शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

सप्टेंबर महिन्यातील सर्वात उच्चांकी पाऊस

By admin | Updated: September 7, 2014 00:34 IST

संततधार सकाळपर्यंत कायम

रत्नागिरी : जिल्ह्यात काल (शुक्रवार) पासून पावसाने धरलेली संततधार सकाळपर्यंत कायम होती. गेल्या २४ तासात मुसळधार पडलेल्या या पावसाने आजवरच्या सप्टेंबर महिन्यात एका दिवसात एकूण १०२२.८५ मिमी पाऊस (सरासरी ११३.६५ मिलीमीटर)ची नोंद करत उच्चांक गाठला आहे. सर्वाधिक पाऊस दापोली तालुक्यात (१७२.८५ मिलीमीटर ) झाली आहे. गेले दोन दिवस रत्नागिरी शहर आणि परिसराला पावसाने झोडपून काढले. या पावसाने राजापूर, रत्नागिरी आणि मंडणगड वगळता उर्वरित दापोली, त्याखालोखाल खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा तालुक्यांना झोडपले आहे. या तालुक्यांमध्ये ११ सेंटीमीटर्सपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात एकाच दिवशी एवढा उच्चांकी पाऊस आजवर झालेला नाही. या पावसामुळे राजापूरसह काही तालुक्यांमध्ये पडझडीच्या घटना घडल्याने नुकसान झाले आहे. गतवर्षी याचदिवशी जिल्ह्यात ११ मिलीमीटर सरासरीने पडल्याची जिल्हा नियंत्रण कक्षाकडे नोंद आहे. त्यामुळे गेल्या २४ तासात झालेला १११ मिलीमीटर पाऊस म्हणजे गतवर्षीच्या तुलनेने दहापट झाला आहे. अजूनही पाऊस जोरदार पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यात ६ सप्टेंबरच्या सकाळ पासून पुढील ७२ तासात अनेक ठिकाणी ७ ते १२ सेंटिमीटर्सपर्यंत पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. (प्रतिनिधी)