शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

हापूस कमी असल्याने एसटीच्या माल वाहतुकीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:31 IST

रत्नागिरी : गतवर्षी कोरोनाकाळात आंबा वाहतुकीचा प्रश्न उभा राहिला असतानाच एस.टी. शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली होती. एप्रिलमध्ये ...

रत्नागिरी : गतवर्षी कोरोनाकाळात आंबा वाहतुकीचा प्रश्न उभा राहिला असतानाच एस.टी. शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली होती. एप्रिलमध्ये आंबा वाहतूक करण्यात आली होती. यावर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत आंबा वाहतूक करण्याचा निर्णय रत्नागिरी विभागाने घेतला आहे. मात्र, आंबा उत्पादनच कमी असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

रत्नागिरी विभागाने थेट आंबा बागायतदार, व्यापाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडील आंबा वाहतूक करण्याचा निर्णय घेतला. आंबा वाहतुकीसाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वाहतुकीची तयारी दर्शविली आहे. परंतु, आंबा कमी असल्याने मालवाहतुकीसाठी घाऊक पेट्या उपलब्ध होत नाहीत. किरकोळ स्वरूपात उपलब्ध होणाऱ्या पेट्यांची वाहतूक सध्या करण्यात येत आहे.

बागायतदारांच्या बागेतून किंवा पॅकिंग हाउसमधून थेट आंबा पेटी उचलण्याची तयारी एस.टी.ने दर्शविली आहे. एस.टी.ने नऊ आगारांत नियोजन केलेल्या ठिकाणी बागायतदारांनी पेट्या आणून देणे. एकाच व्यापाऱ्याकडे सर्व माल उतरविणे. शहरातील विविध भागांत ट्रक जाऊ शकेल, अशा ठिकाणी नगावर माल उतरविणे, असे पर्याय एसटीने बागायतदार, विक्रेत्यांसाठी उपलब्ध केले आहेत. मात्र, अजूनही मोठ्या प्रमाणात पेट्या उपलब्ध होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

चार, पाच, सहा डझनांच्या लाकडी पेटीपासून दोन डझनांच्या पुठ्ठ्यांच्या खोक्यापर्यंत सर्व प्रकारच्या पॅकिंगमधील आंबा वाहतुकीची तयारी दर्शविण्यात आली आहे. पुठ्ठ्यांचे खोके वजनामुळे फाटू शकतात. तळातील आंबा पेटीवर दाब पडून काहीवेळा लाकडी खोकाही तुटण्याचा संभव असतो. त्यामुळे पेट्या बसविताना योग्य नियोजन केले आहे.

गतवर्षी एकूण ३५०० आंबा पेट्यांची वाहतूक मुंबई, बोरिवली, ठाणे, पुणे, अकोला, औरंगाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, जळगाव आदी जिल्ह्यांत एसटीने आंबा पेट्यांची वाहतूक करण्यात आली होती. मात्र, यंदा आंबा कमी असल्याने फारसा प्रतिसाद लाभत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

........................

लॉकडाऊनकाळात प्रवासी भारमान घटल्यामुळे महामंडळाने मालवाहतुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. ५३ मालवाहतूक गाड्यांमधून वाहतूक सुरू आहे. गतवर्षीप्रमाणे किफायतशीर दरात, राज्याच्या कानाकोपऱ्यांत आंबा वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, आंबा कमी असल्याने तितकासा प्रतिसाद लाभत नाही.

- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी