शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

सुधारित नळ योजनेचे

By admin | Updated: October 2, 2016 23:19 IST

रत्नागिरी नगरपरिषद : जिल्हाध्यक्ष बाळ मानेंच्या प्रयत्नांना यश

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरी रत्नागिरी नगरपरिषदेसाठी बहुप्रतीक्षित सुधारीत नळपाणी योजनेचे घोडे अखेर गंगेत न्हाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडलेल्या ६३ कोटी २९ लाख रुपये खर्चाच्या या सुधारित नळपाणी योजनेतील ५०पेक्षा अधिक त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र तथा बाळ माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून ही योजना मंजूर करून घेतली आहे. या योजनेच्या कामाची सुरूवात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आचारसंहितेच्या पूर्वी कोणत्या मुहूर्तावर होणार, याबाबत रत्नागिरीकरांना उत्सुकता आहे. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारी सर्वच वितरण व्यवस्था खराब झाली आहे. शीळ धरणावरील मुख्य जलवाहिनी गंजल्याने जागोजागी फाटली आहे. त्यामुळे पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात आहे. १९६५ पासून कार्यरत पानवल धरणावरून आलेली जलवाहिनीही खराब झाली आहे. जलशुध्दिकरण प्रकल्पाची दुरुस्ती आवश्यक आहे. शहरातील घरा-घराकडे पाणी पोहोचविणाऱ्या अंतर्गत जलवाहिन्या गंजल्याने बाद झाल्या आहेत. अनेक ठिकाणी फुटलेल्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करणेही अवघड बनले आहे. शीळ व पानवल धरणात मुबलक पाणी असूनही पाणी वितरण वाहिन्यांतील दोषामुळे शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळत नाही. कमी दाबाने पाणीपुरवठा किवा पाणीच न येणे या समस्यांना दहा वर्षांपासून रत्नागिरीकरांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांनी सातत्याने याबाबत नगरपरिषदेतील कारभाऱ्यांकडे टाहो फोडूनही गेल्या दहा वर्षात काही घडले नाही, पाण्याची समस्या सुटली नाही. त्यामुळे सुधारित पाणीपुरवठा योजनाही त्याच परंपरेतील असावी, केवळ हुलकावणी दिली जात असावी, असेच रत्नागिरीकरांना वाटत होते. रत्नागिरीत सुधारित नळपाणी योजनेबाबत याआधी बरेच महाभारत घडून गेले आहे. या योजनेच्या सादरीकरणावरून शिवसेना व भाजप यांच्यात जोरदार राजकीय कलगी-तुरा रंगला होता. रत्नागिरी नगरपरिषदेच्या सभागृहात जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी याबाबतचे सादरीकरण द्यावे, असा आग्रह शिवसेनेने धरला होता. त्यामुळे वातारवण तणावपूर्ण झाले होते. सभागृहाचा ताबा सेनेने घेऊ नये, यासाठी नगरपरिषदेने नियमानुसार सभागृह सील केले होते. या आठवणी ताज्या असतानाच ही सुधारित नळपाणी योजना तळमळीने प्रयत्न करून भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी मंजूर करून घेतली आहे. ६३ कोटींच्या या योजनचे काम निवडणूक आचारसंहितेपूर्वी सुरू करण्याच्या हालचालीही आता सुरू झाल्या आहेत. या कामाची सुरूवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे आधीही सांगण्यात आले होते. आता योजना मंजूर झाल्याने योजनेच्या आरंभासाठी मुख्यमंत्री फडणवीस रत्नागिरीत येणार काय, त्यांच्या उपस्थितीत योजना आरंभाची सभा ‘निवडणूक प्रचार’ सभा ठरणार काय, याबाबत चर्चा रंगली आहे. योजनेचा लाभ भाजपला होणार? गेल्या सहा महिन्यांच्या काळापासून रत्नागिरीतील सुधारित नळपाणी योजना हा मोठा चर्चेचा विषय ठरला होता. राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा शहरात होती. मात्र, भाजपने ही योजना मंजूर करून आणली. या योजनेचा शुभारंभही निवडणुकीपूर्वी होईल. त्यामुळे योजनेच्या या यशाचे रुपांतर येणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या मतवाढीमध्ये होणार काय, भाजपचा थेट नगराध्यक्ष होणार काय, या प्रश्नांची चर्चा शहरात होत आहे. बाळ माने यांनी मुख्यमंत्र्याकडे केला पाठपुरावा. योजनेच्या आरंभासाठी मुख्यमंत्री येणार? रत्नागिरीला पाणीपुरवठ्याचे वितरण करणारी व्यवस्था खराब. अनेक ठिकाणी फुटलेल्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करणेही अवघड.