शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाचा विद्यार्थिनींवर अतिप्रसंग

By admin | Updated: July 9, 2016 00:59 IST

अनेक मुलींवर अत्याचार? : शिक्षण विभागाकडे तक्रार, शिक्षणाधिकाऱ्यांची भेट

दापोली : पन्नास वर्षीय गुरुजीचे प्रताप उघड झाल्यानंतर दोनच दिवसांनंतर आणखी एका गुरुजीचे प्रताप उघड झाले आहेत. आपल्याच शाळेतील विद्यार्थिनीशी अतिप्रसंग केल्याप्रकरणी भरबैठकीत गावातच त्या वासनांध गुरुजीची गाडी फोडल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यानंतर हा मास्तर वैद्यकीय रजेवर गेला असून, ग्रामस्थांनी या शाळेत मुले न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी शिक्षणाधिकारी तसेच पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या शाळेला भेट दिली.वेळवी कादिवली पंचक्रोशीमध्ये जिल्हा परिषदेच्या एका शाळेमध्ये ‘खांबा’सारखा असणारा हा वासनांध गुरुजी नोकरी करीत आहे. गेल्या वर्षांपासून त्याने आपली वासना भागवण्यासाठी शाळेतील सहावी व सातवीतील काही विद्यार्थिनींशी लगट वाढवली होती. गेले अनेक दिवस हा प्रकार चालू असल्याचे गावात चर्चिले जात होते. मात्र, चार दिवसांपूर्वी त्याने नेहमीप्रमाणे एका विद्यार्थिनीशी अश्लिल चाळे करताना पोषण आहार शिजवणाऱ्या बाईने रंगेहाथ पकडले आणि संपूर्ण गावामध्ये बभ्रा झाला. पुढाऱ्याने मध्यस्थी करुन वेळवी गावामध्ये बैठक घेण्याचे निश्चित केले. त्याप्रमाणे दोन दिवसांपूर्वी बैठक चालू असतानाच हा गुरुजी आम्हाला शाळेत नको, तत्काळ बदला, अशी मागणी ग्रामस्थांनी भरबैठकीत केली व संतापलेल्या काही ग्रामस्थांनी शिक्षकाच्या चारचाकी गाडीवर हल्ला चढवित गाडीची काच फोडून टाकली. गुरुजीला शाळेतून हाकला, या विषयावर बैठक समाप्त झाली. गुरुवारी या गावातील ग्रामस्थांनी सदर शिक्षकाच्या विरोधात दापोलीच्या पंचायत समितीच्या सभापतीकडे अर्ज दिला आहे. प्रभारी गटशिक्षणाधिकारी नंदलाल शिंदे म्हणाले की, या शिक्षकाबद्दल ग्रामस्थांमध्ये असंतोष आहे, तशा स्वरुपाचा अर्जही पंचायत समितीकडे दाखल झाले आहेत. मात्र, या अर्जामध्ये शिक्षकाचे गैरवर्तन व उध्दट बोलणे एवढीच मोघम कारणे नमूद करण्यात आली आहेत. त्यामुळे गुरुवारी आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन पाहणी केली, त्यावेळी याच गावातील काही पालकांनी हा शिक्षक जर शाळेत राहणार असेल, तर आम्ही आमच्या मुलांना शाळेतच पाठवणार नाही, असा केवळ इशाराच न देता काही पालकांनी विद्यार्थिनींना शाळेतच पाठविले नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या गंभीर प्रकारासंदर्भात शाळेला दापोलीच्या सभापती दीप्ती निखार्गे व उपसभापती उन्मेष राजे यांनीही काल भेट दिली व ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यावेळी सभापती निखार्गे यांनी सत्य परिस्थिती शासनासमोर आणावी, असे आवाहन तेथील स्थानिक ग्रामस्थांना केले आहे. तर उपसभापती उन्मेष राजे म्हणाले की, जर पालकांनी तशा स्वरुपाची तक्रार दिली तर आम्ही शिक्षकांवर कडक कारवाई करू, असे सांगितले. (प्रतिनिधी)