शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

प्रवासी नसल्यामुळे एस.टी.च्या उत्पन्नावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:31 IST

रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने प्रशासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत. रस्त्यावर विनाकारण नागरिकांनी येऊ नये, असे ...

रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने प्रशासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत. रस्त्यावर विनाकारण नागरिकांनी येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांचीही संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. रत्नागिरी विभागातून गुरुवारी चार हजारांपैकी अवघ्या २२२ बसफेऱ्या सोडण्यात आल्याने २३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. लाॅकडाऊनमुळे एस.टी.चे उत्पन्न निम्म्यावर आले आहे.

वीकेंडमुळे गेल्या आठवड्यात शनिवार, रविवारी दोन दिवसांत जेमतेम २६१ फेऱ्या धावल्या. प्रवासी भारमानही फारसे लाभले नसल्याने उत्पन्नात घट झाली. २४ लाख सहा हजार ४३१ रुपयांचे उत्पन्न लाभले होते. गतवर्षी लॉकडाऊनमुळे एस. टी.च्या उत्पन्नावर चांगलाच परिणाम झाला होता. हळूहळू उत्पन्नाची गाडी रुळावर येत असताना पुन्हा रत्नागिरी विभागाला लाॅकडाऊनमुळे पुन्हा आर्थिक झळ सोसावी लागत आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून बस वाहतुकीला परवानगी देण्यात आली असली तरी प्रवासी नसल्यामुळे उत्पन्नावर परिणाम होत आहे.

रत्नागिरी विभागात एकूण ६०० बसेस असून, ४ हजार २०० फेऱ्यांद्वारे दोन ते सव्वा दोन लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात येत असल्यामुळे ५० लाखांपर्यंत उत्पन्न रत्नागिरी विभागाला प्राप्त होते. गुरुवारी दिवसभरात २२२ बसफेऱ्या सोडण्यात आल्या. ४५ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याने २३ लाखांचे उत्पन्न लाभले.

लांब पल्ल्याच्या गाड्या बंद

मुंबई मार्गावर दिवसभरात शंभर गाड्या रत्नागिरी विभागातून धावतात. मात्र, दापोली व खेड आगारांतून अवघ्या दोन गाड्या मुंबई मार्गावर धावल्या असल्या तरी अन्य आगारांतून मुंबई मार्गावरील फेऱ्या शंभर टक्के बंद होत्या. कोल्हापूर मार्गावर दिवसभरात १६ फेऱ्या धावतात. मात्र, सध्या सांगलीवगळता अन्य सर्व गाड्या बंद आहेत.

........................

लाॅकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून बससेवा सुरू ठेवण्यात आली आहे. प्रवासी भारमान पुरेसे लाभत नसल्याने शहरी, तसेच ग्रामीण व लांब पल्ल्याच्या फेऱ्यांवर परिणाम झाला आहे. प्रवाशांचा अंदाज घेऊन संबंधित मार्गावरील बसफेऱ्या सोडण्यात येत आहेत.

- सुनील भोकरे, विभागनियंत्रक, रत्नागिरी.