शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

दहा हजार वीजखांब बदलणार कसे ?

By admin | Updated: November 12, 2014 23:57 IST

दोन वर्षांत केवळ अडीच हजार पोल बदलणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चार महिन्यांत

रत्नागिरी : दोन वर्षांत केवळ अडीच हजार पोल बदलणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चार महिन्यांत दहा हजार पोल बसविणार असल्याचे आश्वासन जिल्हा परिषदेला दिले आहे़ मात्र, हे आश्वासन पूर्ण कसे करणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे़ जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर यांच्या दालनात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी जोरदार चर्चा झाली़ या चर्चेच्या वेळी पदाधिकारी व सदस्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते़ यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ हरीष जगताप, माजी उपाध्यक्ष विश्वास सुर्वे, सदस्य दत्ता कदम, अजित नारकर, स्वरुपा साळवी, नेत्रा ठाकूर, लांजा, राजापूर, संगमेश्वरचे पंचायत समित्यांचे सभापती, महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता आदी मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती. यावेळी महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना पंपासाठी देण्यात येणाऱ्या कृषी कनेक्शनबाबत चर्चा झाली़ यावेळी ५० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले़ यावेळी महावितरण कंपनीकडून रखडलेल्या कामांबाबत जोरदार चर्चा झाली़ यावेळी पदाधिकारी व सदस्यांनी पाणी पुरवठा योजना वीज कनेक्शन न देण्यात आल्याने त्या सुरु करता येत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली़ तसेच जिल्ह्यातील ७१ प्राथमिक शाळांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे, त्याबद्दल सदस्यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली़ हे सर्व प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना दिले़ (शहर वार्ताहर)