शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
2
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
3
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
6
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
7
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
8
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
9
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
10
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
11
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
12
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
13
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
14
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
15
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी
16
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
17
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
18
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
19
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
20
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार

मोबदला घेणाऱ्यांची बांधकामे तत्काळ हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:31 IST

पाली : ज्यांनी जमिनीचा मोबदला घेऊनही आपली बांधकामे हटविलेली नाहीत, अशी बांधकामे तत्काळ हटवा. प्रसंगी पोलीस बंदोबस्त घ्या, अशी ...

पाली : ज्यांनी जमिनीचा मोबदला घेऊनही आपली बांधकामे हटविलेली नाहीत, अशी बांधकामे तत्काळ हटवा. प्रसंगी पोलीस बंदोबस्त घ्या, अशी सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.

निवळी ते लांजा नगरपंचायत हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण कामाची आढावा बैठक उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पाली ग्रामपंचायत सभागृहात झाली. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, लांजाचे नगराध्यक्ष मनोहर बाईत, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते महंमद रखांगी, विभागप्रमुख तात्या सावंत, पालीचे सरपंच विठ्ठल सावंत, उपसरपंच संतोष धाडवे, पाली गावचे मुख्य मानकरी अभियंता संतोष सावंतदेसाई, पाली ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, तसेच वरील भागातील गावांचे सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवळी ते लांजा विभागातील महामार्गावरील बाधित गावांच्या सरपंच व ग्रामस्थांनी चौपदरीकरणाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या अडचणींविषयी उदय सामंत यांच्याकडे आपली कैफियत मांडली. त्या सर्व तक्रारी ऐकून मंत्री सामंत यांनी तत्काळ त्या-त्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तेथेच निराकरण करून घेतले. यावेळी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली. काहींकडून ती न मिळाल्याने त्यांना योग्य ती समज देण्यात आली व तत्काळ कारवाई करून या तक्रारींचे निराकरण करण्याचे फर्मान सोडले.

भूसंपादन विषयक प्रलंबित निवाडे तातडीने करून मोबदला वेळीच देण्यात यावा. महामार्गामुळे बाधित होणाऱ्या नळपाणी योजनांच्या पाइपलाइनचे काम प्राधान्याने सुरू करावे. या कामावर जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वेळीच पूर्ण करावे. ग्रामस्थांच्या भूसंपादनाबाबत तक्रार असेल, तर शासकीय यंत्रणेकडून मोजणी करून तक्रार निवारण करणे, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक लाइनचे पोल योग्य अंतरावर आहेत का, याचे सर्वेक्षण करून स्ट्रीट लाइटची सर्व्हिस लाइन टाकून घ्यावी, अशा सूचना मंत्री सामंत यांनी दिल्या.

निवळी तारवेवाडी येथील ग्रामस्थांनी मागणी केल्याप्रकरणी अंडरपास करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावा. अनेक ठिकाणी महामार्गामुळे गाव दोन भागांत विभागल्याने शेतीवाडी, रहदारी, तसेच विद्यार्थ्यांना मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशा निवळी रावणंगवाडी, तारवेवाडी, पाली, खानू, मठ, आंजणारी, वेरळ, आयटीआय लांजा, वाकेड या ठिकाणी अंडरपास रस्त्याचे नियोजन करावे. ज्यांनी मोबदला घेऊनही आपली बांधकामे हटवली नाहीत, अशी बांधकामे तत्काळ हटवा, अशी सूचनाही त्यांनी केली. पाली तिठ्यावरील शिवाजी पुतळा परिसराचे सुशोभीकरण करून अश्वारूढ पुतळा बसविण्यासंदर्भात नियोजन करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.