शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग चौपदरीकरण लांबणीवर?

By admin | Updated: December 25, 2016 23:34 IST

भूसंपादन रेंगाळले : मार्चनंतर काम सुरू होण्याची शक्यता

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरीमुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाच्या आरंभाचा डिसेंबर २०१६ मधील मुहूर्त हुकला आहे. भूसंपादनाची रेंगाळलेली प्रक्रिया व जमीन मालकांची नुकसानभरपाई देण्यास झालेल्या विलंबामुळे मार्च २०१७ पर्यंत चौपदरीकरणाचे काम लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी गेल्या दोन दशकांपासून केली जात होती. २०१३मध्ये या चौपदरीकरणाच्या कामातील दोन टप्प्यांना मान्यता मिळाली. त्यानंतरही हा प्रकल्प रेंगाळणार अशी चिन्हे होती. परंतु केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर या महामार्गाच्या चौपदरीकरणाचा विषय प्राधान्याने पुढे आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाला गती दिली. महामार्ग चौपदरीकरण ११ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून उभारण्याची घोषणा त्यांनी रत्नागिरीत दोन वर्षांपूर्वी केली होती. त्यानुसार गडकरी यांनी या प्रकल्पाला गती देण्यासाठी आवश्यक पावले उचलली. चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या अधिकच्या जमिनीसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली. हरकतींवर सुनावणीही घेण्यात आली. महामार्गावरील काही भागात असलेल्या भूसंपादनातील समस्यांवरही गेल्या काही दिवसांत मात करण्यात राष्ट्रीय महामार्ग विभागाला यश आले आहे. एकाचवेळी अनेक ठिकाणी कॉँक्रीटीकरणातून चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे. भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून जमीनमालकांना त्यांची नुकसानभरपाई दिल्यानंतरच प्रत्यक्ष कामाचा आरंभ डिसेंबर २०१६मध्ये होणार असल्याची घोषणा खासदार विनायक राऊत यांनी तीन महिन्यांपूर्वी केली होती. आता डिसेंबर महिना संपत आला आहे. त्यामुळे २०१६चा मुहूर्त हुकला आहे. महामार्ग विभागाकडे चौपदरीकरण कामाबाबत माहिती घेतली असता भूसंपादन प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याचे सांगण्यात आले. संपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जमीनमालकांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे. या प्रक्रियेला अजून दोन ते तीन महिने लागण्याची शक्यता आहे. चौपदरीकरणाचे काम लवकर सुरू व्हावे व खड्डेमय महामार्गावरून होत असलेली वाहनांची फरफट दूर व्हावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. हजारो कोटींची मिळणार भरपाई रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे २०० किलोमीटर लांबीच्या महामार्ग चौपदरीकरणासाठी जमीनमालकांना सुमारे दीड हजार कोटी रुपये नुकसानभरपाई म्हणून द्यावे लागणार आहेत. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या जमिनीचा मोबदला म्हणून सुमारे ५ हजार कोटींची भरपाई द्यावी लागणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, भरपाईची घोषणा अद्यापही झालेली नाही. इंदापूर ते झाराप या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३६६.१७० किलोमीटर्सच्या चौपदरीकरण कामाला ४ जून २०१३, ६ जून २०१३ व २१ जून २०१३ अन्वये मान्यता.प्रथम चार टप्प्यात होणारे चौपदरीकरण काम आता सहा टप्प्यात एकाचवेळी सुरू होणार. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौपदरीकरण जागेचा सर्वे पूर्ण. चौपदरीकरणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १८९ गावांतील जमिनीचा समावेश. संगमेश्वर, पाली, लांजासह अनेक बाजारपेठांमधून उड्डाणपूल उभारले जाणार.