शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

दहा हजार वीजखांब बदलणार कसे ?

By admin | Updated: November 12, 2014 23:57 IST

दोन वर्षांत केवळ अडीच हजार पोल बदलणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चार महिन्यांत

रत्नागिरी : दोन वर्षांत केवळ अडीच हजार पोल बदलणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चार महिन्यांत दहा हजार पोल बसविणार असल्याचे आश्वासन जिल्हा परिषदेला दिले आहे़ मात्र, हे आश्वासन पूर्ण कसे करणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे़ जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर यांच्या दालनात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी जोरदार चर्चा झाली़ या चर्चेच्या वेळी पदाधिकारी व सदस्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते़ यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ हरीष जगताप, माजी उपाध्यक्ष विश्वास सुर्वे, सदस्य दत्ता कदम, अजित नारकर, स्वरुपा साळवी, नेत्रा ठाकूर, लांजा, राजापूर, संगमेश्वरचे पंचायत समित्यांचे सभापती, महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता आदी मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती. यावेळी महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना पंपासाठी देण्यात येणाऱ्या कृषी कनेक्शनबाबत चर्चा झाली़ यावेळी ५० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले़ यावेळी महावितरण कंपनीकडून रखडलेल्या कामांबाबत जोरदार चर्चा झाली़ यावेळी पदाधिकारी व सदस्यांनी पाणी पुरवठा योजना वीज कनेक्शन न देण्यात आल्याने त्या सुरु करता येत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली़ तसेच जिल्ह्यातील ७१ प्राथमिक शाळांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे, त्याबद्दल सदस्यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली़ हे सर्व प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना दिले़ (शहर वार्ताहर)