शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
3
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
4
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
5
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
6
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
7
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
8
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
9
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
10
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
11
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
12
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
13
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
14
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
15
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
16
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
17
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
18
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
20
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त

माल वाहतुकीमुळे एस.टी.ला दोन कोटी २७ लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे गतवर्षी एस.टी. वाहतूक तब्बल दोन महिने बंद होती. निर्माण झालेल्या बिकट आर्थिक परिस्थितीवर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे गतवर्षी एस.टी. वाहतूक तब्बल दोन महिने बंद होती. निर्माण झालेल्या बिकट आर्थिक परिस्थितीवर मार्ग शोधत असतानाच महामंडळाने मालवाहतुकीसाठी परवानगी दिली. यावर्षी पुन्हा लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे. एस.टी.साठी अत्यावश्यक सेवा म्हणून परवानगी देण्यात आली असली तरी प्रवासी भारमान घटल्यामुळे उत्पन्नावर परिणाम झाला आहे. मात्र, मालवाहतुकीमुळे राज्य परिवहन महामंडळाला दिलासा प्राप्त झाला आहे.

गतवर्षी जिल्ह्यात दि.२१ मेपासून मालवाहतुकीला प्रारंभ झाला. कोरोना कालावधीत आंबा वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला असताना एस.टी.च्या मालवाहतूक गाडीतून पेट्यांची वाहतूक करण्यात आली. ५० मालवाहतूक बसद्वारे गेल्या अकरा महिन्यांत ४ लाख ७८ हजार किलोमीटर प्रवास झाला असून, त्याद्वारे दोन कोटी २७ लाख ८५ हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. एस.टी.ने माल वाहतूक सुरू करण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू झाली. एस.टी.च्या विश्वासार्हतेमुळे कारखानदार, व्यापारी, शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे.

कोरोनाचे संकट असतानाही चालक- वाहक प्रवासी वाहतूक करीत आहेत. भारमान घटल्याने बहुतांश मार्गावरील फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. दिवसेंदिवस भारमान कमी झाल्याने जेमतेम ८ ते ९ टक्क्यांपेक्षा कमी फेऱ्या सुरू आहेत.

अत्यावश्यक सेवा म्हणून एस.टी.ला लॉकडाऊनमधून वगळण्यात आले असले तरी लॉकडाऊनपूर्व एस.टी.च्या दैनंदिन ६०० गाड्या धावत असल्याने ४ हजार २०० फेऱ्यांमुळे एक लाख ८० हजार किलोमीटर वाहतूक सुरू होती. प्रवासी संख्या दोन ते सव्वादोन लाखांच्या घरात असल्याने ४८ ते ५० लाखांपर्यंत उत्पन्न प्राप्त होत असे. मात्र, आता सध्या ४५ ते ९५ इतक्याच गाड्या धावत आहेत. त्यामुळे ८८ हजारांपासून चार ते साडेचार लाखांपर्यंत उत्पन्न प्राप्त होत आहे. जेमतेम चार ते पाच टक्के प्रवासी वाहतूक सुरू आहे. प्रवासी संख्या घटल्यामुळेच महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम झाला असला तरी मालवाहतुकीमुळे तेवढाच दिलासा प्राप्त होत आहे.

मालवाहतुकीमुळे एस.टी.ला चांगला प्रतिसाद लाभत असल्याने मालवाहतूक ५० गाड्या तयार करण्यात आल्या आहेत. प्रवासी वाहतुकीसोबतच आता जिल्ह्यातून संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मालवाहतूक सेवा सुरू झाली आहे.

मे महिन्यापासून मार्चपर्यत रत्नागिरी विभागातून मालवाहतुकीमुळे मिळालेले उत्पन्न व किलोमीटर (प्रवास) पुढीलप्रमाणे-

महिना किलोमीटर उत्पन्न

मे २,००० ५७,०००

जून २२,००० ०६.८४

जुलै ५००० १९.११

ऑगस्ट ३८,००० १५.६४

सप्टेंबर ३७,००० १५.६४

ऑक्टोबर ७३,००० ३३.४९

नोव्हेंबर ४२,००० २५.१९

डिसेंबर ५१,००० २३.७७

जानेवारी ७८,००० ३८.९७

फेब्रुवारी ५९,००० २९.३९

मार्च २६,००० २०.५९

एकूण ४,७८,००० २२७.८५

कोट घ्यावा :

आंब्यापेट्यापासून मालवाहतूक सुरू झाली. त्यानंतर चिरा, सिमेंट, वाळू, खत, पाइप, पत्रे, साखर, रोपे आदी विविध प्रकारच्या वस्तूंची वाहतूक सुरू आहे. मालवाहतुकीसाठी कारखानदार, उद्योजकांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. पाच मालगाड्यांपासून सुरुवात झाल्यानंतर आता मालवाहतुकीच्या गाड्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

-सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी