शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

भाज्यांची आवक घटली, दरवाढीने ग्राहक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:21 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेले आठवडाभर संततधार पाऊस कोसळत असल्याने परजिल्ह्यांतून येणारी भाज्यांची आवक घटली आहे. ठरावीक भाज्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेले आठवडाभर संततधार पाऊस कोसळत असल्याने परजिल्ह्यांतून येणारी भाज्यांची आवक घटली आहे. ठरावीक भाज्या बाजारात उपलब्ध असून उपलब्ध भाज्यांच्या दरात मात्र वाढ झाली आहे. पावसात भाज्या भिजत असल्याने काही दिवसांत भाज्या कुजतात. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

कांदे-बटाटे विक्रीसाठी मुबलक स्वरूपात उपलब्ध असून दरही ‘जैसे-थे’ आहेत. कांदे २५ ते ३० रुपये, तर बटाटे २५ रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत. घेवडा, गाजर, तोंडली विक्रीसाठी गायब आहेत. फरसबी मोजक्याच विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. वांगी, टोमॅटो, सिमला मिरची, दुधी भोपळा, लाल भोपळा, भेंडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हिरव्या मिरचीचे दर खाली आले असून ६० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. कोबी, फ्लाॅवर ४० ते ५० रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत. पालेभाज्यांमध्ये मुळा, माठ, मेथी उपलब्ध असून पावसामुळे पालेभाज्या टिकत नसल्याने ग्राहक खरेदीसाठी टाळाटाळ करीत आहेत. काेथिंबीर पेंढीसह पालेभाज्या १५ ते २० रुपये जुडी दराने विकण्यात येत आहे.

वांग्यासह पावटे, शेवगा शेंगा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. वांगी ४० रुपये, पावटा ६० रुपये, तर शेवगा २५ रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. पावटे, शेवग्याला विशेष मागणी होत आहे. पावसामुळे आल्याचा खप चांगला होत असून ६० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. दुधी भोपळा २० ते २५ रुपये दराने विकण्यात येत आहे.

बाजारात मटार विक्रीसाठी उपलब्ध झाले असून १६० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. नवीन हंगामातील मटार बाजारात आला असल्याने दर चढ असल्याने ग्राहक खरेदीसाठी हात आखडता घेत आहेत.

आषाढी एकादशीला भाविक उपवास ठेवतात. उपवासासाठी रताळ्याचे सेवन केले जात असल्याने बाजारात रताळी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ५० ते ६० रुपये किलो दराने रताळी विक्री सुरू आहे. फलाहारासाठी अन्य फळांबरोबर आंब्याला मागणी होत आहे.

पावसाळ्यात भाज्यांची आवक घटते. मात्र, त्या काळात दरही घसरतात. पावसात भाज्या भिजत असल्याने टिकत नाहीत. त्यामुळे एकत्रित भाज्या खरेदी करणे परवडत नाहीत. भाज्यांसाठी कांद्याचा वापर अधिक होतो. कांद्याचे दर अद्याप खाली आलेले नाहीत. त्यामुळे दैनंदिन आहारात दरामुळे आता भाज्या परवडत नाहीत. दरावर निर्बंध असणे आवश्यक आहे.

- जयश्री शेलार, गृहिणी.

इंधन दरात वाढ झाली की, अन्य वस्तूंच्या दरात वाढ होते. कडधान्य डाळींच्या किमतीबरोबर भाज्यांच्या दरातील वाढ सातत्याने सुरू आहे. वाढत्या दरावर निर्बंध लावणे गरजेचे आहे. शासनाकडून महागाईचा दर निश्चित करताना सर्वसामान्यांचा विचार करणे आवश्यक आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचा रोजचा ‘डाळभात’ही महागला आहे.

- सुमेधा जोग, गृहिणी.