शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
2
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
3
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
4
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
5
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
6
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
7
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
8
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील
9
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
10
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
11
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
12
'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या
13
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
14
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
15
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
16
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
17
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
18
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
19
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
20
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

समुद्र किनाऱ्यावर हाय अलर्ट

By admin | Updated: August 4, 2015 23:44 IST

दापोली तालुका : किनाऱ्यावर आढळलेल्या बॅरलने खळबळ

दापोली : दापोली तालुक्यातील बुरोंडी ते आंजर्ले दरम्यानच्या समुद्रकिनाऱ्यावर केमिकलने भरलेले १३ संशयास्पद बॅरल आढळून आल्याने किनारपट्टीवरील गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सन १९९०च्या आठवणी ताज्या झाल्याने दुसऱ्या दिवशीही समुद्रात अशा प्रकारचे काही बॅरल असल्याचे मच्छीमारांनी कळवले आहे. किनाऱ्यावरुन ताब्यात घेण्यात आलेल्या बॅरलमधील द्रव्य तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले असून, अहवालानंतर या घटनेचे गूढ उकलणार आहे.दापोली तालुक्यातील समुद्रकिनाऱ्याचा यापूर्वी स्मगलिंगसाठी वापर झाल्याचा पुरावा आहे. याच किनारपट्टीवर संशयास्पद जहाजसुद्धा येऊन गेले होते. अशा प्रकारच्या घटना या समुद्रकिनाऱ्यावर वारंवार घडू लागल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुरोंडी, लाडघर, कोळथरे, कर्दे, मुरुड, पाळंदे, हर्णै, आंजर्ले, केळशी, आडे, पाडले या समुद्रकिनाऱ्यावर वारंवार संशयास्पद वस्तू किनाऱ्याला लागत आहे. सोमवारी दापोली पोलिसांना १३ बॅरल सापडल्यानंतर आजसुद्धा समुद्रात काही बॅरल तरंगत असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. मंगळवारी दिवसभर दापोली पोलीस बॅरलचा शोध घेत आहेत.दापोलीत सापडलेल्या बॅरलमुळे खळबळ उडाली असून, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन दापोलीचे पोलीस निरीक्षक डॉ. नियल बेन यांनी केले आहे. समुद्र किनाऱ्यावरील शोधमोहिमेसाठी पोलीस उपनिरीक्षक शुभांगी म्हस्के, हर्णै, पोलीस उपनिरीक्षक सी. जी. कांबळे, बुरोंडी बीट अंमलदार बांगर, पोलीस उपनिरीक्षक पी. डी. कांबळे यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)पोलीस यंत्रणा सतर्क...जिल्ह्यात केवळ दापोली तालुक्यातील समुद्र किनारीच अशा बॅरल आढळून आल्या आहेत. या बॅरलमध्ये रसायन भरलेले होते. मात्र, ते कोणते, याचा शोध लागलेला नाही. अजूनही बॅरल किनारी येत असल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे. या बॅरेलमध्ये नेमके कोणते रसायन आहे, याचा शोध प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालानंतरच लागणार आहे. पोलिसांनी सतर्कतेचा उपाय म्हणून जिल्ह्यात हाय अलर्ट जाहीर केला आहे. पोलिसांना दक्ष राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.पोलीस यंत्रणा सतर्क...जिल्ह्यात केवळ दापोली तालुक्यातील समुद्र किनारीच अशा बॅरल आढळून आल्या आहेत. या बॅरलमध्ये रसायन भरलेले होते. मात्र, ते कोणते, याचा शोध लागलेला नाही. अजूनही बॅरल किनारी येत असल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे. या बॅरेलमध्ये नेमके कोणते रसायन आहे, याचा शोध प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालानंतरच लागणार आहे. पोलिसांनी सतर्कतेचा उपाय म्हणून जिल्ह्यात हाय अलर्ट जाहीर केला आहे. पोलिसांना दक्ष राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.