शहरं
Join us  
Trending Stories
1
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
2
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
3
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
4
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
5
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
6
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
7
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
8
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
9
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
10
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
11
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
12
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
13
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
14
कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी
15
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
16
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
17
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
18
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
19
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
20
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
Daily Top 2Weekly Top 5

गृहकर्ज स्वस्त, पण बांधकाम साहित्य महाग; घर घेण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:31 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे गेली दोन वर्षे उद्योग, व्यवसायावर परिणाम झाला आहे. शिवाय इंधन दरातील वाढीमुळे वाहतूक ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे गेली दोन वर्षे उद्योग, व्यवसायावर परिणाम झाला आहे. शिवाय इंधन दरातील वाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ झाली असल्याने बांधकामासाठी लागणारे साहित्याचे दर कडाडले आहेत. बँकांचे गृहकर्ज दर सर्वत्र सारखे आहेत. सरकारी बँकांमध्ये ६.७० टक्के दराने गृहकर्ज आकारले जात असून, खासगी बँका, वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांचे दर मात्र ८ ते ११ टक्के आहेत. गृहकर्ज कमी दरात उपलब्ध असले तर बांधकाम साहित्य मात्र महागले आहे. याचा परिणाम घरांच्या किमतीवर झाला आहे.

शहर व लगतच्या ग्रामपंचायत हद्दीतील घरांच्या किमतीत फरक आहे. गतवर्षीपासून कोरोना संकटामुळे स्टील उद्योगासाठी भासणारी ऑक्सिजनची कमतरता, सर्वच व्यवसायांना मनुष्यबळाची भेडसावणारी समस्या, वाढत्या इंधन दरामुळे वाहतूक खर्चातील वाढ यामुळे घरांचे दर कमी होण्याऐवजी वाढत आहेत. बँकांनी गृह कर्जाचे दर कमी केले असले तरी सर्वसामान्यांचे घर घेण्याचे स्वप्न अद्याप दूरच आहे.

कोरोनामुळे व्यवसायावर परिणाम

स्टील उद्योगासाठी लागणारा ऑक्सिजन, मनुष्यबळ पुरेसे उपलब्ध होत नाही, वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे साहजिकच स्टीलच्या दरात वाढ झाली आहे. कोराेनामुळे शासकीय निर्बंध असल्याने उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. साहित्याची कमतरता भासत असून दरातही वाढ झाली आहे.

- प्रवीण मलुष्टे, व्यावसायिक

इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ

गेल्या वर्षभरात इंधन दरात कमालीची वाढ झाल्यानेच वाहतूक खर्च वाढला आहे. शिवाय कोरोनामुळे सलग दोन वर्षे लाॅकडाऊनला सामोरे जावे लागले. मनुष्यबळच उपलब्ध होत नसल्याने व्यवसाय ठप्प आहेत. वाढत्या महागाईमुळे मजुरीचेही दर वाढले असल्याने सर्व गोष्टीचा परिणाम साहित्य विक्रीवर झाला आहे.

- साैरभ मलुष्टे, व्यावसायिक

राष्ट्रीयीकृत बँका असो वा खासगी बँकांच्या गृहकर्जाचे दर सारखे आहेत. वित्तीय संस्थांचे दर मात्र अधिक आहेत. परंतु घरांच्या किमती परवडणाऱ्या नाहीत. कोरोनाचे संकट असतानाच महागाईनेही राैद्र रूप धारण केले आहे. शहर किंवा ग्रामपंचायत हद्दीतील घरांच्या किमतीत कमालीचा फरक आहे. दराचा विचार केला तर शहरात येण्यासाठी वाहतूक खर्च वाढत आहे.

- एस. जे. पिलनकर, रत्नागिरी

महागाईचा परिणाम बांधकाम साहित्याच्या दरावर झाला आहे. महागाईचे कारण घरांच्या वाढत्या किमतीसाठी सांगितले जात आहे. एकीकडे बँकांनी गृहकर्जाचे दर कमी केले असले तरी महागाईमुळे घर घेणे परवडणारे नाही. बांधकाम साहित्याचे दर वाढले की घराचे दर वाढतात. दरावर निर्बंध असणे गरजेचे आहे. यामुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणे अशक्य आहे.

- आर. व्ही. जाधव, रत्नागिरी

गावापासून दूर घरे स्वस्त, पण जाणे-येणे महाग

शहरामध्ये ३५०० ते ५००० रुपये चाैरस मीटर दराने घरांचे दर आकारले जातात. शहराबाहेर मात्र २५०० ते ३००० चाैरस मीटर दर आकारला जातो. शहर व ग्रामपंचायत हद्दीतील दरात कमालीचा फरक पडतो.

शहरापासून पाच ते सात किलोमीटर पर्यंत अंतरावर ग्रामपंचायत हद्दीतील दर वेगळे असले तरी अंतरामुळे येण्या-जाण्याचा खर्च वाढतो.

शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, दवाखाने आदी कारणासाठी शहरात जावे लागत असल्याने शहरापासून दूर घर घेतले तर सातत्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया ६.७०

बँक ऑफ इंडिया ६.७०

बँक ऑफ महाराष्ट्र ६.७०

एचडीएफसी ६.७०

आयसीआयसीआय ६.७०