शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

बेघरांना हक्काची घरं..!

By admin | Updated: November 9, 2014 00:43 IST

रमाई आवास : ३८५ जणांच्या डोक्यावर हक्काचं छप्पर

रत्नागिरी : जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि नवबौध्द समाजातील गरीब व दारिद्यरेषेखालील बेघरांसाठी ३८५ लोकांना रमाई आवास योजनेतून घरकुलांचा आधार देण्यात येत आहे़ त्यासाठी ३ कोटी ६५ लाख ७५ हजार रुपये अनुदान खर्च करण्यात येत आहे़ ग्रामीण भागामध्ये आजही हजारो कुटुंबीय बेघर आहेत तर अनेक कुटुंबिय मातीच्या भिंती असलेल्या मोडकळीस आलेल्या घरात गरीबीत दिवस काढत आहेत़ अशा कुटुंबियांना आधार देण्यासाठी शासनाने रमाई आवास योजना सुरु केली़ त्या योजनेचा लाभ अनुसूचित जाती आणि नवबौध्द समाजातील लाभार्थ्यांना शासनाकडून देण्यात येतो़ यंदाही या योजनेचा लाभ जिल्ह्यातील लाभार्थींना दिला जाणार आहे. जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील बेघराकडून ग्रामपंचायतींच्या माध्यमातून प्रस्ताव मागविले होते़ गेल्या तीन वर्षात ग्रामपंचायतीने प्रस्ताव सादर केले होते़ जिल्ह्यासाठी सन २०१३-१४ या आर्थिक वर्षासाठी ५५० घरकुलांचे उद्दिष्ट होते़ त्यापैकी ३८५ घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे. घरकुलाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची स्वत:च्या मालकीची किंवा संमत्तीने घेतलेली जागा आवश्यक आहे़ तसेच या घरकुलासाठी शौचालयाची सोयही करण्यात यावी. घरकुलापर्यंत जाण्यासाठी पायवाट किंवा पर्यायी रस्त्याची सोय असणे अवश्यक आहे, या अटी व शर्थींवर लाभार्थ्यांच्या प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली आहे़ या घरकुलांसाठी ९५ हजार रुपये देण्यात येणार आहेत़ या लाभार्थ्यांना ३५ हजार रुपयांचा पहिला हप्ता मंजूर करण्यात आला आहे़ मंजूर करण्यात आलेल्या ३८५ घरकुलांवर ३ कोटी ६५ लाख ७५ हजार रुपये खर्च करण्यात येत आहेत़ त्यासाठी पंचायत समित्यांना घरकुलांची रक्कम अदा करण्यात आली आहे़ रमाई आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३८५ गरीब व दारिद्यरेषेखालील कुटुंबियांना या लाभ देण्यात येत आहे़ (शहर वार्ताहर)