शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
3
कोण आहे बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
4
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
5
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
6
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
7
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
8
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता
9
हिरो डॉग! मालकाला वाचवण्यासाठी जळते डायनामाइट तोंडात धरले अन्..; Video पाहून भावूक झाले लोक
10
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
11
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
12
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
13
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
14
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
15
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
16
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
17
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
18
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
19
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
20
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट

महामार्ग चौपदरीकरण लांबणीवर?

By admin | Updated: December 25, 2016 23:34 IST

भूसंपादन रेंगाळले : मार्चनंतर काम सुरू होण्याची शक्यता

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरीमुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाच्या आरंभाचा डिसेंबर २०१६ मधील मुहूर्त हुकला आहे. भूसंपादनाची रेंगाळलेली प्रक्रिया व जमीन मालकांची नुकसानभरपाई देण्यास झालेल्या विलंबामुळे मार्च २०१७ पर्यंत चौपदरीकरणाचे काम लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी गेल्या दोन दशकांपासून केली जात होती. २०१३मध्ये या चौपदरीकरणाच्या कामातील दोन टप्प्यांना मान्यता मिळाली. त्यानंतरही हा प्रकल्प रेंगाळणार अशी चिन्हे होती. परंतु केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर या महामार्गाच्या चौपदरीकरणाचा विषय प्राधान्याने पुढे आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाला गती दिली. महामार्ग चौपदरीकरण ११ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून उभारण्याची घोषणा त्यांनी रत्नागिरीत दोन वर्षांपूर्वी केली होती. त्यानुसार गडकरी यांनी या प्रकल्पाला गती देण्यासाठी आवश्यक पावले उचलली. चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या अधिकच्या जमिनीसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली. हरकतींवर सुनावणीही घेण्यात आली. महामार्गावरील काही भागात असलेल्या भूसंपादनातील समस्यांवरही गेल्या काही दिवसांत मात करण्यात राष्ट्रीय महामार्ग विभागाला यश आले आहे. एकाचवेळी अनेक ठिकाणी कॉँक्रीटीकरणातून चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे. भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून जमीनमालकांना त्यांची नुकसानभरपाई दिल्यानंतरच प्रत्यक्ष कामाचा आरंभ डिसेंबर २०१६मध्ये होणार असल्याची घोषणा खासदार विनायक राऊत यांनी तीन महिन्यांपूर्वी केली होती. आता डिसेंबर महिना संपत आला आहे. त्यामुळे २०१६चा मुहूर्त हुकला आहे. महामार्ग विभागाकडे चौपदरीकरण कामाबाबत माहिती घेतली असता भूसंपादन प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याचे सांगण्यात आले. संपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जमीनमालकांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे. या प्रक्रियेला अजून दोन ते तीन महिने लागण्याची शक्यता आहे. चौपदरीकरणाचे काम लवकर सुरू व्हावे व खड्डेमय महामार्गावरून होत असलेली वाहनांची फरफट दूर व्हावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. हजारो कोटींची मिळणार भरपाई रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे २०० किलोमीटर लांबीच्या महामार्ग चौपदरीकरणासाठी जमीनमालकांना सुमारे दीड हजार कोटी रुपये नुकसानभरपाई म्हणून द्यावे लागणार आहेत. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या जमिनीचा मोबदला म्हणून सुमारे ५ हजार कोटींची भरपाई द्यावी लागणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, भरपाईची घोषणा अद्यापही झालेली नाही. इंदापूर ते झाराप या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३६६.१७० किलोमीटर्सच्या चौपदरीकरण कामाला ४ जून २०१३, ६ जून २०१३ व २१ जून २०१३ अन्वये मान्यता.प्रथम चार टप्प्यात होणारे चौपदरीकरण काम आता सहा टप्प्यात एकाचवेळी सुरू होणार. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौपदरीकरण जागेचा सर्वे पूर्ण. चौपदरीकरणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १८९ गावांतील जमिनीचा समावेश. संगमेश्वर, पाली, लांजासह अनेक बाजारपेठांमधून उड्डाणपूल उभारले जाणार.