शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

मोबदला घेणाऱ्यांची बांधकामे तत्काळ हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:31 IST

पाली : ज्यांनी जमिनीचा मोबदला घेऊनही आपली बांधकामे हटविलेली नाहीत, अशी बांधकामे तत्काळ हटवा. प्रसंगी पोलीस बंदोबस्त घ्या, अशी ...

पाली : ज्यांनी जमिनीचा मोबदला घेऊनही आपली बांधकामे हटविलेली नाहीत, अशी बांधकामे तत्काळ हटवा. प्रसंगी पोलीस बंदोबस्त घ्या, अशी सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.

निवळी ते लांजा नगरपंचायत हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण कामाची आढावा बैठक उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पाली ग्रामपंचायत सभागृहात झाली. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, लांजाचे नगराध्यक्ष मनोहर बाईत, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते महंमद रखांगी, विभागप्रमुख तात्या सावंत, पालीचे सरपंच विठ्ठल सावंत, उपसरपंच संतोष धाडवे, पाली गावचे मुख्य मानकरी अभियंता संतोष सावंतदेसाई, पाली ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, तसेच वरील भागातील गावांचे सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवळी ते लांजा विभागातील महामार्गावरील बाधित गावांच्या सरपंच व ग्रामस्थांनी चौपदरीकरणाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या अडचणींविषयी उदय सामंत यांच्याकडे आपली कैफियत मांडली. त्या सर्व तक्रारी ऐकून मंत्री सामंत यांनी तत्काळ त्या-त्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तेथेच निराकरण करून घेतले. यावेळी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली. काहींकडून ती न मिळाल्याने त्यांना योग्य ती समज देण्यात आली व तत्काळ कारवाई करून या तक्रारींचे निराकरण करण्याचे फर्मान सोडले.

भूसंपादन विषयक प्रलंबित निवाडे तातडीने करून मोबदला वेळीच देण्यात यावा. महामार्गामुळे बाधित होणाऱ्या नळपाणी योजनांच्या पाइपलाइनचे काम प्राधान्याने सुरू करावे. या कामावर जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वेळीच पूर्ण करावे. ग्रामस्थांच्या भूसंपादनाबाबत तक्रार असेल, तर शासकीय यंत्रणेकडून मोजणी करून तक्रार निवारण करणे, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक लाइनचे पोल योग्य अंतरावर आहेत का, याचे सर्वेक्षण करून स्ट्रीट लाइटची सर्व्हिस लाइन टाकून घ्यावी, अशा सूचना मंत्री सामंत यांनी दिल्या.

निवळी तारवेवाडी येथील ग्रामस्थांनी मागणी केल्याप्रकरणी अंडरपास करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावा. अनेक ठिकाणी महामार्गामुळे गाव दोन भागांत विभागल्याने शेतीवाडी, रहदारी, तसेच विद्यार्थ्यांना मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशा निवळी रावणंगवाडी, तारवेवाडी, पाली, खानू, मठ, आंजणारी, वेरळ, आयटीआय लांजा, वाकेड या ठिकाणी अंडरपास रस्त्याचे नियोजन करावे. ज्यांनी मोबदला घेऊनही आपली बांधकामे हटवली नाहीत, अशी बांधकामे तत्काळ हटवा, अशी सूचनाही त्यांनी केली. पाली तिठ्यावरील शिवाजी पुतळा परिसराचे सुशोभीकरण करून अश्वारूढ पुतळा बसविण्यासंदर्भात नियोजन करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.