शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

बेघरांना हक्काची घरं..!

By admin | Updated: November 9, 2014 00:43 IST

रमाई आवास : ३८५ जणांच्या डोक्यावर हक्काचं छप्पर

रत्नागिरी : जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि नवबौध्द समाजातील गरीब व दारिद्यरेषेखालील बेघरांसाठी ३८५ लोकांना रमाई आवास योजनेतून घरकुलांचा आधार देण्यात येत आहे़ त्यासाठी ३ कोटी ६५ लाख ७५ हजार रुपये अनुदान खर्च करण्यात येत आहे़ ग्रामीण भागामध्ये आजही हजारो कुटुंबीय बेघर आहेत तर अनेक कुटुंबिय मातीच्या भिंती असलेल्या मोडकळीस आलेल्या घरात गरीबीत दिवस काढत आहेत़ अशा कुटुंबियांना आधार देण्यासाठी शासनाने रमाई आवास योजना सुरु केली़ त्या योजनेचा लाभ अनुसूचित जाती आणि नवबौध्द समाजातील लाभार्थ्यांना शासनाकडून देण्यात येतो़ यंदाही या योजनेचा लाभ जिल्ह्यातील लाभार्थींना दिला जाणार आहे. जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील बेघराकडून ग्रामपंचायतींच्या माध्यमातून प्रस्ताव मागविले होते़ गेल्या तीन वर्षात ग्रामपंचायतीने प्रस्ताव सादर केले होते़ जिल्ह्यासाठी सन २०१३-१४ या आर्थिक वर्षासाठी ५५० घरकुलांचे उद्दिष्ट होते़ त्यापैकी ३८५ घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे. घरकुलाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची स्वत:च्या मालकीची किंवा संमत्तीने घेतलेली जागा आवश्यक आहे़ तसेच या घरकुलासाठी शौचालयाची सोयही करण्यात यावी. घरकुलापर्यंत जाण्यासाठी पायवाट किंवा पर्यायी रस्त्याची सोय असणे अवश्यक आहे, या अटी व शर्थींवर लाभार्थ्यांच्या प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली आहे़ या घरकुलांसाठी ९५ हजार रुपये देण्यात येणार आहेत़ या लाभार्थ्यांना ३५ हजार रुपयांचा पहिला हप्ता मंजूर करण्यात आला आहे़ मंजूर करण्यात आलेल्या ३८५ घरकुलांवर ३ कोटी ६५ लाख ७५ हजार रुपये खर्च करण्यात येत आहेत़ त्यासाठी पंचायत समित्यांना घरकुलांची रक्कम अदा करण्यात आली आहे़ रमाई आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३८५ गरीब व दारिद्यरेषेखालील कुटुंबियांना या लाभ देण्यात येत आहे़ (शहर वार्ताहर)