शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ अभियानाची तळवडेत अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:32 IST

पाचल : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राजापूर तालुक्यातील तळवडे ग्रामपंचायतीतर्फे ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या अभियानाचा ...

पाचल : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राजापूर तालुक्यातील तळवडे ग्रामपंचायतीतर्फे ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. सरपंच प्रदीप प्रभुदेसाई यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ राववाडी येथून करण्यात आला.

यावेळी ग्राम कृती दलाचे अध्यक्ष संदीप बारसकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संतोष मसुरकर, सुरेश गुडेकर, आरोग्य सेवक, तलाठी विकास भंडारी, शिक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका उपस्थित होते. हे अभियान १ ते १५ मे या कालावधीत राबविण्यात येणार आहे. कोरोनाचा बिमोड करण्यासाठी गावात या अभियानाची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक घराघरात जाऊन कोरोनाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य सेवक, ग्रामपंचायत सदस्य, ग्राम कृती दलाचे सदस्य, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक, तलाठी आदींचे पथक घराघरात जाऊन तपासणी करणार आहेत. यामध्ये तापमान, ऑक्सिजनचे प्रमाण, मास्क, सॅनिटायझर व स्वच्छतेबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.