शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
3
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
4
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
5
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
6
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
7
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
8
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
9
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
10
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
11
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
12
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
13
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
14
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
15
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
16
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
17
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
18
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
19
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
20
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
Daily Top 2Weekly Top 5

सेना-भाजप युती असती तर...

By admin | Updated: October 21, 2014 23:39 IST

विधानसभा निवडणूक : हार-जीतनंतर आता चर्चांना उधाण, जिल्ह्यात दिसले असते वेगळे चित्र!

रत्नागिरी : आत्याला मिशा असत्या तर... ही म्हण कितीही उजळली गेली तरी कुठल्याही निवडणुका झाल्यानंतर ‘जर-तर’ची गणिते चर्चिली जातात. सरकारी कार्यालय असो, व्हॉटस् अ‍ॅपचा कट्टा असो किंवा पारावरच्या गप्पा असोत. जिकडे-तिकडे जर-तरच्या गप्पांना उत येतो. अशाच गप्पा आता शिवसेना-भाजप युतीशी संबंधित सुरू झाल्या आहेत. जर हे दोन पक्ष वेगळे झाले नसते तर महाराष्ट्रात आज वेगळेच चित्र बघायला मिळाले असते. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या दोन जागा राष्ट्रवादीने आपल्याकडे घेतल्या आहेत, त्याही युतीलाच मिळाल्या असत्या आणि रत्नागिरी जिल्ह्यात भगवा आणखीनच डौलाने फडकला असता, असाच सूर आता उमटत आहे.बंडखोरी झाली आणि जागा गमावली, असे चित्र जिल्ह्यात याआधीही पाहायला मिळाले आहे. काँग्रेसबाबत हा प्रकार अनेकदा पाहायला मिळाला आहे. मित्रपक्षाच्या उमेदवाराविरोधात अपक्ष म्हणून उभे राहण्याचा प्रकारही नवीन नाही. पण शिवसेना आणि भाजप हे अनेक वर्षांचे दोन मित्रपक्ष एकमेकांविरोधात उभे राहतील, असे अपेक्षितच नव्हते आणि या निवडणुकीत ते पाहायला मिळाले.जिल्ह्यातील सध्याच्या पाच मतदार संघांमधील रत्नागिरी आणि गुहागर या दोन जागा भाजपच्या वाट्याला येत होत्या. त्यामुळे भाजपची जी काही वाढ झाली ती या दोन मतदार संघांमध्येच झाली. इतर तालुक्यांमध्ये भाजप अस्तित्त्वात असली तरी ती फार मोठी नव्हती. या दोन जागांपैकी रत्नागिरीतील पक्षांतर सेनेच्या पथ्यावर पडले. पण गुहागर आणि दापोली या दोन जागा मात्र शिवसेनेला मिळवता आल्या नाहीत. जर शिवसेना-भाजप युती असती तर या चित्रात फरक पडला असता.दापोलीत राष्ट्रवादीचे संजय कदम ३ हजार २६४ मतांनी विजयी झाले. येथे भाजपच्या केदार साठे यांना १३ हजार ८७५ मते मिळाली. ही मते जर सेनेच्या सूर्यकांत दळवी यांना मिळाली असती तर काँग्रेस आघाडीपेक्षाही त्यांची मते अधिक होती. त्यामुळे येथे युतीचा विजयी सहज होता.गुहागर मतदार संघात राष्ट्रवादीच्या भास्कर जाधव यांनी एकहाती दणदणीत लढत दिली आहे. त्यांना ७२ हजार ५२५ मते मिळाली. गेल्या पाच वर्षात त्यांनी आपले मताधिक्य खूपच वाढवले आहे. भाजपचे डॉ. विनय नातू यांना ३९ हजार ७६१ आणि शिवसेनेच्या विजयकुमार भोसले यांना ३२ हजार ८२ मते मिळाली. म्हणजेच युतीची मते ७१ हजार ८४४ इतकी होत आहेत. जाधव यांची मते यापेक्षा अधिक आहेत. पण युती असती तर गुहागरमधील मते नक्कीच वाढली असती. त्यामुळे युतीला ही जागा मिळवण्याचीही संधी होती. अर्थात युती झाली नाही त्यामुळे शिवसेनेला पाचऐवजी तीन जागांवरच समाधान मानावे लागले आहे आणि भाजपला एकही जागा मिळालेली नाही. (प्रतिनिधी)सामान्य कार्यकर्त्यांना युती हवी होती..शिवसेना-भाजप युती तोडण्याचा निर्णय राज्यस्तरावर घेण्यात आला. मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना युती हवी होती. युती तोडण्याच्या निर्णयाबद्दल अनेकांनी नापसंती व्यक्त केली. मात्र पक्षाचा निर्णय मान्य करावा लागल्याने दोन्ही पक्षांना तोटा सहन करावा लागला आहे आणि त्याचे परिणाम दीर्घकाळ सोसावे लागणार आहेत.