शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

मोबदला घेणाऱ्यांची बांधकामे तत्काळ हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:31 IST

पाली : ज्यांनी जमिनीचा मोबदला घेऊनही आपली बांधकामे हटविलेली नाहीत, अशी बांधकामे तत्काळ हटवा. प्रसंगी पोलीस बंदोबस्त घ्या, अशी ...

पाली : ज्यांनी जमिनीचा मोबदला घेऊनही आपली बांधकामे हटविलेली नाहीत, अशी बांधकामे तत्काळ हटवा. प्रसंगी पोलीस बंदोबस्त घ्या, अशी सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.

निवळी ते लांजा नगरपंचायत हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण कामाची आढावा बैठक उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पाली ग्रामपंचायत सभागृहात झाली. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, लांजाचे नगराध्यक्ष मनोहर बाईत, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते महंमद रखांगी, विभागप्रमुख तात्या सावंत, पालीचे सरपंच विठ्ठल सावंत, उपसरपंच संतोष धाडवे, पाली गावचे मुख्य मानकरी अभियंता संतोष सावंतदेसाई, पाली ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, तसेच वरील भागातील गावांचे सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवळी ते लांजा विभागातील महामार्गावरील बाधित गावांच्या सरपंच व ग्रामस्थांनी चौपदरीकरणाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या अडचणींविषयी उदय सामंत यांच्याकडे आपली कैफियत मांडली. त्या सर्व तक्रारी ऐकून मंत्री सामंत यांनी तत्काळ त्या-त्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तेथेच निराकरण करून घेतले. यावेळी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली. काहींकडून ती न मिळाल्याने त्यांना योग्य ती समज देण्यात आली व तत्काळ कारवाई करून या तक्रारींचे निराकरण करण्याचे फर्मान सोडले.

भूसंपादन विषयक प्रलंबित निवाडे तातडीने करून मोबदला वेळीच देण्यात यावा. महामार्गामुळे बाधित होणाऱ्या नळपाणी योजनांच्या पाइपलाइनचे काम प्राधान्याने सुरू करावे. या कामावर जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वेळीच पूर्ण करावे. ग्रामस्थांच्या भूसंपादनाबाबत तक्रार असेल, तर शासकीय यंत्रणेकडून मोजणी करून तक्रार निवारण करणे, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक लाइनचे पोल योग्य अंतरावर आहेत का, याचे सर्वेक्षण करून स्ट्रीट लाइटची सर्व्हिस लाइन टाकून घ्यावी, अशा सूचना मंत्री सामंत यांनी दिल्या.

निवळी तारवेवाडी येथील ग्रामस्थांनी मागणी केल्याप्रकरणी अंडरपास करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावा. अनेक ठिकाणी महामार्गामुळे गाव दोन भागांत विभागल्याने शेतीवाडी, रहदारी, तसेच विद्यार्थ्यांना मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशा निवळी रावणंगवाडी, तारवेवाडी, पाली, खानू, मठ, आंजणारी, वेरळ, आयटीआय लांजा, वाकेड या ठिकाणी अंडरपास रस्त्याचे नियोजन करावे. ज्यांनी मोबदला घेऊनही आपली बांधकामे हटवली नाहीत, अशी बांधकामे तत्काळ हटवा, अशी सूचनाही त्यांनी केली. पाली तिठ्यावरील शिवाजी पुतळा परिसराचे सुशोभीकरण करून अश्वारूढ पुतळा बसविण्यासंदर्भात नियोजन करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.