शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
3
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
4
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
5
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
6
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
7
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
8
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
9
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
10
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
11
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
12
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
13
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
14
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
15
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
16
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
17
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
18
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
19
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

भाज्यांची आवक घटली, दरवाढीने ग्राहक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:21 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेले आठवडाभर संततधार पाऊस कोसळत असल्याने परजिल्ह्यांतून येणारी भाज्यांची आवक घटली आहे. ठरावीक भाज्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेले आठवडाभर संततधार पाऊस कोसळत असल्याने परजिल्ह्यांतून येणारी भाज्यांची आवक घटली आहे. ठरावीक भाज्या बाजारात उपलब्ध असून उपलब्ध भाज्यांच्या दरात मात्र वाढ झाली आहे. पावसात भाज्या भिजत असल्याने काही दिवसांत भाज्या कुजतात. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

कांदे-बटाटे विक्रीसाठी मुबलक स्वरूपात उपलब्ध असून दरही ‘जैसे-थे’ आहेत. कांदे २५ ते ३० रुपये, तर बटाटे २५ रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत. घेवडा, गाजर, तोंडली विक्रीसाठी गायब आहेत. फरसबी मोजक्याच विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. वांगी, टोमॅटो, सिमला मिरची, दुधी भोपळा, लाल भोपळा, भेंडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हिरव्या मिरचीचे दर खाली आले असून ६० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. कोबी, फ्लाॅवर ४० ते ५० रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत. पालेभाज्यांमध्ये मुळा, माठ, मेथी उपलब्ध असून पावसामुळे पालेभाज्या टिकत नसल्याने ग्राहक खरेदीसाठी टाळाटाळ करीत आहेत. काेथिंबीर पेंढीसह पालेभाज्या १५ ते २० रुपये जुडी दराने विकण्यात येत आहे.

वांग्यासह पावटे, शेवगा शेंगा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. वांगी ४० रुपये, पावटा ६० रुपये, तर शेवगा २५ रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. पावटे, शेवग्याला विशेष मागणी होत आहे. पावसामुळे आल्याचा खप चांगला होत असून ६० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. दुधी भोपळा २० ते २५ रुपये दराने विकण्यात येत आहे.

बाजारात मटार विक्रीसाठी उपलब्ध झाले असून १६० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. नवीन हंगामातील मटार बाजारात आला असल्याने दर चढ असल्याने ग्राहक खरेदीसाठी हात आखडता घेत आहेत.

आषाढी एकादशीला भाविक उपवास ठेवतात. उपवासासाठी रताळ्याचे सेवन केले जात असल्याने बाजारात रताळी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ५० ते ६० रुपये किलो दराने रताळी विक्री सुरू आहे. फलाहारासाठी अन्य फळांबरोबर आंब्याला मागणी होत आहे.

पावसाळ्यात भाज्यांची आवक घटते. मात्र, त्या काळात दरही घसरतात. पावसात भाज्या भिजत असल्याने टिकत नाहीत. त्यामुळे एकत्रित भाज्या खरेदी करणे परवडत नाहीत. भाज्यांसाठी कांद्याचा वापर अधिक होतो. कांद्याचे दर अद्याप खाली आलेले नाहीत. त्यामुळे दैनंदिन आहारात दरामुळे आता भाज्या परवडत नाहीत. दरावर निर्बंध असणे आवश्यक आहे.

- जयश्री शेलार, गृहिणी.

इंधन दरात वाढ झाली की, अन्य वस्तूंच्या दरात वाढ होते. कडधान्य डाळींच्या किमतीबरोबर भाज्यांच्या दरातील वाढ सातत्याने सुरू आहे. वाढत्या दरावर निर्बंध लावणे गरजेचे आहे. शासनाकडून महागाईचा दर निश्चित करताना सर्वसामान्यांचा विचार करणे आवश्यक आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचा रोजचा ‘डाळभात’ही महागला आहे.

- सुमेधा जोग, गृहिणी.