सुधारित भात लागवड तंत्रज्ञान, जमीन आरोग्यपत्रिकेनुसार खतांचा वापर, काळा भात, काजू, हळद लागवडीबाबत माहिती देण्यात आली.

पीकविमा योजनेची जनजागृती

रत्नागिरी : जिल्ह्यात प्रधानमंत्री पीकविमा योजना जनजागृती मोहिमेचा आरंभ करण्यात आला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी उपक्रमाचा भाग म्हणून या योजनेसाठी पीकविमा सप्ताह सुरू करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा, यासाठी जनजागृती केली जाणार आहे.

नांदळज येथे वृक्षारोपण

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील नांदळज येथे ग्रामदेवता श्री सुखाईदेवी मंदिर परिसरात शेतकरी लाकूड व्यापारी संघटना, वनविभाग परिमंडल देवरूख, ग्रामपंचायत नांदळल यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षलागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.