शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

कोरोना रुग्णसंख्येत वाढ; २४ तासांत १५० रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:38 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. मंगळवारी एका दिवसात जिल्ह्यात १५० नव्या रुग्णांची भर पडली असून दोघांचा ...

रत्नागिरी : जिल्ह्यात रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. मंगळवारी एका दिवसात जिल्ह्यात १५० नव्या रुग्णांची भर पडली असून दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ११८ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ७६,६०७ इतकी झाली असून २३६२ जणांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. आतापर्यंत ७२,९७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ९२७ जण उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांतील कोरोना चाचणीच्या अहवालात १५० जण पाॅझिटिव्ह आले आहेत. यात अँटिजन चाचणीत ४३ आणि आरटीपीसीआर चाचणीत १०७ जण पाॅझिटिव्ह आले आहेत, तर ३५११ जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. चिपळूण आणि रत्नागिरी येथील प्रत्येकी एक अशा एकूण दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या ९२७ जण उपचार घेत आहेत. त्यापैकी गृहविलगीकरणात ४७० आणि संस्थात्क विलगीकरणात ४५७ जण उपचार घेत आहेत. केअर सेंटरमध्ये १०९, डीसीएचसीमध्ये १७२ आणि डीसीएचमध्ये १७६ रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी ५६ जण आयसीयूमध्ये दाखल असून ७९ जणांना ऑक्सिजन सुरू आहे.

आतापर्यंत झालेल्या एकूण २,३६२ मृत्यूंपैकी ५० आणि त्यावरील वयोगटातील १९८२ रुग्ण असून सहव्याधी असलेल्या ८३२ रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत ७ लाख ६२ हजार १९६ कोरोना चाचणी करण्यात आल्या. त्यापैकी ३ लाख ५८ हजार १८८ आरटीपीसीआर चाचण्या, तर ४ लाख ४ हजार ८ अँटिजन चाचण्या करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने चाचण्या वाढविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.