शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यासाठी पुरवठा वाढला तर डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : डिसेंबरपर्यंत कोरोना लसीकरण पूर्ण केले जाईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. जिल्ह्याची सद्यस्थिती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : डिसेंबरपर्यंत कोरोना लसीकरण पूर्ण केले जाईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. जिल्ह्याची सद्यस्थिती पाहता अजूनही ४० ते ४५ टक्के लसीकरण होणे बाकी आहे. त्यामुळे सध्या लसीचा होणारा अपुरा पुरवठा पाहता ही डेडलाईन जिल्हा प्रशासनाला पाळणे अवघड आहे. मात्र, आता दिवसाला १५ हजार डोस देण्याची क्षमता जिल्ह्याची असल्याने लस त्या प्रमाणात उपलब्ध झाल्यास डिसेंबर २०२१पर्यंत लसीकरण पूर्ण होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाला वाटत आहे.

जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्ती ६ लाख ३२ हजार तर ४५ आणि त्यापुढील व्यक्ती ४ लाख ५७ हजार इतक्या आहेत. २८ मेपर्यंत १८ ते ४४ वयोगटातील २६ हजार व्यक्तींनी पहिला डोस घेतला असून, ४५ आणि त्यापुढील १ लाख २६ हजार ९९२ व्यक्तींनी पहिला डोस घेतला आहे. म्हणजे आतापर्यंत दीड लाख व्यक्तींनाच पहिला डोस मिळाला आहे. साडेनऊ लाख व्यक्तींना अजूनही पहिल्या डोसची प्रतीक्षा आहे.

सध्या जिल्ह्याला दोन्हीही लसीचे डोस मोठ्या प्रमाणावर मिळत आहेत. त्यामुळे दिवसाला अगदी १५,००० व्यक्तींना लसीकरण करण्याची जिल्ह्याची क्षमता आहे. त्यामुळे यापुढेही योग्यप्रकारे लस उपलब्ध झाल्यास अगदी अडीच ते तीन महिन्यात लसीकरण पूर्ण होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाला आहे.

१८पेक्षा कमी वयाचे काय?

जिल्ह्यासह राज्यात १ मेपासून १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींना लसीकरण करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत या वयोगटातील २६,०२९ व्यक्तींना कोरोना डोस देण्यात आला आहे.

परंतु, ४५ आणि त्यापुढील व्यक्तींना लस देण्यास प्राधान्य देण्यात आल्याने १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरूवात होताच या वयोगटासाठी लस अपुरी पडली.

लसचा पुरवठा कमी झाल्याने १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण थांबवले आहे. या वयोगटातील ६,३२,०००पैकी केवळ २९,००० व्यक्तींनाच पहिला डोस मिळाला असल्याने उर्वरितांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

आधी १०९ केंद्रे होती, आता केवळ १४

जिल्ह्याला सुरूवातीला मोठ्या प्रमाणावर कोविशिल्ड तसेच कोव्हॅक्सिन या दोन लसींचे डोस मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले होते. त्यामुळे सुरूवातीला जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालये आदी १०९ केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविण्यात येत होती. मात्र, लसीचा पुरवठा कमी झाल्याने जिल्ह्यात केवळ १४ केंद्रांवरच सध्या लसीकरण सुरू आहे. .

मध्यंतरी लसचा पुरवठा कमी झाला होता. मात्र, आता जेवढा येतो, तेवढा त्याचदिवशी संपविण्यात येतो. त्यामुळे आता राज्याकडून येणारा पुरवठाही वाढला आहे. काही दिवसांपूर्वी एका दिवसात १५,००० डोस दिले गेले. त्यामुळे या प्रमाणात पुरवठा झाला तर नक्कीच डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होईल.

- डॉ. इंदुराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी