शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

सप्टेंबर महिन्यातील सर्वात उच्चांकी पाऊस

By admin | Updated: September 7, 2014 00:34 IST

संततधार सकाळपर्यंत कायम

रत्नागिरी : जिल्ह्यात काल (शुक्रवार) पासून पावसाने धरलेली संततधार सकाळपर्यंत कायम होती. गेल्या २४ तासात मुसळधार पडलेल्या या पावसाने आजवरच्या सप्टेंबर महिन्यात एका दिवसात एकूण १०२२.८५ मिमी पाऊस (सरासरी ११३.६५ मिलीमीटर)ची नोंद करत उच्चांक गाठला आहे. सर्वाधिक पाऊस दापोली तालुक्यात (१७२.८५ मिलीमीटर ) झाली आहे. गेले दोन दिवस रत्नागिरी शहर आणि परिसराला पावसाने झोडपून काढले. या पावसाने राजापूर, रत्नागिरी आणि मंडणगड वगळता उर्वरित दापोली, त्याखालोखाल खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा तालुक्यांना झोडपले आहे. या तालुक्यांमध्ये ११ सेंटीमीटर्सपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात एकाच दिवशी एवढा उच्चांकी पाऊस आजवर झालेला नाही. या पावसामुळे राजापूरसह काही तालुक्यांमध्ये पडझडीच्या घटना घडल्याने नुकसान झाले आहे. गतवर्षी याचदिवशी जिल्ह्यात ११ मिलीमीटर सरासरीने पडल्याची जिल्हा नियंत्रण कक्षाकडे नोंद आहे. त्यामुळे गेल्या २४ तासात झालेला १११ मिलीमीटर पाऊस म्हणजे गतवर्षीच्या तुलनेने दहापट झाला आहे. अजूनही पाऊस जोरदार पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यात ६ सप्टेंबरच्या सकाळ पासून पुढील ७२ तासात अनेक ठिकाणी ७ ते १२ सेंटिमीटर्सपर्यंत पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. (प्रतिनिधी)