शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी नसल्यामुळे एस.टी.च्या उत्पन्नावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:31 IST

रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने प्रशासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत. रस्त्यावर विनाकारण नागरिकांनी येऊ नये, असे ...

रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने प्रशासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत. रस्त्यावर विनाकारण नागरिकांनी येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांचीही संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. रत्नागिरी विभागातून गुरुवारी चार हजारांपैकी अवघ्या २२२ बसफेऱ्या सोडण्यात आल्याने २३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. लाॅकडाऊनमुळे एस.टी.चे उत्पन्न निम्म्यावर आले आहे.

वीकेंडमुळे गेल्या आठवड्यात शनिवार, रविवारी दोन दिवसांत जेमतेम २६१ फेऱ्या धावल्या. प्रवासी भारमानही फारसे लाभले नसल्याने उत्पन्नात घट झाली. २४ लाख सहा हजार ४३१ रुपयांचे उत्पन्न लाभले होते. गतवर्षी लॉकडाऊनमुळे एस. टी.च्या उत्पन्नावर चांगलाच परिणाम झाला होता. हळूहळू उत्पन्नाची गाडी रुळावर येत असताना पुन्हा रत्नागिरी विभागाला लाॅकडाऊनमुळे पुन्हा आर्थिक झळ सोसावी लागत आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून बस वाहतुकीला परवानगी देण्यात आली असली तरी प्रवासी नसल्यामुळे उत्पन्नावर परिणाम होत आहे.

रत्नागिरी विभागात एकूण ६०० बसेस असून, ४ हजार २०० फेऱ्यांद्वारे दोन ते सव्वा दोन लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात येत असल्यामुळे ५० लाखांपर्यंत उत्पन्न रत्नागिरी विभागाला प्राप्त होते. गुरुवारी दिवसभरात २२२ बसफेऱ्या सोडण्यात आल्या. ४५ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याने २३ लाखांचे उत्पन्न लाभले.

लांब पल्ल्याच्या गाड्या बंद

मुंबई मार्गावर दिवसभरात शंभर गाड्या रत्नागिरी विभागातून धावतात. मात्र, दापोली व खेड आगारांतून अवघ्या दोन गाड्या मुंबई मार्गावर धावल्या असल्या तरी अन्य आगारांतून मुंबई मार्गावरील फेऱ्या शंभर टक्के बंद होत्या. कोल्हापूर मार्गावर दिवसभरात १६ फेऱ्या धावतात. मात्र, सध्या सांगलीवगळता अन्य सर्व गाड्या बंद आहेत.

........................

लाॅकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून बससेवा सुरू ठेवण्यात आली आहे. प्रवासी भारमान पुरेसे लाभत नसल्याने शहरी, तसेच ग्रामीण व लांब पल्ल्याच्या फेऱ्यांवर परिणाम झाला आहे. प्रवाशांचा अंदाज घेऊन संबंधित मार्गावरील बसफेऱ्या सोडण्यात येत आहेत.

- सुनील भोकरे, विभागनियंत्रक, रत्नागिरी.