शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

स्वत:चे नुकसान साेसून ‘ते’ धावले इतरांच्या मदतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:32 IST

अरुण आडिवरेकर लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : चक्रीवादळात तयार झालेला सुमारे १०० पेटी आंब्यांचा बागेत सडा पडलेला असताना त्याकडे ...

अरुण आडिवरेकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : चक्रीवादळात तयार झालेला सुमारे १०० पेटी आंब्यांचा बागेत सडा पडलेला असताना त्याकडे दुर्लक्ष करून नाणीजमधील कुटुंबांच्या मदतीसाठी धावत जाऊन मदत कार्य करण्याचे काम नाणीजचे सरपंच गाैरव संसारे यांनी केले. पडलेला आंबा वायाच जाणार हे गृहीत धरून संकटात सापडलेल्यांना मदत करण्यास त्यांनी प्राधान्य दिले.

तौक्ते वादळात रत्नागिरी तालुक्यातील नाणीज गावाचेही मोठे नुकसान झाले आहे. त्या दिवशी गावात वाडीवार खूप ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. काहींच्या घरांचे नुकसान झाले. त्यामध्ये पत्रे उडाले, घरांच्या भिंती कोसळल्या, आंबा बागांचे अतोनात नुकसान झाले. या वेळी नाणीज गावचे सरपंच गौरव संसारे हे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन गावात गेले आणि ज्या - ज्या ठिकाणी, घरावर, रस्त्यावर पडलेली झाडे तत्काळ बाजूला करण्यासाठी मदत केली.

गौरव संसारे यांचा पिढीजात आंबा व्यवसाय आहे. स्वतःच्या आंबा बागेत सुमारे १०० पेटी आंब्यांचा सडा पडलेला असतानाही त्याकडे त्यांनी दुर्लक्ष करून नाणीजवासीयांच्या प्रत्येक कुटुंबाच्या मदतीला ते धावले. या वेळी त्यांनी महामार्गावर पडलेली झाडेही तत्काळ बाजूला करून रस्ता माेकळा करण्यासाठी प्रयत्न केले.

या मदत कार्यात त्यांना समीर तारी, सागर तारी, नाना वाघाटे, संदेश दरडी यांनीही सहकार्य केले. झाड पडलेले कळताच हातात कटर घेऊन ही मंडळी तेथे पाेहोचत हाेती. झाड कापून बाजूला करण्याचे काम करीत हाेते. तसेच विद्युत मित्र म्हणून ओळखले जाणारे दिनेश रेवळे यांनी झाडे पडल्यामुळे तुटून पडलेल्या विद्युत तारा परत जोडून विद्युत प्रवाह सुरळीत सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.

त्यांच्या मदतीसाठी गावातील हौशी नवतरुण मित्रमंडळ नाणीजचे सदस्य बाबू सरफरे, चिनू सावंत, सुमित रणसे, सुभाष घडशी, आदित्य सावंत, अनिकेत भागवत, नरेंद्र शिंदे, पंकज घडशी, राजा खावडकर, रुपेश कडू, संदेश सावंत, विनोद भागवत, अनमोल भागवत, अमर हतपले, कृणाल सरफरे दिवसभर धडपड करत होते.

या वादळात घरांचे नुकसान झालेल्या घरमालकांना मंत्री उदय सामंत यांनी दिलेले सिमेंट पत्रे केतन नवाले, नितीन गुरव यांनी पुढाकार घेऊन घरपाेच केले. उपसरपंच राधिका शिंदे, पोलीस पाटील नितीन कांबळे, तंटामुक्त अध्यक्ष सुधीर कांबळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामकृती दल सदस्य यांचेही सहकार्य लाभले.

—————————

हजाराेंचा ताेटा

गौरव संसारे यांचे आजोबा दत्तात्रेय संसारे यांचे महिनाभरापूर्वीच निधन झाले हाेते. त्यामुळे त्यांची व्यवसायातली गणितेही बिघडली. त्यामुळे झाडावरचा आंबा काढायचा तसाच राहून गेला होता. स्वतःचा हजारोंचा तोटा सहन करून गौरव संसारे वादळाच्या दिवशी सकाळी ७ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत तहान, भूक हरपून गावात फिरत होते.

—————————

रत्नागिरी तालुक्यातील नाणीज गावात काेसळलेली झाडे कापून बाजूला करण्यासाठी सरपंच गाैरव संसारे आपल्या मित्रांसह घटनास्थळी दाखल झाले हाेते.