शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
2
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
3
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
4
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
5
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
6
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
7
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू
8
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
9
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
10
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
11
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
12
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
13
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
14
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
15
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
16
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
17
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
18
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
19
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
20
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

प्रवासी नसल्यामुळे एस.टी.च्या उत्पन्नावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:31 IST

रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने प्रशासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत. रस्त्यावर विनाकारण नागरिकांनी येऊ नये, असे ...

रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने प्रशासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत. रस्त्यावर विनाकारण नागरिकांनी येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांचीही संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. रत्नागिरी विभागातून गुरुवारी चार हजारांपैकी अवघ्या २२२ बसफेऱ्या सोडण्यात आल्याने २३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. लाॅकडाऊनमुळे एस.टी.चे उत्पन्न निम्म्यावर आले आहे.

वीकेंडमुळे गेल्या आठवड्यात शनिवार, रविवारी दोन दिवसांत जेमतेम २६१ फेऱ्या धावल्या. प्रवासी भारमानही फारसे लाभले नसल्याने उत्पन्नात घट झाली. २४ लाख सहा हजार ४३१ रुपयांचे उत्पन्न लाभले होते. गतवर्षी लॉकडाऊनमुळे एस. टी.च्या उत्पन्नावर चांगलाच परिणाम झाला होता. हळूहळू उत्पन्नाची गाडी रुळावर येत असताना पुन्हा रत्नागिरी विभागाला लाॅकडाऊनमुळे पुन्हा आर्थिक झळ सोसावी लागत आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून बस वाहतुकीला परवानगी देण्यात आली असली तरी प्रवासी नसल्यामुळे उत्पन्नावर परिणाम होत आहे.

रत्नागिरी विभागात एकूण ६०० बसेस असून, ४ हजार २०० फेऱ्यांद्वारे दोन ते सव्वा दोन लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात येत असल्यामुळे ५० लाखांपर्यंत उत्पन्न रत्नागिरी विभागाला प्राप्त होते. गुरुवारी दिवसभरात २२२ बसफेऱ्या सोडण्यात आल्या. ४५ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याने २३ लाखांचे उत्पन्न लाभले.

लांब पल्ल्याच्या गाड्या बंद

मुंबई मार्गावर दिवसभरात शंभर गाड्या रत्नागिरी विभागातून धावतात. मात्र, दापोली व खेड आगारांतून अवघ्या दोन गाड्या मुंबई मार्गावर धावल्या असल्या तरी अन्य आगारांतून मुंबई मार्गावरील फेऱ्या शंभर टक्के बंद होत्या. कोल्हापूर मार्गावर दिवसभरात १६ फेऱ्या धावतात. मात्र, सध्या सांगलीवगळता अन्य सर्व गाड्या बंद आहेत.

........................

लाॅकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून बससेवा सुरू ठेवण्यात आली आहे. प्रवासी भारमान पुरेसे लाभत नसल्याने शहरी, तसेच ग्रामीण व लांब पल्ल्याच्या फेऱ्यांवर परिणाम झाला आहे. प्रवाशांचा अंदाज घेऊन संबंधित मार्गावरील बसफेऱ्या सोडण्यात येत आहेत.

- सुनील भोकरे, विभागनियंत्रक, रत्नागिरी.