शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

ह्युम्युनिटी कमिटी, खैर ए उम्मत कमिटीने केली रुग्णांच्या नातेवाइकांसाठी सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:33 IST

रत्नागिरी : जिल्हा महिला रुग्णालयात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णालय परिसरात त्यांच्या नातेवाइकांचीही गर्दी वाढू लागली आहे. ...

रत्नागिरी : जिल्हा महिला रुग्णालयात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णालय परिसरात त्यांच्या नातेवाइकांचीही गर्दी वाढू लागली आहे. मात्र, या रुग्णांच्या नातेवाइकांची गैरसोय होत असल्याने येथील ह्युम्युनिटी कमिटी आणि मिरकरवाडा येथील खैर ए उम्मत कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी महिला रुग्णालयासमोर रुग्णांच्या नातेवाइकांसाठी बसण्यासाठी तात्पुरती सोय केली असून, स्वच्छता सुविधांसह लाईट, पंखे, आदी सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोमवारी या रुग्णालयाला भेट दिली असता या दोन्ही कमिटी सदस्यांच्या कार्याबद्दल गौरव केला.

महिला रुग्णालयात रुग्ण संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे त्यांच्या काळजीने त्यांचे नातेवाईकही या परिसरात वावरत असतात. मात्र, या बहुसंख्येने असलेल्या नातेवाइकांची सोय करणे प्रशासनाला शक्य नाही. मात्र, या रुग्णांच्या नातेवाइकांची अडचण लक्षात घेऊन येथील ह्युम्युनिटी कमिटी आणि खैरे ए उम्मत कमिटीच्या तरुणांनी रमजान महिन्यातील पवित्र रोजांचे पालन करतानाच महिला रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांसाठी बसण्यासह अन्य सुविधा उभारून दिल्या आहेत.

त्यांच्या या सामाजिक कार्याचे कौतुक करताना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या दोन्ही कमिटीचे काम इतरांना प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काढले. इतर सामाजिक संस्थांनीही अशा कामात पुढे आले पाहिजे, असे आवाहन केले. शिरगाव ग्रामपंचायतीने केलेल्या स्वच्छतेची आणि बसविण्यात आलेल्या बायो टॉयलेटची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली व ग्राम विकास अधिकारी वासुदेव सावके यांचेही कौतुक केले. त्यांच्यासमवेत जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमिश्रा फुले तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी शकील मुर्तुझा, रहिम अकबर अली, नगरसेवक मुसा काजी, पत्रकार अलिमियां काझी, साहिल पठाण, ईलू खोपेकर, शकील मोडक, सिकंदर खान, इस्माईल नाकाडे, सहजाद ईब्जी, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, मिरकरवाडा येथे तातडीने मोहल्ला क्लिनिक सुरू करण्यासाठी सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिले. सामाजिक कार्य करणाऱ्या सर्वांना ओळखपत्रही दिले जातील, असे सांगितले. कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना धन्यवाद देतानाच यापुढेही आपण जोमाने काम करू, असे सांगितले.