शहरं
Join us  
Trending Stories
1
घरातील सर्वांचा विरोध; तरीही वैष्णवीचा लव मॅरेजसाठी हट्ट, मामाने सगळा घटनाक्रम सांगितला..
2
Vaishnavi Hagwane Case : 'वैष्णवीचे बाळ आणायला गेलो,आम्हाला बंदूक दाखवली'; मामांनी सगळंच सांगितलं
3
 काश्मीरमधील किश्तवाड येथील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, दोघांना लष्कराने घेरले 
4
हेरगिरी प्रकरणात ज्योती मल्होत्राला दिलासा नाही, पोलिस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ; बँक खात्याची चौकशी सुरूच
5
पाकिस्तानने स्वतः युद्धविरामाची चर्चा केली, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा फेटाळला!
6
मानवतेचा महामेरु! पत्नी कॅन्सरने गेली, इतर रुग्णांची पैशांअभावी वणवण पाहता पतीची २० लाखांची देगणी
7
आधी वैभव सूर्यवंशीसोबत खोटा फोटो, आता प्रीती झिंटाची थेट कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?
8
Corona Virus : बूस्टर डोस घ्यावा लागेल का? चीन आणि भारतासह ५ देशांमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका
9
जयंत पाटलांची लागणार होती वर्णी, भाजपासोबतची बोलणी अडली; अखेर छगन भुजबळांनी संधी साधली!
10
“मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा; जागावाटपाची चर्चा नको, मित्रपक्षांवर टीका टाळा”
11
नवऱ्याच्या सिनेमाच्या स्क्रीनिंगला पोहोचली अमृता खानविलकर, हिमांशुच्या 'त्या' कृतीवर खिळल्या नजरा
12
'ग्रोव'चा सामान्य गुंतवणूकदारांना धक्का? छोटे व्यवहारही होणार महाग, ब्रोकरेज शुल्क इतक्या पटींनी वाढणार
13
दिल्ली उद्ध्वस्त करण्याची योजना, रावळपिंडीत ट्रेनिंग घेतलं! आयएसआयचे दोन हेर पोलिसांच्या ताब्यात
14
Vaishnavi Hagawane Death Case : 'दाल मे कुछ काला है'; शरद पवार गटाची रूपाली चाकणकर, चित्रा वाघ यांच्यावर खरमरीत टीका
15
मोठी बातमी! अथिया शेट्टीने बॉलिवूडला ठोकला रामराम, आई झाल्यानंतर घेतला निर्णय! चाहत्यांना धक्का
16
अनिल गोटेंनी टाळे ठोकलेल्या खोलीत पैशांचे घबाड सापडले; कुलूप तोडून पोलीस आत गेले... 
17
जगभर विनाश होईल, आर्थिक मंदी येईल...; बाबा वेंगाची भयानक भाकितं, जगाचा अंतही सांगून टाकला!
18
"पती निर्दोष, दोनदा पाकिस्तानला गेला कारण..."; शहजादला अटक होताच ढसाढसा रडली रझिया
19
दीपिका पादुकोणचे नखरेच जास्त! मानधन अन् अटी ऐकून दिग्दर्शकाने 'या' सिनेमातून काढलं
20
माझे लग्न पाकिस्तानात करून द्या, ज्योती मल्होत्राची विनंती; चॅटिंग आणि डायरीच्या नोंदीतील माहिती

चिपळुणात उलगडणार स्वातंत्र्यवीरांचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:33 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नसून त्यासाठी लढे, क्रांतिकारी चळवळी यासह अनेक क्रांतिकारकांना प्राणांची आहुती ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नसून त्यासाठी लढे, क्रांतिकारी चळवळी यासह अनेक क्रांतिकारकांना प्राणांची आहुती द्यावी लागली. हा संपूर्ण इतिहास भावी पिढीला कळावा व त्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी मार्गताम्हाने विद्यालय भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यवीरांचा इतिहास उलगडणार आहे. १ ऑक्टोबर २०२१ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत हा उपक्रम होणार असल्याची माहिती अध्यक्ष मधुकर चव्हाण यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

त्यांनी सांगितले की, आज भावी पिढीला इतिहासाची ओळखच नसल्याने त्यांच्या मनात देशभक्तिपर बीजे पेरण्याची खऱ्या अर्थाने गरज भासू लागली आहे. इतिहासावर आधारित या कार्यक्रमातून त्यांना इतिहासाची ओळख करून दिल्यास त्यांच्या मनावर इतिहास बिंबवला जाईल. यामध्ये १ ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाची रूपरेषा, २ रोजी गांधी जयंतीनिमित्त ‘भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, उत्सव स्वातंत्र्याचा, गौरव स्वातंत्र्यवीराचा’ या कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर ‘स्वातंत्र्य आंदोलनातील अभिनव भारत संघटनेचे योगदान’ या विषयावरील व्याख्यानानंतर खऱ्या अर्थाने या कार्यकमाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या क्रांतिकारकांविषयी निबंध व एकपात्री अभिनव स्पर्धा, यासह विविध स्पर्धा, व्याख्यान, परिसंवाद, तसेच स्वतंत्र भारताचे संरक्षण करणारे माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता यांचे संमेलन, शोभायात्रा, चित्ररथ, असे उपक्रम राबविले जाणार आहेत.

तसेच कीर्तनकार चारुदत्त आफळे बुवा यांचे व्याख्यान हाेणार आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा गांधी, महात्मा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासारख्या अनेक महापुरुषांचा इतिहास व त्यांचे योगदान याची माहिती यावेळी दिली जाणार आहे. १५ ऑगस्ट रोजी या कार्यक्रमांची सांगता होणार असून, या दिनी ध्वजारोहणासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला तिरंगा ध्वज दिला जाणार आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष जयसिंग मोरे, सचिव मोहन चव्हाण, सहसचिव अजित साळवी, खजिनदार मनोहर चव्हाण, सदस्य शशिकांत चव्हाण, कृष्णा चव्हाण, प्राचार्य विजयकुमार खोत, मुख्याध्यापक संदीप गोखले, प्रा. राजश्री कदम आदींची उपस्थिती होती.