शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजानला बुधवारपासून होणार प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यास बुधवार, दि. १४ एप्रिलपासून प्रारंभ होणार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यास बुधवार, दि. १४ एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. मंगळवारी चंद्रदर्शनानंतर तरावीह नमाज अदा केला जाणार आहे. लॉकडाऊन कालावधीतील शासकीय आदेशाचे पालन मात्र करण्यात येणार आहे.

मंगळवारी चंद्रदर्शनानंतर बुधवारपासून रमजान सुरू होणार आहे. मात्र, तत्पूर्वीच मुबारकचे स्वागत, शुभेच्छांचा वर्षाव सोशल मीडियावर सुरू झाला आहे. आखाती प्रदेशात आज, मंगळवारपासून रमजान सुरू होणार आहे. बुधवारपासून भारतात रमजानला प्रारंभ होणार असून, सर्व मुस्लिम भाविक पहाटे सहेरी करून रोजे ठेवणार आहेत.

संपूर्ण रमजान मासामध्ये भाविक रोजे ठेवत असल्याने सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत पाण्याचा थेंबही ग्रहण केला जात नाही. रोजे ठेवत असतानाच भाविक कुराण पठण व नमाज पठणही सुरू ठेवतात. एकूणच संपूर्ण महिनाभर मुस्लिम मोहल्यामध्ये धार्मिक वातावरण असते. तरावीह नमाजमध्ये कुराण पठण केले जात असल्यामुळे मशिदीमध्ये विशेष मौलवीची नियुक्ती करण्यात येते. मात्र, सोशल डिस्टन्सिंग व शासनाच्या आदेशाचे पालन करून मौलवी वगळता अन्य भाविकांना आपापल्या घरातच नमाज अदा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

दिवसभर अन्नपाणी वर्ज्य करण्यात येत असल्यामुळे सहरीसाठी हलकासा आहार घेण्यात येतो. इफ्तारसाठी फळांचे व खजुराचे सेवन केले जात असल्यामुळे खजूर, फळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय काळा खजूर, सिडलेस खजूर, विदेशी खजूर बाजारात उपलब्ध आहे. ग्राहकांकडून फळे व खजूर आवर्जून खरेदी करण्यात येत आहे. रमजानमध्ये पावाचाही खप सर्वाधिक होताे.