शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

हिंदी शिक्षकांनी एकत्र येण्याची गरज : जोशी

By admin | Updated: December 16, 2014 00:20 IST

महाराष्ट्रातील हिंदी शिक्षकांना जादा तास घेऊन काम करावे लागते. पहिलीपासून राज्य शासनाने हिंदी विषय सुरु केला पाहिजे.

चिपळूण : राज्यात पाचवी ते बारावीपर्यंतच्या हिंदी द्वितीय भाषा अभ्यासक्रमात राज्य शासनाकडून वारंवार बदल करून समस्या निर्माण केल्या जात आहेत. त्याच्या निवारणार्थ सर्व हिंदी शिक्षक, हिंदी प्राध्यापक, हिंदीप्रेमी साहित्यिक यांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने त्रिभाषा सुत्रांचा स्वीकार केला आहे. मराठी प्रथम भाषा ६ तासिका, हिंदी द्वितीय भाषा ४ तासिका, इंग्रजी तृतीय भाषा ८ तासिका आहेत. मराठी १०० अंक, हिंदी द्वितीय भाषा १०० अंक, इंग्रजी तृतीय भाषा १०० अंक, समान भाषा, समान अंक, समान तासिका अभ्यासक्रमात उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाने यापूर्वी अनेकवेळा निवेदन देऊन १ लाख सह्यांचे अभियान, ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांचे प्रस्ताव, जिल्हा परिषद अध्यक्षांची पत्र व प्रस्ताव, शालेय शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव, संचालक, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेचे संचालक प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभाग, पुणे यांना पाठविली आहेत.राज्य शासनाने पहिलीपासून इंग्रजी विषय सुरु केला आहे. या भाषेला ८ तासिका परंतु, हिंदी द्वितीय भाषा केवळ चार तासिका, महाराष्ट्रातील हिंदी शिक्षकांना जादा तास घेऊन काम करावे लागते. पहिलीपासून राज्य शासनाने हिंदी विषय सुरु केला पाहिजे. ते म्हणाले, दहावीसाठी राज्य शासनाने व्यवसायाभिमुख शिक्षण, शालेय अभ्यासक्रमात नवीन विषय द्वितीय किंवा तृतीय भाषेऐवजी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही भाषा विषयांवर अन्याय नको. व्यवसायाभिमुख शिक्षणाचा स्वतंत्र विषय समाविष्ट करण्यात यावा. अकरावी, बारावी उच्च माध्यमिक स्तरावर मराठी माध्यमाच्या शाळांमधून उर्दू विषय कायम ठेवण्याचे धोरण राज्य शासन अमलात आणत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे हिंदी द्वितीय भाषेवर अन्याय होत आहे. हिंदी राष्ट्रभाषा असून, त्या भाषेचा व या भाषेवर प्रेम करणाऱ्यांनी सन्मान वाढविण्याऐवजी त्याचे खच्चीकरण करण्याची वृत्ती योग्य नसून सर्वांनी एकत्र यावे. (प्रतिनिधी)