शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
2
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
3
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
4
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
5
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
6
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
7
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
8
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
9
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
10
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
12
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
13
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
14
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले
15
दिल्लीतील JNU मधील देवेंद्र फणडवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचं आंदोलन, महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी गुप्तचर संस्थेत नोकरी; मुंबई, नागपूरसाठी 'इतक्या' जागा राखीव!
17
Rishabh Pant Fifty : भारताच्या 'जखमी वाघा'ची डरकाळी! लढवय्या पंतनं ठोकली सॉलिड फिफ्टी
18
₹1600 वर पोहोचू शकतो इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या कंपनीचा शेअर, खरेदीसाठी उडालीय लोकांची झुंबड; करतोय मालामाल!
19
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टात जामीन
20
वाघाच्या काळजाचा! जखमी असूनही इंग्लंडशी भिडला, मँचेस्टरमध्ये पंतची विक्रमी खेळी

जिल्ह्यासाठी पुरवठा वाढला तर डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : डिसेंबरपर्यंत कोरोना लसीकरण पूर्ण केले जाईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. जिल्ह्याची सद्यस्थिती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : डिसेंबरपर्यंत कोरोना लसीकरण पूर्ण केले जाईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. जिल्ह्याची सद्यस्थिती पाहता अजूनही ४० ते ४५ टक्के लसीकरण होणे बाकी आहे. त्यामुळे सध्या लसीचा होणारा अपुरा पुरवठा पाहता ही डेडलाईन जिल्हा प्रशासनाला पाळणे अवघड आहे. मात्र, आता दिवसाला १५ हजार डोस देण्याची क्षमता जिल्ह्याची असल्याने लस त्या प्रमाणात उपलब्ध झाल्यास डिसेंबर २०२१पर्यंत लसीकरण पूर्ण होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाला वाटत आहे.

जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्ती ६ लाख ३२ हजार तर ४५ आणि त्यापुढील व्यक्ती ४ लाख ५७ हजार इतक्या आहेत. २८ मेपर्यंत १८ ते ४४ वयोगटातील २६ हजार व्यक्तींनी पहिला डोस घेतला असून, ४५ आणि त्यापुढील १ लाख २६ हजार ९९२ व्यक्तींनी पहिला डोस घेतला आहे. म्हणजे आतापर्यंत दीड लाख व्यक्तींनाच पहिला डोस मिळाला आहे. साडेनऊ लाख व्यक्तींना अजूनही पहिल्या डोसची प्रतीक्षा आहे.

सध्या जिल्ह्याला दोन्हीही लसीचे डोस मोठ्या प्रमाणावर मिळत आहेत. त्यामुळे दिवसाला अगदी १५,००० व्यक्तींना लसीकरण करण्याची जिल्ह्याची क्षमता आहे. त्यामुळे यापुढेही योग्यप्रकारे लस उपलब्ध झाल्यास अगदी अडीच ते तीन महिन्यात लसीकरण पूर्ण होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाला आहे.

१८पेक्षा कमी वयाचे काय?

जिल्ह्यासह राज्यात १ मेपासून १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींना लसीकरण करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत या वयोगटातील २६,०२९ व्यक्तींना कोरोना डोस देण्यात आला आहे.

परंतु, ४५ आणि त्यापुढील व्यक्तींना लस देण्यास प्राधान्य देण्यात आल्याने १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरूवात होताच या वयोगटासाठी लस अपुरी पडली.

लसचा पुरवठा कमी झाल्याने १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण थांबवले आहे. या वयोगटातील ६,३२,०००पैकी केवळ २९,००० व्यक्तींनाच पहिला डोस मिळाला असल्याने उर्वरितांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

आधी १०९ केंद्रे होती, आता केवळ १४

जिल्ह्याला सुरूवातीला मोठ्या प्रमाणावर कोविशिल्ड तसेच कोव्हॅक्सिन या दोन लसींचे डोस मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले होते. त्यामुळे सुरूवातीला जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालये आदी १०९ केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविण्यात येत होती. मात्र, लसीचा पुरवठा कमी झाल्याने जिल्ह्यात केवळ १४ केंद्रांवरच सध्या लसीकरण सुरू आहे. .

मध्यंतरी लसचा पुरवठा कमी झाला होता. मात्र, आता जेवढा येतो, तेवढा त्याचदिवशी संपविण्यात येतो. त्यामुळे आता राज्याकडून येणारा पुरवठाही वाढला आहे. काही दिवसांपूर्वी एका दिवसात १५,००० डोस दिले गेले. त्यामुळे या प्रमाणात पुरवठा झाला तर नक्कीच डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होईल.

- डॉ. इंदुराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी