शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

आयडियाची कल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:32 IST

पाय मोकळे करण्यासाठी आम्ही पोलिसांच्या नजरा चुकवत चुकवत, पटांगणात कोपऱ्यात असलेल्या एका सिमेंटच्या बाकड्यावर येऊन बसलो होतो. या लॉकडाऊनमुळे ...

पाय मोकळे करण्यासाठी आम्ही पोलिसांच्या नजरा चुकवत चुकवत, पटांगणात कोपऱ्यात असलेल्या एका सिमेंटच्या बाकड्यावर येऊन बसलो होतो. या लॉकडाऊनमुळे आपल्याला कुठे जाता येत नाही अन् कोणाला आपल्याकडे येता येत नाही. लस घेतल्याशिवाय काही करता येत नाही. अशा अवस्थेमध्ये आम्ही होतो. तेवढ्यात विजारीच्या खिशात हात घालून बंडोपंत आमच्यासमोर साक्षात देवासारखे उभे राहिले. आम्ही उसने हसून म्हणालो, ‘बंडोपंत आज इकडे कसं काय?’ तसे बंडोपंत म्हणाले, ‘तुमच्या घरी गेलेलो़, तर अंगणात कोणीच दिसलं नाही, म्हणून सरळ इकडे आलो. तेवढ्यात पोलीसदादा भेटले. म्हणाले, ‘निघाला कुठे?’ तर म्हणालो, ‘शतपावली करायला निघालो.’ तसे ते म्हणाले, ‘जेवला की काय? एवढ्या लवकर?’ मग माझ्या लक्षात आलं की, जेवल्यावर शतपावली करतात, तर जेवणापूर्वी सहस्त्र पावली करतात. असो. हे महत्त्वाचं नाही. तुमच्या मनात काय? चाललंय सांगा?’ तसे आम्ही म्हणालो, ‘दोन प्रश्न आहेत, एक लस घ्यावी की न घ्यावी आणि दिवसातला काही काळ माझा मोबाइल कुठे तरी गायब होतो.’ तसे बंडोपंत हसून म्हणाले, ‘अगदी सोपं आहे राव! लस घ्यायची की नाही आपल्या मनावर आहे. तुमच्या घरात टी़व्ही़ नसेल, तुमच्याकडे मोबाइल नसेल, तर लस घ्यायला काहीच हरकत नाही. तुमच्याकडे या दोन्ही गोष्टी असतील, तर तुमच्या मनात हजारो प्रश्न निर्माण करेल. तुम्ही द्विधा नव्हे, तर त्रिधा अवस्थेत जाल. या प्रश्नांचे उत्तरे सापडता सापडता कोरोना निघूनही गेलेला असेल. त्यामुळे तो विचार तुमचा तुम्ही करा.

‘आता राहिला दुसरा प्रश्न. तुमचा मोबाइल दिवसातील काही काळ कोठे तरी गायब होतो. तर तो कधी जातो, कसा जातो, हे शोधायचं काम करायला फारसे डोकं वापरू नका. फक्त तुमच्या सौभाग्यवती आंघोळीला जातात, तेव्हा जर मोबाइल गायब होत असेल, तर तो त्यांच्यासोबत जाता? असेल असे ओळखावे. असं जर होत असेल, तर आपल्यावर भलं मोठं संकट आलेलं आहे, असे ओळखावे.’ आम्ही जरा सर्द झालो. म्हणालो, ‘तुम्हाला कसं कळलं?’ तसे बंडोपंत सुरक्षित अंतर ठेवून बाकड्यावर बसून पु.ल़. देशपांडे यांच्या शैलीत म्हणाले, ‘त्याचं काय आहे, आम्ही त्या अनुभवातून गेलो आहे राव! आमच्या सौभाग्यवतींची फार करडी नजर आमच्या आमच्या मोबाइलवर. बरोबर त्या आंघोळीला जाताना माझा मोबाइल गायब व्हायचा. तेव्हा एकदा धीर एकवटून म्हणालो, आंघोळीला जाताना माझा मोबाइल कशाला घेऊन जाता? तशा त्या फटदिशी म्हणाल्या, का म्हणजे? बादली भरेपर्यंत बघते तुमचे पराक्रम!’ आणि आम्ही चाटच पडलो राव. मग आम्ही अधिर होऊन विचारलं, ‘त्यावर काय उपाय केला?’ तसे बंडोपंत हसून म्हणाले, ‘काही करायचे नाही, फक्त सिम कार्ड काढून ठेवायचे. कसला फोन सुरू होतोय? इनसर्ट सिम कार्ड म्हणून पुढे चालतच नाही. मग आंघोळीचे पाणी गार होते, म्हणून सौभाग्यवतीने मोबाइल नेण्याचा नाद सोडून दिला. वर म्हणाल्या, ही कोण बया इनसर्ट सिम कार्ड, इनसर्ट सिम कार्ड म्हणते ? आणि पुढे माझं काही चालू देत नाही. जळला मेला तुमचा मोबाइल! मग आम्ही फार चिंतेत असल्यासारखे म्हणालो, खूप दिवस झाले मोबाइलला. त्यामुळे तसं झालं असेल. दुसरा घेऊ या आपण. तशा सौभाग्यवती म्हणाल्या, नवा घ्या चांगला मोबाइल, तोपर्यंत वापरा तुमचा तुम्हीच. तेव्हापासून मोबाइल सुरक्षित अंतर ठेवून माझ्याजवळ आहे. कशी वाटली आयडियाची कल्पना?’ आम्ही तर पार उडालोच की राव.

डॉ.गजानन पाटील, रत्नागिरी