शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
6
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
7
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
8
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
9
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
10
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
11
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
12
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
13
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
14
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
17
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
18
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
19
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
20
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?

मी अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:21 IST

घरातून बाहेर पडलं की उजव्या अंगाला सगळी भाताची शेती. डाव्या अंगांनी सरळ वाटेने वरच्या अंगाने जायचं मग लागतो ...

घरातून बाहेर पडलं की उजव्या अंगाला सगळी भाताची शेती. डाव्या अंगांनी सरळ वाटेने वरच्या अंगाने जायचं मग लागतो मांड किंवा दत्ताचे देऊळ. त्याला वळसा घालून रेल्वेच्या रुळावरुन उजवीकडे चालायला लागलं की समुद्राची गाज ऐकायला येते. कोपऱ्यात दिसते काणेकरचे दुकान. फळीवर दिसतात थंड झालेली कांद्याची भजी आणि बरणीत ठेवलले खदखडे लाडू. २ - ४ रिकामे लोक चहाच्या निमित्ताने उभे असतात. तसेच पुढे पाच-दहा मिनिटे चालत गेलं की होते सागर दर्शन. समुद्राचा सुक्या मासळीचा वास, खारा वारा, क्षितिजापर्यंत पसरलेली निळाई, किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा बघून मन भारावून जाते.

माझे बालपण याच गावात गेले, माझी नाळ या गावाशी जोडलेली आहे. बालपणी या मोकळ्या हवेत मनसोक्त हुंदडायला, बागडायला मिळालं हे माझे भाग्यच. शालेय शिक्षणासाठी मला मुंबईला पाठवण्यात आलं. हिरव्यागार कोंदणात असलेल्या घरातून माझी रवानगी मुंबईच्या चाळीत झाली. मुंबईला ‘सीटी ऑफ ड्रीम्स’ म्हणतात ते उगाच नाही. मुंबई तुम्हाला आमुलाग्र बदलून टाकते. तुमच्या मनात नवीन आशा उमलतात, डोळ्यात नवीन स्वप्ने उतरू लागतात. करिअरची घोडदौड सुरू झाली. इंजिनिअर होऊन एका प्रतिथयश कंपनीत नोकरी मिळाली, तेव्हा तर जग जिंकल्याचा आनंद झाला. मुंबईतल्या मुलीशीच लग्न झाले. कौटुंबिक, कार्यालयीन जबाबदाऱ्या वाढायला लागल्या. कामामध्ये पूर्णपणे झोकून दिले. यशाच्या पायऱ्या चढत गेलो. स्वतःच्या घरात लवकरच पदार्पण केलं. एकामागून एक स्वप्न पूर्ण होत होती. मी आता पक्का मुंबईकर झालो.

कामाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर, देशभर आणि जगभरात फिरणे झाले. कोकणापासून कलिफॉर्नियापर्यंत प्रवास झाला. परदेशातील गगनचुंबी इमारती, समृद्धी, तेथील जीवनशैली, भव्य मॉल्स, पोटातील पाणी पण हलणार नाही असे रस्ते, हे सगळं छानच आहे, पण मी त्याने भारावून नाही गेलो. अनुभवाच्या, जाणीवेच्या कक्षा विस्तारत गेल्या. निरनिराळ्या प्रदेशातील लोकांचे आचार-विचार, त्यांची जीवनपद्धती, त्यांची घरे, चालीरिती यांची ओळख झाली. मुंबईमध्ये कामाचा व्याप खूप वाढल्याने गावी वर्षातून फक्त एकदा-दोनदा जाणं होतं. मुंबईच्या गॅलरीमधून दिसणारे चांदणे बघून कधी कधी वाटतं,

‘किती तरी दिवसात नाही चांदण्यात गेलो

किती तरी दिवसात नाही नदीत डुंबलो’

आंबा, फणसाचा वास आला की गावाची आठवण येत राहते. गाव बोलावत आहे, असे वाटत राहते.

गेल्यावर्षी अमेरिकेला सनहोजे येथे मुलीच्या घरी गेलो होतो. येथे तिचा स्वतःचा मोठा आलिशान बंगला बघून, केलेल्या सगळ्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटलं. काही दिवसांनी मात्र मुंबईची, घराची आठवण यायला लागली. ‘लेकीकडे जाईन, तूपरोटी खाईन’ असं म्हणत सुरू केलेला मुक्काम संपला आणि मी मुंबईला परतलो. मुंबईमध्ये पोहोचल्याबरोबर मुंबईचे ट्रॅफिक, गोंगाट, प्रदूषण, गर्दी, वास येताच मला घरी आल्याचा आनंद झाला.

आजकाल जेव्हा मी माझ्या जीवन प्रवासाबद्दल विचार करतो, तेव्हा मी अधांतरी असल्याची भावना आहे. मुंबई माझी कर्मभूमी. मुंबईत कमावलेले नाव आहे, सामाजिक प्रतिष्ठा आहे, वाढवलेला पसारा आहे. सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असलेलं आणि आनंदी कुटुंब असलेले स्वीट होम आहे. मुंबईतील सुखसुविधा, दिमतीला कार, टोलेजंग मॉल, फोन करताच कोणतीही वस्तू घरपोच मागविण्याची सुविधा, उत्तम मेडिकल सेवा यामुळे मुंबई माझा कम्फर्ट झोन आहे. मध्यंतरी आईचे मोठे ऑपरेशन झाले. मुंबईमध्ये असल्यानेच तिचे ऑपरेशन यशस्वी झाले, याची जाणीव आहे. गेले पन्नास वर्ष मुंबईने मला जे हवे ते सर्व दिले आहे.

मात्र वेडे मन ओढ घेते गावाकडे. मुंबईच्या मानाने गावी सुविधा कमी आहेत. शहरीकरण झालेले नाही. लोडशेडींग असते. मोबाईलला रेंज नसते, तरीही आनंदात राहता येते. अशा अनेक गोष्टी आहेत. तरीसुद्धा माझे मन गावीच रमते. मी याच मातीतला याची प्रकर्षाने जाणीव होते. गड्या आपुला गाव बरा...

- डॉ. मिलिंद दळवी, तळेगाव, मालवण