शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

आयडियाची कल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:32 IST

पाय मोकळे करण्यासाठी आम्ही पोलिसांच्या नजरा चुकवत चुकवत, पटांगणात कोपऱ्यात असलेल्या एका सिमेंटच्या बाकड्यावर येऊन बसलो होतो. या लॉकडाऊनमुळे ...

पाय मोकळे करण्यासाठी आम्ही पोलिसांच्या नजरा चुकवत चुकवत, पटांगणात कोपऱ्यात असलेल्या एका सिमेंटच्या बाकड्यावर येऊन बसलो होतो. या लॉकडाऊनमुळे आपल्याला कुठे जाता येत नाही अन् कोणाला आपल्याकडे येता येत नाही. लस घेतल्याशिवाय काही करता येत नाही. अशा अवस्थेमध्ये आम्ही होतो. तेवढ्यात विजारीच्या खिशात हात घालून बंडोपंत आमच्यासमोर साक्षात देवासारखे उभे राहिले. आम्ही उसने हसून म्हणालो, ‘बंडोपंत आज इकडे कसं काय?’ तसे बंडोपंत म्हणाले, ‘तुमच्या घरी गेलेलो़, तर अंगणात कोणीच दिसलं नाही, म्हणून सरळ इकडे आलो. तेवढ्यात पोलीसदादा भेटले. म्हणाले, ‘निघाला कुठे?’ तर म्हणालो, ‘शतपावली करायला निघालो.’ तसे ते म्हणाले, ‘जेवला की काय? एवढ्या लवकर?’ मग माझ्या लक्षात आलं की, जेवल्यावर शतपावली करतात, तर जेवणापूर्वी सहस्त्र पावली करतात. असो. हे महत्त्वाचं नाही. तुमच्या मनात काय? चाललंय सांगा?’ तसे आम्ही म्हणालो, ‘दोन प्रश्न आहेत, एक लस घ्यावी की न घ्यावी आणि दिवसातला काही काळ माझा मोबाइल कुठे तरी गायब होतो.’ तसे बंडोपंत हसून म्हणाले, ‘अगदी सोपं आहे राव! लस घ्यायची की नाही आपल्या मनावर आहे. तुमच्या घरात टी़व्ही़ नसेल, तुमच्याकडे मोबाइल नसेल, तर लस घ्यायला काहीच हरकत नाही. तुमच्याकडे या दोन्ही गोष्टी असतील, तर तुमच्या मनात हजारो प्रश्न निर्माण करेल. तुम्ही द्विधा नव्हे, तर त्रिधा अवस्थेत जाल. या प्रश्नांचे उत्तरे सापडता सापडता कोरोना निघूनही गेलेला असेल. त्यामुळे तो विचार तुमचा तुम्ही करा.

‘आता राहिला दुसरा प्रश्न. तुमचा मोबाइल दिवसातील काही काळ कोठे तरी गायब होतो. तर तो कधी जातो, कसा जातो, हे शोधायचं काम करायला फारसे डोकं वापरू नका. फक्त तुमच्या सौभाग्यवती आंघोळीला जातात, तेव्हा जर मोबाइल गायब होत असेल, तर तो त्यांच्यासोबत जाता? असेल असे ओळखावे. असं जर होत असेल, तर आपल्यावर भलं मोठं संकट आलेलं आहे, असे ओळखावे.’ आम्ही जरा सर्द झालो. म्हणालो, ‘तुम्हाला कसं कळलं?’ तसे बंडोपंत सुरक्षित अंतर ठेवून बाकड्यावर बसून पु.ल़. देशपांडे यांच्या शैलीत म्हणाले, ‘त्याचं काय आहे, आम्ही त्या अनुभवातून गेलो आहे राव! आमच्या सौभाग्यवतींची फार करडी नजर आमच्या आमच्या मोबाइलवर. बरोबर त्या आंघोळीला जाताना माझा मोबाइल गायब व्हायचा. तेव्हा एकदा धीर एकवटून म्हणालो, आंघोळीला जाताना माझा मोबाइल कशाला घेऊन जाता? तशा त्या फटदिशी म्हणाल्या, का म्हणजे? बादली भरेपर्यंत बघते तुमचे पराक्रम!’ आणि आम्ही चाटच पडलो राव. मग आम्ही अधिर होऊन विचारलं, ‘त्यावर काय उपाय केला?’ तसे बंडोपंत हसून म्हणाले, ‘काही करायचे नाही, फक्त सिम कार्ड काढून ठेवायचे. कसला फोन सुरू होतोय? इनसर्ट सिम कार्ड म्हणून पुढे चालतच नाही. मग आंघोळीचे पाणी गार होते, म्हणून सौभाग्यवतीने मोबाइल नेण्याचा नाद सोडून दिला. वर म्हणाल्या, ही कोण बया इनसर्ट सिम कार्ड, इनसर्ट सिम कार्ड म्हणते ? आणि पुढे माझं काही चालू देत नाही. जळला मेला तुमचा मोबाइल! मग आम्ही फार चिंतेत असल्यासारखे म्हणालो, खूप दिवस झाले मोबाइलला. त्यामुळे तसं झालं असेल. दुसरा घेऊ या आपण. तशा सौभाग्यवती म्हणाल्या, नवा घ्या चांगला मोबाइल, तोपर्यंत वापरा तुमचा तुम्हीच. तेव्हापासून मोबाइल सुरक्षित अंतर ठेवून माझ्याजवळ आहे. कशी वाटली आयडियाची कल्पना?’ आम्ही तर पार उडालोच की राव.

डॉ.गजानन पाटील, रत्नागिरी