शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

मानधनाबाबत होमगार्डची उपेक्षा

By admin | Updated: October 19, 2015 23:51 IST

महत्त्व वाढले : पण सन्मान नाही...

खेड : राज्यातील वाढत्या दहशतवादाला तसेच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस दल कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आज गृहरक्षक दलाचे महत्व वाढले आहे. मात्र, आजही राज्य सरकारकडून गृहरक्षक दलाची उपेक्षा सुरु आहे.आपदग्रस्त परिस्थिती तसेच विविध धार्मिक सणांसाठी होमगार्डना कर्तव्यावर बोलावले जाते. यावेळी कर्तव्यावर असतानाचा भत्ता दिला जातो. मात्र, हा कालावधी सोडल्यास होमगार्डना घरीच बसावे लागते. त्यांना मजुरीची कामेही वेळेवर मिळत नाहीत. होमगार्डच्या भत्त्यामध्ये वाढ करण्याचे आश्वासन यापूर्वी देण्यात आले होते. तसेच धुलाई भत्ता वाढवण्याचीही जाहीर घोषणा करण्यात आली होती. मात्र, अद्याप होमगार्डना यापैकी कोणत्याही सुविधेचा लाभ मिळालेला नाही.आपले कर्तव्य चोख बजावणाऱ्या होमगार्डना ‘ना मान ना धन’ अशा स्थितीत काम करावे लागत आहे. शासकीय कर्तव्यावर असताना पोलिसांप्रमाणेच दिवसरात्र कर्तव्य पार पाडावे लागते. ज्या पोलीस हवालदारांसमवेत त्यांन कर्तव्यावर पाठवण्यात आले असेल, त्यांची खासगी कामेही करावी लागतात़ अनेक ठिकाणी पानसुपारी आणण्यापासून ते चहावाल्याला चहा आण म्हणून सांगण्यासाठी होमगार्डचा वापर केला जात आहे. कर्तव्य पोलिसांप्रमाणे असले तरी त्यांच्याप्रमाणे अधिकार नसल्याने होमगार्डस्ना मागासलेपणाची जाणीव होत राहते. होमगार्डना पगार देतानाही सरकार हात आखडता घेत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. होमगार्डना प्रतिमहिना निश्चित समाधानकारक मानधन मिळाल्यास तसेच उपलब्ध सर्व भत्ते वेळेवर आणि आवश्यक प्रमाणात मिळाल्यास होमगार्डना कुटुंबाचा चरितार्थ चालवणे सुलभ होईल. आता याकामी शासनाने पुढाकार घेऊन होमगार्डना न्याय देण्याची मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)कामाचा जोर : कामही वेळेवर मिळेनागृहरक्षक दलाची व्यथा न सांगण्यापलिकडची झाली आहे. कारण वेळेवर काम मिळत नाही. मानधन तर पुरेसे मिळतच नाही. जेव्हा गरज लागेल, तेव्हा हक्काने गृहरक्षक दलाची मदत मागितली जाते. पण त्यामानाने मानधन खूपच कमी मिळते. अगदी सणाच्या काळात सुरक्षा यंत्रणेवर ताण येतो. त्यावेळी गृहरक्षक दलाचे जवान सण मागे सारून संरक्षणासाठी पुढे येतात.मात्र, तरीही हे दल उपेक्षितच आहे.लक्ष कधी देणार?गृहरक्षक दलाच्या या समस्या वारंवार वरिष्ठ स्तरावर मांडण्यात आल्या आहेत. मात्र, त्यावर अद्याप कोणीच गांभीर्याने विचार केलेला नाही.