शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी विसर्जनाची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:29 IST

रत्नागिरी : वर्षभर आतुरता लागून राहिलेल्या गणपत्तीबाप्पांची प्रतिष्ठापना दि. १० सप्टेंबर रोजी सर्वत्र झाली. जिल्हाभरात १ लाख ...

रत्नागिरी : वर्षभर आतुरता लागून राहिलेल्या गणपत्तीबाप्पांची प्रतिष्ठापना दि. १० सप्टेंबर रोजी सर्वत्र झाली. जिल्हाभरात १ लाख ६६ हजार ५३९ घरगुती तर १०८ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. विसर्जनासाठीचे घाट निश्चित असल्याने त्याठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शक्यतो घरीच बादली किंवा पिंपात गणेशमूर्ती विसर्जनाचे आवाहन केले आहे. काही स्थानिक स्वराज्य संस्थांनी तर कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे.

शनिवारी दुपारनंतर दीड दिवसांच्या गणेशमूर्तींना निरोप देण्यात आला. जिल्ह्यातील १८ सार्वजनिक व १२ हजार ३३४ खासगी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गौरीसह गणपतींचे पाचव्या दिवशी विसर्जन होणार आहे. यादिवशी जिल्ह्यातील एक लाख १७ हजार २१३ घरगुती व १९ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. वर्षानुवर्षे गणेशमूर्ती विसर्जनाचे घाट निश्चित असल्याने त्याठिकाणी प्रचंड गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने पिंप किंवा बादलीत गणेशमूर्तीचे विसर्जन करून मूर्ती विरघळल्यानंतर ते पाणी झाडांना घालावे, असे आवाहन केले आहे.

शहरात गणेशमूर्तींची संख्या अधिक आहे. रत्नागिरी शहरात ७,९११ घरगुती तर रत्नागिरी ग्रामीणमध्ये ९,४३८ घरगुती गणपतींचे विसर्जन होणार आहे. शहरातील नागरिकांसाठी लक्ष्मी चौक उद्यान, माळ नाका उद्यान, नूतन नगर उद्यान, विश्व नगर उद्यान याठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत.

याशिवाय विसर्जनासाठी बाहेर न पडणाऱ्या नागरिकांकडील गणेशमूर्तींचे घरोघरी जाऊन संकलन करण्यात येणार आहे. त्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेच्या ०२३५२ - २२२३१० किंवा ०२३५२ - २२२१४४ या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करण्याचे आवाहन नगर परिषदेने केले आहे.

-------------------------

माेजक्याच लाेकांनी उपस्थित राहावे

ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांनीही विसर्जन घाटावरील गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी प्रत्येक गावातील वाडीसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. मिरवणुकांना तर बंदीच आहे. शिवाय घरातील मोजक्या तीन ते चार व्यक्तींनीच जाऊन गणेशमूूर्तीचे विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सिंग राखण्याबरोबर मास्क वापरण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. शासनाच्या नियमांचे पालन स्थानिक जनतेने करावे, यासाठी गावपातळीवरील ग्राम कृती दलेही कार्यरत आहेत.