शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

हिंदी शिक्षकांनी एकत्र येण्याची गरज : जोशी

By admin | Updated: December 16, 2014 00:20 IST

महाराष्ट्रातील हिंदी शिक्षकांना जादा तास घेऊन काम करावे लागते. पहिलीपासून राज्य शासनाने हिंदी विषय सुरु केला पाहिजे.

चिपळूण : राज्यात पाचवी ते बारावीपर्यंतच्या हिंदी द्वितीय भाषा अभ्यासक्रमात राज्य शासनाकडून वारंवार बदल करून समस्या निर्माण केल्या जात आहेत. त्याच्या निवारणार्थ सर्व हिंदी शिक्षक, हिंदी प्राध्यापक, हिंदीप्रेमी साहित्यिक यांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने त्रिभाषा सुत्रांचा स्वीकार केला आहे. मराठी प्रथम भाषा ६ तासिका, हिंदी द्वितीय भाषा ४ तासिका, इंग्रजी तृतीय भाषा ८ तासिका आहेत. मराठी १०० अंक, हिंदी द्वितीय भाषा १०० अंक, इंग्रजी तृतीय भाषा १०० अंक, समान भाषा, समान अंक, समान तासिका अभ्यासक्रमात उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाने यापूर्वी अनेकवेळा निवेदन देऊन १ लाख सह्यांचे अभियान, ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांचे प्रस्ताव, जिल्हा परिषद अध्यक्षांची पत्र व प्रस्ताव, शालेय शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव, संचालक, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेचे संचालक प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभाग, पुणे यांना पाठविली आहेत.राज्य शासनाने पहिलीपासून इंग्रजी विषय सुरु केला आहे. या भाषेला ८ तासिका परंतु, हिंदी द्वितीय भाषा केवळ चार तासिका, महाराष्ट्रातील हिंदी शिक्षकांना जादा तास घेऊन काम करावे लागते. पहिलीपासून राज्य शासनाने हिंदी विषय सुरु केला पाहिजे. ते म्हणाले, दहावीसाठी राज्य शासनाने व्यवसायाभिमुख शिक्षण, शालेय अभ्यासक्रमात नवीन विषय द्वितीय किंवा तृतीय भाषेऐवजी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही भाषा विषयांवर अन्याय नको. व्यवसायाभिमुख शिक्षणाचा स्वतंत्र विषय समाविष्ट करण्यात यावा. अकरावी, बारावी उच्च माध्यमिक स्तरावर मराठी माध्यमाच्या शाळांमधून उर्दू विषय कायम ठेवण्याचे धोरण राज्य शासन अमलात आणत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे हिंदी द्वितीय भाषेवर अन्याय होत आहे. हिंदी राष्ट्रभाषा असून, त्या भाषेचा व या भाषेवर प्रेम करणाऱ्यांनी सन्मान वाढविण्याऐवजी त्याचे खच्चीकरण करण्याची वृत्ती योग्य नसून सर्वांनी एकत्र यावे. (प्रतिनिधी)