शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

मोबदला घेणाऱ्यांची बांधकामे तत्काळ हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:31 IST

पाली : ज्यांनी जमिनीचा मोबदला घेऊनही आपली बांधकामे हटविलेली नाहीत, अशी बांधकामे तत्काळ हटवा. प्रसंगी पोलीस बंदोबस्त घ्या, अशी ...

पाली : ज्यांनी जमिनीचा मोबदला घेऊनही आपली बांधकामे हटविलेली नाहीत, अशी बांधकामे तत्काळ हटवा. प्रसंगी पोलीस बंदोबस्त घ्या, अशी सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.

निवळी ते लांजा नगरपंचायत हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण कामाची आढावा बैठक उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पाली ग्रामपंचायत सभागृहात झाली. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, लांजाचे नगराध्यक्ष मनोहर बाईत, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते महंमद रखांगी, विभागप्रमुख तात्या सावंत, पालीचे सरपंच विठ्ठल सावंत, उपसरपंच संतोष धाडवे, पाली गावचे मुख्य मानकरी अभियंता संतोष सावंतदेसाई, पाली ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, तसेच वरील भागातील गावांचे सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवळी ते लांजा विभागातील महामार्गावरील बाधित गावांच्या सरपंच व ग्रामस्थांनी चौपदरीकरणाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या अडचणींविषयी उदय सामंत यांच्याकडे आपली कैफियत मांडली. त्या सर्व तक्रारी ऐकून मंत्री सामंत यांनी तत्काळ त्या-त्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तेथेच निराकरण करून घेतले. यावेळी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली. काहींकडून ती न मिळाल्याने त्यांना योग्य ती समज देण्यात आली व तत्काळ कारवाई करून या तक्रारींचे निराकरण करण्याचे फर्मान सोडले.

भूसंपादन विषयक प्रलंबित निवाडे तातडीने करून मोबदला वेळीच देण्यात यावा. महामार्गामुळे बाधित होणाऱ्या नळपाणी योजनांच्या पाइपलाइनचे काम प्राधान्याने सुरू करावे. या कामावर जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वेळीच पूर्ण करावे. ग्रामस्थांच्या भूसंपादनाबाबत तक्रार असेल, तर शासकीय यंत्रणेकडून मोजणी करून तक्रार निवारण करणे, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक लाइनचे पोल योग्य अंतरावर आहेत का, याचे सर्वेक्षण करून स्ट्रीट लाइटची सर्व्हिस लाइन टाकून घ्यावी, अशा सूचना मंत्री सामंत यांनी दिल्या.

निवळी तारवेवाडी येथील ग्रामस्थांनी मागणी केल्याप्रकरणी अंडरपास करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावा. अनेक ठिकाणी महामार्गामुळे गाव दोन भागांत विभागल्याने शेतीवाडी, रहदारी, तसेच विद्यार्थ्यांना मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशा निवळी रावणंगवाडी, तारवेवाडी, पाली, खानू, मठ, आंजणारी, वेरळ, आयटीआय लांजा, वाकेड या ठिकाणी अंडरपास रस्त्याचे नियोजन करावे. ज्यांनी मोबदला घेऊनही आपली बांधकामे हटवली नाहीत, अशी बांधकामे तत्काळ हटवा, अशी सूचनाही त्यांनी केली. पाली तिठ्यावरील शिवाजी पुतळा परिसराचे सुशोभीकरण करून अश्वारूढ पुतळा बसविण्यासंदर्भात नियोजन करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.