शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

पडद्यावरचा खलनायक होता वास्तवातला नायकच

By admin | Updated: November 3, 2014 23:27 IST

सदाशिव अमरापूरकर : अंनिसने जागवल्या जुन्या आठवणीत

रत्नागिरी : नाटक, चित्रपट यातून अप्रतिम खलनायक रंगवणाऱ्या सदाशिव अमरापूरकर यांच्यात संवेदनशील माणूस कायम जागृत राहिला, त्याचा प्रत्यय १९९९ साली निवडणुकीच्या वेळी समाजवादी मंडळींनी काढलेल्या प्रबोधन यात्रेवेळी आल्याची प्रतिक्रिया येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ. आशुतोष मुळ्ये यांनी व्यक्त केली. प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे आज निधन झाले. त्या अनुषंगाने डॉ. मुळ्ये यांनी आठवणी जागृत केल्या. १९९९ साली विधानसभा निवडणुका घोषित झाल्या. यावेळी ‘जय भवानी जय शिवाजी, टाक खंडणी’चे राजकारण मुंबईसह कोकणात वाढू लागले होते. या धर्मांध राजकारणाविरोधात डॉ. नरेंद्र दाभोलकर, सदाशिव अमरापूरकर, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, प्रा. हरी नरके आदी समाजवादी मंडळींनी मतदारांमध्ये प्रबोधन व्हावे, त्यांनी कुठल्याही प्रकाराला बळी न पडता, निर्भयपणे मतदान करता यावे, यासाठी महाराष्ट्रभर या मंडळींनी ‘लोकशाही प्रबोधन व्यासपीठ’ यात्रा काढली. या यात्रेला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. रत्नागिरीत दत्तमंगल कार्यालयात या ‘लोकशाही प्रबोधन व्यासपीठ’ कार्यक्रमाचे आयोजन अंधश्रद्धा निर्मुलन समितीतर्फे करण्यात आले होते. यावेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर, सदाशिव अमरापूरकर, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, प्रा. हरी नरके हे चौघेही उपस्थित होते. यावेळी हे मंगल कार्यालय तुडुंब भरले होते. या निवडणुकीसाठी मतदारांनी जागृत व्हावे, यासाठी या चौघांनी केलेली भाषणे अतिशय प्रभावी झाल्याचे डॉ. मुळ्ये यांनी सांगितले. ते म्हणाले, कार्यक्रम झाल्यानंतर डॉ. लागू आणि सदाशिव अमरापूरकर यांनी या यात्रेसाठी मदतीचा हात मागताच तिथल्या तिथे १२,००० रूपये जमा झाले होते. सर्व ठिकाणच्या यात्रेपेक्षा रत्नागिरीत मिळालेली ही रक्कम सर्वाधिक होती. सदाशिव अमरापूरकर खलनायकाच्या भूमिका केवळ रंगवित असले तरी त्यांच्यात सामाजिक बांधिलकीची जाणीव किती तीव्र होती, हे त्यावेळी दिसून आले. अभिनेता म्हणून ते श्रेष्ठच होते. पण त्यांच्यातील संवेदनशील व्यक्ती सतत जागृत राहिली, कार्य करत राहिली, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)अमरापूरकर यांच्यातील संवेदनशील माणूस कायम जागता राहिला.अंधश्रध्दा निर्मुलन समितीने वाहिली शब्दपुष्पांजली.अमरापूरकर यांनी यात्रेच्या मदतीसाठी हात मागताच जागच्या जागी १२ हजार रूपये जमा.सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेला माणूस