शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

रिंगणात कितीजण ? आज ठरणार

By admin | Updated: October 1, 2014 01:06 IST

विधानसभा निवडणूक : चिपळुणात अपक्ष उमेदवाराची माघार

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या कामात आरटीओ कार्यालयातील कर्मचारीही व्यस्त झाल्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांतील आरटीओ कार्यालयातील कामकाज पूर्णपणो ठप्प झाले आहे. हे पाहता महत्त्वाचे काम असेल तरच कार्यालयात या अन्यथा थेट निवडणुकीनंतर भेटा, असे आवाहन अधिका:यांकडून नागरिकांना करण्यात आले आहे. 
15 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुका होणार असून त्याची जय्यत तयारी केली जात आहे. या निवडणुकीच्या कामकाजासाठी सरकारी कर्मचा:यांचा समावेश केला जातो. लोकसभा निवडणुकीप्रमाणोच यंदाही सरकारी कर्मचा:यांचा मोठय़ा प्रमाणात समावेश केला जात असून, राज्यातील आरटीओ अधिकारी आणि कर्मचा:यांचाही समावेश करण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील तीन महत्त्वाच्या आरटीओ कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचारीही निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. मात्र यामुळे कार्यालयातील कामकाज ठप्प झाले असून, नागरिकांना कामासाठी खेटे  मारावे लागत आहेत. निवडणुकीतील व्यस्त वेळापत्रकामुळे आरटीओतील कामकाजासाठी अपुरे मनुष्यबळ पडत असून नवीन ड्रायव्हिंग लायसन्स देणो, नूतनीकरण करणो, दंड भरणो आदी कामे पूर्णपणो रखडली आहेत. हे पाहता नागरिकांनी काही महत्त्वाचे काम असेल तरच आरटीओ कार्यालयात यावे, अन्यथा थेट निवडणुकीनंतर यावे, असे आवाहन आरटीओ अधिका:यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
 
वडाळा आरटीओत जवळपास 90 कर्मचारी असून, यातील 35 कर्मचारी, अंधेरी आणि त्या अंतर्गत येणा:या बोरीवलीत साधारण 124 कर्मचारी कार्यरत असून, यातील जवळपास 110 कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. तर ताडदेव कार्यालयातील जवळपास 70 पैकी 40 ते 50 कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त राहणार आहेत. सध्या कर्मचारी या कामासाठी जात असतानाच ऑक्टोबर महिन्याच्या 7, 8, 14 आणि 15 तारखेला त्यांना पूर्णपणो डय़ुटी लागल्याचे आरटीओतील सूत्रंनी सांगितले. 
 
1अंधेरी आरटीओ अधिकारी पी. जी. भालेराव यांनी सांगितले की, कर्मचारी नसल्याने कामे पूर्णपणो रखडली आहेत. आरटीओ कार्यालयातील सर्वच्या सर्व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. 
2ताडदेवचे आरटीओ अधिकारी के. टी. गोलानी यांनी सांगितले की, कर्मचारी निवणुकीच्या कामात व्यस्त असल्याने आता कामे रखडू लागली आहेत. 
3त्यामुळे नागरिकांनी निवडणुकीनंतरच यावे, असे आवाहन आम्ही प्रत्येकाला करीत आहोत. महत्त्वाचे काम असेल तरच या, असेही त्यांना सांगत आहोत.