शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

भाज्यांची आवक घटली, दरवाढीने ग्राहक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:21 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेले आठवडाभर संततधार पाऊस कोसळत असल्याने परजिल्ह्यांतून येणारी भाज्यांची आवक घटली आहे. ठरावीक भाज्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेले आठवडाभर संततधार पाऊस कोसळत असल्याने परजिल्ह्यांतून येणारी भाज्यांची आवक घटली आहे. ठरावीक भाज्या बाजारात उपलब्ध असून उपलब्ध भाज्यांच्या दरात मात्र वाढ झाली आहे. पावसात भाज्या भिजत असल्याने काही दिवसांत भाज्या कुजतात. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

कांदे-बटाटे विक्रीसाठी मुबलक स्वरूपात उपलब्ध असून दरही ‘जैसे-थे’ आहेत. कांदे २५ ते ३० रुपये, तर बटाटे २५ रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत. घेवडा, गाजर, तोंडली विक्रीसाठी गायब आहेत. फरसबी मोजक्याच विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. वांगी, टोमॅटो, सिमला मिरची, दुधी भोपळा, लाल भोपळा, भेंडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हिरव्या मिरचीचे दर खाली आले असून ६० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. कोबी, फ्लाॅवर ४० ते ५० रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत. पालेभाज्यांमध्ये मुळा, माठ, मेथी उपलब्ध असून पावसामुळे पालेभाज्या टिकत नसल्याने ग्राहक खरेदीसाठी टाळाटाळ करीत आहेत. काेथिंबीर पेंढीसह पालेभाज्या १५ ते २० रुपये जुडी दराने विकण्यात येत आहे.

वांग्यासह पावटे, शेवगा शेंगा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. वांगी ४० रुपये, पावटा ६० रुपये, तर शेवगा २५ रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. पावटे, शेवग्याला विशेष मागणी होत आहे. पावसामुळे आल्याचा खप चांगला होत असून ६० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. दुधी भोपळा २० ते २५ रुपये दराने विकण्यात येत आहे.

बाजारात मटार विक्रीसाठी उपलब्ध झाले असून १६० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. नवीन हंगामातील मटार बाजारात आला असल्याने दर चढ असल्याने ग्राहक खरेदीसाठी हात आखडता घेत आहेत.

आषाढी एकादशीला भाविक उपवास ठेवतात. उपवासासाठी रताळ्याचे सेवन केले जात असल्याने बाजारात रताळी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ५० ते ६० रुपये किलो दराने रताळी विक्री सुरू आहे. फलाहारासाठी अन्य फळांबरोबर आंब्याला मागणी होत आहे.

पावसाळ्यात भाज्यांची आवक घटते. मात्र, त्या काळात दरही घसरतात. पावसात भाज्या भिजत असल्याने टिकत नाहीत. त्यामुळे एकत्रित भाज्या खरेदी करणे परवडत नाहीत. भाज्यांसाठी कांद्याचा वापर अधिक होतो. कांद्याचे दर अद्याप खाली आलेले नाहीत. त्यामुळे दैनंदिन आहारात दरामुळे आता भाज्या परवडत नाहीत. दरावर निर्बंध असणे आवश्यक आहे.

- जयश्री शेलार, गृहिणी.

इंधन दरात वाढ झाली की, अन्य वस्तूंच्या दरात वाढ होते. कडधान्य डाळींच्या किमतीबरोबर भाज्यांच्या दरातील वाढ सातत्याने सुरू आहे. वाढत्या दरावर निर्बंध लावणे गरजेचे आहे. शासनाकडून महागाईचा दर निश्चित करताना सर्वसामान्यांचा विचार करणे आवश्यक आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचा रोजचा ‘डाळभात’ही महागला आहे.

- सुमेधा जोग, गृहिणी.