शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
5
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
6
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
7
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
8
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
9
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
10
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
11
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
12
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
13
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
14
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
15
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
16
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
17
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
18
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
19
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
20
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लसीकरण केंद्रावर ज्येष्ठांसाठी टोकन पद्धत राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:32 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क देवरुख : ग्रामीण भागात लसीकरणच्या नियोजनाअभावी ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. लसीकरण केंद्रांवर रांगा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

देवरुख : ग्रामीण भागात लसीकरणच्या नियोजनाअभावी ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. लसीकरण केंद्रांवर रांगा लावूनही शेवटी लस नाही, असे सांगितले जात आहे. परिणामी, होणारा लसीचा पुरवठा आणि दिली जाणारी लस याचे नियोजन करून ज्येष्ठ नागरिकांना टोकन दिल्यास गर्दी टाळता येईल, अशी मागणी गाव विकास समितीच्या रत्नागिरी जिल्हा संघटनेचे सुहास खंडागळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे.

ग्रामीण भागात ज्या ४५ वर्षांवरील नागरिकांनी पहिला डोस घेतला, त्यांच्या दुसऱ्या डोसची मुदत होऊन गेली, तरी अद्याप दुसरा डोस मिळत नाही. दुसरा डोस कधी मिळेल, याबाबत स्पष्टता नसल्याने नागरिक सकाळीच लसीकरण केंद्रांवर रांगा लावत आहेत. देवरुखसारख्या तालुक्याच्या ठिकाणी लसीचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने, अनेकांना रांगेत उभे राहिल्यानंतर ही लस न घेता माघारी जावे लागत आहे. लसीचा दुसरा डोस पूर्ण व्हावा, यासाठी ज्येष्ठ नागरिकांत गांभीर्य असताना, लस देण्याबाबत नियोजन नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असे सुहास खंडागळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

ज्या ठिकाणी डोस साठी गर्दी होत आहे, जेथील मागणी अधिक आहे, तिथे लसीकरणाची संख्या वाढवायला हवी, गर्दी टाळण्यासाठी आणि डोस कधी मिळणार, याची माहिती नागरिकांना मिळण्यासाठी नियाेजन करावे, तसेच ज्येष्ठांना लस कधी मिळणार याबाबत त्या-त्या केंद्रांवर नियोजन करून टोकन, द्यावे अशी मागणी सुहास खंडागळे यांनी केली आहे.