शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भाज्यांची आवक घटली, दरवाढीने ग्राहक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:21 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेले आठवडाभर संततधार पाऊस कोसळत असल्याने परजिल्ह्यांतून येणारी भाज्यांची आवक घटली आहे. ठरावीक भाज्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेले आठवडाभर संततधार पाऊस कोसळत असल्याने परजिल्ह्यांतून येणारी भाज्यांची आवक घटली आहे. ठरावीक भाज्या बाजारात उपलब्ध असून उपलब्ध भाज्यांच्या दरात मात्र वाढ झाली आहे. पावसात भाज्या भिजत असल्याने काही दिवसांत भाज्या कुजतात. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

कांदे-बटाटे विक्रीसाठी मुबलक स्वरूपात उपलब्ध असून दरही ‘जैसे-थे’ आहेत. कांदे २५ ते ३० रुपये, तर बटाटे २५ रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत. घेवडा, गाजर, तोंडली विक्रीसाठी गायब आहेत. फरसबी मोजक्याच विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. वांगी, टोमॅटो, सिमला मिरची, दुधी भोपळा, लाल भोपळा, भेंडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हिरव्या मिरचीचे दर खाली आले असून ६० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. कोबी, फ्लाॅवर ४० ते ५० रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत. पालेभाज्यांमध्ये मुळा, माठ, मेथी उपलब्ध असून पावसामुळे पालेभाज्या टिकत नसल्याने ग्राहक खरेदीसाठी टाळाटाळ करीत आहेत. काेथिंबीर पेंढीसह पालेभाज्या १५ ते २० रुपये जुडी दराने विकण्यात येत आहे.

वांग्यासह पावटे, शेवगा शेंगा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. वांगी ४० रुपये, पावटा ६० रुपये, तर शेवगा २५ रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. पावटे, शेवग्याला विशेष मागणी होत आहे. पावसामुळे आल्याचा खप चांगला होत असून ६० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. दुधी भोपळा २० ते २५ रुपये दराने विकण्यात येत आहे.

बाजारात मटार विक्रीसाठी उपलब्ध झाले असून १६० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. नवीन हंगामातील मटार बाजारात आला असल्याने दर चढ असल्याने ग्राहक खरेदीसाठी हात आखडता घेत आहेत.

आषाढी एकादशीला भाविक उपवास ठेवतात. उपवासासाठी रताळ्याचे सेवन केले जात असल्याने बाजारात रताळी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ५० ते ६० रुपये किलो दराने रताळी विक्री सुरू आहे. फलाहारासाठी अन्य फळांबरोबर आंब्याला मागणी होत आहे.

पावसाळ्यात भाज्यांची आवक घटते. मात्र, त्या काळात दरही घसरतात. पावसात भाज्या भिजत असल्याने टिकत नाहीत. त्यामुळे एकत्रित भाज्या खरेदी करणे परवडत नाहीत. भाज्यांसाठी कांद्याचा वापर अधिक होतो. कांद्याचे दर अद्याप खाली आलेले नाहीत. त्यामुळे दैनंदिन आहारात दरामुळे आता भाज्या परवडत नाहीत. दरावर निर्बंध असणे आवश्यक आहे.

- जयश्री शेलार, गृहिणी.

इंधन दरात वाढ झाली की, अन्य वस्तूंच्या दरात वाढ होते. कडधान्य डाळींच्या किमतीबरोबर भाज्यांच्या दरातील वाढ सातत्याने सुरू आहे. वाढत्या दरावर निर्बंध लावणे गरजेचे आहे. शासनाकडून महागाईचा दर निश्चित करताना सर्वसामान्यांचा विचार करणे आवश्यक आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचा रोजचा ‘डाळभात’ही महागला आहे.

- सुमेधा जोग, गृहिणी.