शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मी अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:21 IST

घरातून बाहेर पडलं की उजव्या अंगाला सगळी भाताची शेती. डाव्या अंगांनी सरळ वाटेने वरच्या अंगाने जायचं मग लागतो ...

घरातून बाहेर पडलं की उजव्या अंगाला सगळी भाताची शेती. डाव्या अंगांनी सरळ वाटेने वरच्या अंगाने जायचं मग लागतो मांड किंवा दत्ताचे देऊळ. त्याला वळसा घालून रेल्वेच्या रुळावरुन उजवीकडे चालायला लागलं की समुद्राची गाज ऐकायला येते. कोपऱ्यात दिसते काणेकरचे दुकान. फळीवर दिसतात थंड झालेली कांद्याची भजी आणि बरणीत ठेवलले खदखडे लाडू. २ - ४ रिकामे लोक चहाच्या निमित्ताने उभे असतात. तसेच पुढे पाच-दहा मिनिटे चालत गेलं की होते सागर दर्शन. समुद्राचा सुक्या मासळीचा वास, खारा वारा, क्षितिजापर्यंत पसरलेली निळाई, किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा बघून मन भारावून जाते.

माझे बालपण याच गावात गेले, माझी नाळ या गावाशी जोडलेली आहे. बालपणी या मोकळ्या हवेत मनसोक्त हुंदडायला, बागडायला मिळालं हे माझे भाग्यच. शालेय शिक्षणासाठी मला मुंबईला पाठवण्यात आलं. हिरव्यागार कोंदणात असलेल्या घरातून माझी रवानगी मुंबईच्या चाळीत झाली. मुंबईला ‘सीटी ऑफ ड्रीम्स’ म्हणतात ते उगाच नाही. मुंबई तुम्हाला आमुलाग्र बदलून टाकते. तुमच्या मनात नवीन आशा उमलतात, डोळ्यात नवीन स्वप्ने उतरू लागतात. करिअरची घोडदौड सुरू झाली. इंजिनिअर होऊन एका प्रतिथयश कंपनीत नोकरी मिळाली, तेव्हा तर जग जिंकल्याचा आनंद झाला. मुंबईतल्या मुलीशीच लग्न झाले. कौटुंबिक, कार्यालयीन जबाबदाऱ्या वाढायला लागल्या. कामामध्ये पूर्णपणे झोकून दिले. यशाच्या पायऱ्या चढत गेलो. स्वतःच्या घरात लवकरच पदार्पण केलं. एकामागून एक स्वप्न पूर्ण होत होती. मी आता पक्का मुंबईकर झालो.

कामाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर, देशभर आणि जगभरात फिरणे झाले. कोकणापासून कलिफॉर्नियापर्यंत प्रवास झाला. परदेशातील गगनचुंबी इमारती, समृद्धी, तेथील जीवनशैली, भव्य मॉल्स, पोटातील पाणी पण हलणार नाही असे रस्ते, हे सगळं छानच आहे, पण मी त्याने भारावून नाही गेलो. अनुभवाच्या, जाणीवेच्या कक्षा विस्तारत गेल्या. निरनिराळ्या प्रदेशातील लोकांचे आचार-विचार, त्यांची जीवनपद्धती, त्यांची घरे, चालीरिती यांची ओळख झाली. मुंबईमध्ये कामाचा व्याप खूप वाढल्याने गावी वर्षातून फक्त एकदा-दोनदा जाणं होतं. मुंबईच्या गॅलरीमधून दिसणारे चांदणे बघून कधी कधी वाटतं,

‘किती तरी दिवसात नाही चांदण्यात गेलो

किती तरी दिवसात नाही नदीत डुंबलो’

आंबा, फणसाचा वास आला की गावाची आठवण येत राहते. गाव बोलावत आहे, असे वाटत राहते.

गेल्यावर्षी अमेरिकेला सनहोजे येथे मुलीच्या घरी गेलो होतो. येथे तिचा स्वतःचा मोठा आलिशान बंगला बघून, केलेल्या सगळ्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटलं. काही दिवसांनी मात्र मुंबईची, घराची आठवण यायला लागली. ‘लेकीकडे जाईन, तूपरोटी खाईन’ असं म्हणत सुरू केलेला मुक्काम संपला आणि मी मुंबईला परतलो. मुंबईमध्ये पोहोचल्याबरोबर मुंबईचे ट्रॅफिक, गोंगाट, प्रदूषण, गर्दी, वास येताच मला घरी आल्याचा आनंद झाला.

आजकाल जेव्हा मी माझ्या जीवन प्रवासाबद्दल विचार करतो, तेव्हा मी अधांतरी असल्याची भावना आहे. मुंबई माझी कर्मभूमी. मुंबईत कमावलेले नाव आहे, सामाजिक प्रतिष्ठा आहे, वाढवलेला पसारा आहे. सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असलेलं आणि आनंदी कुटुंब असलेले स्वीट होम आहे. मुंबईतील सुखसुविधा, दिमतीला कार, टोलेजंग मॉल, फोन करताच कोणतीही वस्तू घरपोच मागविण्याची सुविधा, उत्तम मेडिकल सेवा यामुळे मुंबई माझा कम्फर्ट झोन आहे. मध्यंतरी आईचे मोठे ऑपरेशन झाले. मुंबईमध्ये असल्यानेच तिचे ऑपरेशन यशस्वी झाले, याची जाणीव आहे. गेले पन्नास वर्ष मुंबईने मला जे हवे ते सर्व दिले आहे.

मात्र वेडे मन ओढ घेते गावाकडे. मुंबईच्या मानाने गावी सुविधा कमी आहेत. शहरीकरण झालेले नाही. लोडशेडींग असते. मोबाईलला रेंज नसते, तरीही आनंदात राहता येते. अशा अनेक गोष्टी आहेत. तरीसुद्धा माझे मन गावीच रमते. मी याच मातीतला याची प्रकर्षाने जाणीव होते. गड्या आपुला गाव बरा...

- डॉ. मिलिंद दळवी, तळेगाव, मालवण