शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी विसर्जनाची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:29 IST

रत्नागिरी : वर्षभर आतुरता लागून राहिलेल्या गणपत्तीबाप्पांची प्रतिष्ठापना दि. १० सप्टेंबर रोजी सर्वत्र झाली. जिल्हाभरात १ लाख ...

रत्नागिरी : वर्षभर आतुरता लागून राहिलेल्या गणपत्तीबाप्पांची प्रतिष्ठापना दि. १० सप्टेंबर रोजी सर्वत्र झाली. जिल्हाभरात १ लाख ६६ हजार ५३९ घरगुती तर १०८ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. विसर्जनासाठीचे घाट निश्चित असल्याने त्याठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शक्यतो घरीच बादली किंवा पिंपात गणेशमूर्ती विसर्जनाचे आवाहन केले आहे. काही स्थानिक स्वराज्य संस्थांनी तर कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे.

शनिवारी दुपारनंतर दीड दिवसांच्या गणेशमूर्तींना निरोप देण्यात आला. जिल्ह्यातील १८ सार्वजनिक व १२ हजार ३३४ खासगी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गौरीसह गणपतींचे पाचव्या दिवशी विसर्जन होणार आहे. यादिवशी जिल्ह्यातील एक लाख १७ हजार २१३ घरगुती व १९ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. वर्षानुवर्षे गणेशमूर्ती विसर्जनाचे घाट निश्चित असल्याने त्याठिकाणी प्रचंड गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने पिंप किंवा बादलीत गणेशमूर्तीचे विसर्जन करून मूर्ती विरघळल्यानंतर ते पाणी झाडांना घालावे, असे आवाहन केले आहे.

शहरात गणेशमूर्तींची संख्या अधिक आहे. रत्नागिरी शहरात ७,९११ घरगुती तर रत्नागिरी ग्रामीणमध्ये ९,४३८ घरगुती गणपतींचे विसर्जन होणार आहे. शहरातील नागरिकांसाठी लक्ष्मी चौक उद्यान, माळ नाका उद्यान, नूतन नगर उद्यान, विश्व नगर उद्यान याठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत.

याशिवाय विसर्जनासाठी बाहेर न पडणाऱ्या नागरिकांकडील गणेशमूर्तींचे घरोघरी जाऊन संकलन करण्यात येणार आहे. त्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेच्या ०२३५२ - २२२३१० किंवा ०२३५२ - २२२१४४ या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करण्याचे आवाहन नगर परिषदेने केले आहे.

-------------------------

माेजक्याच लाेकांनी उपस्थित राहावे

ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांनीही विसर्जन घाटावरील गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी प्रत्येक गावातील वाडीसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. मिरवणुकांना तर बंदीच आहे. शिवाय घरातील मोजक्या तीन ते चार व्यक्तींनीच जाऊन गणेशमूूर्तीचे विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सिंग राखण्याबरोबर मास्क वापरण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. शासनाच्या नियमांचे पालन स्थानिक जनतेने करावे, यासाठी गावपातळीवरील ग्राम कृती दलेही कार्यरत आहेत.