शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
5
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
7
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
8
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
9
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
10
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
11
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
12
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
13
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
14
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
15
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
16
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
17
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
18
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
19
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती

चक्रीवादळाच्या प्रभावाने धरणातील पाणीपातळी राखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:24 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात काही दिवस पावसाचा मुक्काम राहिल्याने, जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्प आणि ४६ लघुप्रकल्पातील ...

रत्नागिरी : जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात काही दिवस पावसाचा मुक्काम राहिल्याने, जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्प आणि ४६ लघुप्रकल्पातील पाण्याची पातळी गतवर्षीपेक्षा अधिक आहे. अर्जुना प्रकल्पाची पाण्याची पातळी मात्र, गतवर्षीपेक्षा कमी झाली आहे.

जिल्ह्यात नातूवाडी, अर्जुना आणि गडनदी असे तीन मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी नातूवाडी प्रकल्पाची पाणीसंचय करण्याची क्षमता २७.२३० दशलक्ष घनमीटर इतकी आहे. अर्जुना प्रकल्पाची पाणी संचय करण्याची क्षमता ७२.५६ दशलक्ष घनमीटर इतकी आहे, तर गडनदी प्रकल्पाची पाणीसंचय क्षमता ६४.४२ दशलक्ष घनमीटर इतकी आहे.

गेल्या वर्षी २८ मे रोजी नातूवाडी प्रकल्पातील पाणीसाठा १३.२४ दशलक्ष घनमीटर (४८.६२ टक्के) इतका होता. या वर्षी या दिवशी या पाणीसाठ्याची नोंद १४.११ दशलक्ष घनमीटर (५१.८५ टक्के) इतकी झाली आहे. गडनदी प्रकल्पातील पाणीसाठा ३२.७७ दशलक्ष घनमीटर इतका होता. या वर्षी या दिवशी ५३.७६ दशलक्ष घनमीटर इतकी झाली आहे. मात्र, अर्जुना प्रकल्पातील या वर्षीचा पाणीसाठा ५०.५० दशलक्ष घनमीटर इतका आहे. गतवर्षी या दिवशी ६८.४० दशलक्ष घनमीटर इतका होता. म्हणजेच अर्जुना प्रकल्पाची पाण्याची पातळी मात्र, गतवर्षीपेक्षा कमी झाली आहे. सध्या नातूवाडी प्रकल्पात ५१.८५ टक्के इतका पाणीसाठा आहे, तर अर्जुना प्रकल्पात ७० टक्के आणि गडनदी प्रकल्पात ८३ टक्के इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील ४६ लघुप्रकल्पांमधील पाण्याची पातळी तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे झालेल्या पावसाने वाढविली आहे. या सर्व धरणांमध्ये पाण्याचा एकूण संचय २१०.७६ दशलक्ष घनमीटर इतका आहे. सध्या या सर्व प्रकल्पांमध्ये एकूण ९२.१८ दशलक्ष घन मीटर (४३.७३ टक्के) इतका पाणीसाठा आहे. गतवर्षी हा पाणीसाठा ७८.२२ दशलक्ष घनमीटर (३७.११ टक्के) इतका होता.

जिल्ह्यात अजूनही अधूनमधून पाऊस पडत असल्याने, धरणसाठा अजूनही काही दिवस पुरेल, इतका आहे. त्यातच येत्या १० जूनपर्यंत मान्सून येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला जात आहे. मात्र, सध्या धरणातील पाणी संचय पाहता, यंदा पाण्याचा साठा गेल्या वर्षीपेक्षा अधिक आहे.

चौकट

मध्यम प्रकल्प सध्याचा पाणीसाठा(दशलक्ष घनमीटर) टक्केवारी गतवर्षीचा पाणीसाठा टक्केवारी

नातूवाडी १४.११ ५१.८५ १३.२४ ४८.६२

अर्जुना ५०.५० ७० ६८.४० ९४.२६

गडनदी ५३.७६ ८३ ३२.७७ ५०.८६