शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ अभियानाची तळवडेत अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:32 IST

पाचल : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राजापूर तालुक्यातील तळवडे ग्रामपंचायतीतर्फे ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या अभियानाचा ...

पाचल : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राजापूर तालुक्यातील तळवडे ग्रामपंचायतीतर्फे ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. सरपंच प्रदीप प्रभुदेसाई यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ राववाडी येथून करण्यात आला.

यावेळी ग्राम कृती दलाचे अध्यक्ष संदीप बारसकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संतोष मसुरकर, सुरेश गुडेकर, आरोग्य सेवक, तलाठी विकास भंडारी, शिक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका उपस्थित होते. हे अभियान १ ते १५ मे या कालावधीत राबविण्यात येणार आहे. कोरोनाचा बिमोड करण्यासाठी गावात या अभियानाची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक घराघरात जाऊन कोरोनाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य सेवक, ग्रामपंचायत सदस्य, ग्राम कृती दलाचे सदस्य, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक, तलाठी आदींचे पथक घराघरात जाऊन तपासणी करणार आहेत. यामध्ये तापमान, ऑक्सिजनचे प्रमाण, मास्क, सॅनिटायझर व स्वच्छतेबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.