शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

हिंदी शिक्षकांनी एकत्र येण्याची गरज : जोशी

By admin | Updated: December 16, 2014 00:20 IST

महाराष्ट्रातील हिंदी शिक्षकांना जादा तास घेऊन काम करावे लागते. पहिलीपासून राज्य शासनाने हिंदी विषय सुरु केला पाहिजे.

चिपळूण : राज्यात पाचवी ते बारावीपर्यंतच्या हिंदी द्वितीय भाषा अभ्यासक्रमात राज्य शासनाकडून वारंवार बदल करून समस्या निर्माण केल्या जात आहेत. त्याच्या निवारणार्थ सर्व हिंदी शिक्षक, हिंदी प्राध्यापक, हिंदीप्रेमी साहित्यिक यांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने त्रिभाषा सुत्रांचा स्वीकार केला आहे. मराठी प्रथम भाषा ६ तासिका, हिंदी द्वितीय भाषा ४ तासिका, इंग्रजी तृतीय भाषा ८ तासिका आहेत. मराठी १०० अंक, हिंदी द्वितीय भाषा १०० अंक, इंग्रजी तृतीय भाषा १०० अंक, समान भाषा, समान अंक, समान तासिका अभ्यासक्रमात उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाने यापूर्वी अनेकवेळा निवेदन देऊन १ लाख सह्यांचे अभियान, ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांचे प्रस्ताव, जिल्हा परिषद अध्यक्षांची पत्र व प्रस्ताव, शालेय शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव, संचालक, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेचे संचालक प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभाग, पुणे यांना पाठविली आहेत.राज्य शासनाने पहिलीपासून इंग्रजी विषय सुरु केला आहे. या भाषेला ८ तासिका परंतु, हिंदी द्वितीय भाषा केवळ चार तासिका, महाराष्ट्रातील हिंदी शिक्षकांना जादा तास घेऊन काम करावे लागते. पहिलीपासून राज्य शासनाने हिंदी विषय सुरु केला पाहिजे. ते म्हणाले, दहावीसाठी राज्य शासनाने व्यवसायाभिमुख शिक्षण, शालेय अभ्यासक्रमात नवीन विषय द्वितीय किंवा तृतीय भाषेऐवजी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही भाषा विषयांवर अन्याय नको. व्यवसायाभिमुख शिक्षणाचा स्वतंत्र विषय समाविष्ट करण्यात यावा. अकरावी, बारावी उच्च माध्यमिक स्तरावर मराठी माध्यमाच्या शाळांमधून उर्दू विषय कायम ठेवण्याचे धोरण राज्य शासन अमलात आणत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे हिंदी द्वितीय भाषेवर अन्याय होत आहे. हिंदी राष्ट्रभाषा असून, त्या भाषेचा व या भाषेवर प्रेम करणाऱ्यांनी सन्मान वाढविण्याऐवजी त्याचे खच्चीकरण करण्याची वृत्ती योग्य नसून सर्वांनी एकत्र यावे. (प्रतिनिधी)