शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

राजापुरात घरावर झाड पडून पती-पत्नी जखमी, मुले बालंबाल बचावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:37 IST

राजापूर : मुसळधार पावसामुळे शहरानजीकच्या शीळ येथील जयकुमार बिर्जे आणि विश्‍वास बिर्जे यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळल्याची घटना रात्री ...

राजापूर : मुसळधार पावसामुळे शहरानजीकच्या शीळ येथील जयकुमार बिर्जे आणि विश्‍वास बिर्जे यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळल्याची घटना रात्री १ वाजण्याच्यादरम्यान घडली. घराच्या ज्या ठिकाणी झाड पडले, त्या खोलीमध्ये विश्‍वास बिर्जे, त्यांची पत्नी आणि दोन मुले झोपलेली होती. या घटनेमध्ये सुदैवाने झोपलेल्या लहान मुलांना कोणतीही इजा झालेली नाही. मात्र, विश्‍वास आणि त्यांची पत्नी किरकोळ जखमी झाली आहेत.

रात्रीचे जेवण उरकून विश्‍वास बिर्जे, त्याची पत्नी नीलम दोन छोट्या मुलांसह घराच्या पाठीमागील पडवीतील खोलीमध्ये झोपली होती. गाढ झोपेमध्ये असताना रात्री अचानक अंगावर मोठे काहीतरी पडल्याची त्यांना जाणीव झाली. अचानक घडलेल्या या घटनेने घाबरलेले पती-पत्नी तात्काळ जागी होऊन त्यांनी खोलीतील लाईट सुरू केला. खोलीमध्ये छप्परावरील तुटलले पत्रे पाहून स्वतः जखमी झालेल्या स्थितीमध्ये छोट्या मुलांना घेऊन खोलीतून बाहेर पडले.

दरम्यान, ही माहिती शीळचे उपसरपंच अशोक पेडणेकर आणि सहकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी किरकोळ जखमी झालेल्या विश्‍वास बिर्जे व त्यांच्या पत्नीला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्या दाेघांचीही प्रकृती व्यवस्थित असल्याचे उपसपरपंच पेडणेकर यांनी दिली. दरम्यान, साेमवारी सकाळी पडवीच्या छपरावर पडलेले आंब्याचे झाड बाजूला करून पडवी मोकळी करण्याचे काम करण्यात आले. सरपंच नामदेव गोंडाळ, तलाठी कोकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी आणि पंचनामा केला. आंब्याचे झाड पडून नुकसान झालेली पडवी सुस्थितीमध्ये होईपर्यंत बाजूच्या घरामध्ये बिर्जे कुटुंबियांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती उपसरपंच पेडणेकर यांनी दिली.