शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:चे नुकसान साेसून ‘ते’ धावले इतरांच्या मदतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:32 IST

अरुण आडिवरेकर लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : चक्रीवादळात तयार झालेला सुमारे १०० पेटी आंब्यांचा बागेत सडा पडलेला असताना त्याकडे ...

अरुण आडिवरेकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : चक्रीवादळात तयार झालेला सुमारे १०० पेटी आंब्यांचा बागेत सडा पडलेला असताना त्याकडे दुर्लक्ष करून नाणीजमधील कुटुंबांच्या मदतीसाठी धावत जाऊन मदत कार्य करण्याचे काम नाणीजचे सरपंच गाैरव संसारे यांनी केले. पडलेला आंबा वायाच जाणार हे गृहीत धरून संकटात सापडलेल्यांना मदत करण्यास त्यांनी प्राधान्य दिले.

तौक्ते वादळात रत्नागिरी तालुक्यातील नाणीज गावाचेही मोठे नुकसान झाले आहे. त्या दिवशी गावात वाडीवार खूप ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. काहींच्या घरांचे नुकसान झाले. त्यामध्ये पत्रे उडाले, घरांच्या भिंती कोसळल्या, आंबा बागांचे अतोनात नुकसान झाले. या वेळी नाणीज गावचे सरपंच गौरव संसारे हे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन गावात गेले आणि ज्या - ज्या ठिकाणी, घरावर, रस्त्यावर पडलेली झाडे तत्काळ बाजूला करण्यासाठी मदत केली.

गौरव संसारे यांचा पिढीजात आंबा व्यवसाय आहे. स्वतःच्या आंबा बागेत सुमारे १०० पेटी आंब्यांचा सडा पडलेला असतानाही त्याकडे त्यांनी दुर्लक्ष करून नाणीजवासीयांच्या प्रत्येक कुटुंबाच्या मदतीला ते धावले. या वेळी त्यांनी महामार्गावर पडलेली झाडेही तत्काळ बाजूला करून रस्ता माेकळा करण्यासाठी प्रयत्न केले.

या मदत कार्यात त्यांना समीर तारी, सागर तारी, नाना वाघाटे, संदेश दरडी यांनीही सहकार्य केले. झाड पडलेले कळताच हातात कटर घेऊन ही मंडळी तेथे पाेहोचत हाेती. झाड कापून बाजूला करण्याचे काम करीत हाेते. तसेच विद्युत मित्र म्हणून ओळखले जाणारे दिनेश रेवळे यांनी झाडे पडल्यामुळे तुटून पडलेल्या विद्युत तारा परत जोडून विद्युत प्रवाह सुरळीत सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.

त्यांच्या मदतीसाठी गावातील हौशी नवतरुण मित्रमंडळ नाणीजचे सदस्य बाबू सरफरे, चिनू सावंत, सुमित रणसे, सुभाष घडशी, आदित्य सावंत, अनिकेत भागवत, नरेंद्र शिंदे, पंकज घडशी, राजा खावडकर, रुपेश कडू, संदेश सावंत, विनोद भागवत, अनमोल भागवत, अमर हतपले, कृणाल सरफरे दिवसभर धडपड करत होते.

या वादळात घरांचे नुकसान झालेल्या घरमालकांना मंत्री उदय सामंत यांनी दिलेले सिमेंट पत्रे केतन नवाले, नितीन गुरव यांनी पुढाकार घेऊन घरपाेच केले. उपसरपंच राधिका शिंदे, पोलीस पाटील नितीन कांबळे, तंटामुक्त अध्यक्ष सुधीर कांबळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामकृती दल सदस्य यांचेही सहकार्य लाभले.

—————————

हजाराेंचा ताेटा

गौरव संसारे यांचे आजोबा दत्तात्रेय संसारे यांचे महिनाभरापूर्वीच निधन झाले हाेते. त्यामुळे त्यांची व्यवसायातली गणितेही बिघडली. त्यामुळे झाडावरचा आंबा काढायचा तसाच राहून गेला होता. स्वतःचा हजारोंचा तोटा सहन करून गौरव संसारे वादळाच्या दिवशी सकाळी ७ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत तहान, भूक हरपून गावात फिरत होते.

—————————

रत्नागिरी तालुक्यातील नाणीज गावात काेसळलेली झाडे कापून बाजूला करण्यासाठी सरपंच गाैरव संसारे आपल्या मित्रांसह घटनास्थळी दाखल झाले हाेते.