शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

पडद्यावरचा खलनायक होता वास्तवातला नायकच

By admin | Updated: November 3, 2014 23:27 IST

सदाशिव अमरापूरकर : अंनिसने जागवल्या जुन्या आठवणीत

रत्नागिरी : नाटक, चित्रपट यातून अप्रतिम खलनायक रंगवणाऱ्या सदाशिव अमरापूरकर यांच्यात संवेदनशील माणूस कायम जागृत राहिला, त्याचा प्रत्यय १९९९ साली निवडणुकीच्या वेळी समाजवादी मंडळींनी काढलेल्या प्रबोधन यात्रेवेळी आल्याची प्रतिक्रिया येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ. आशुतोष मुळ्ये यांनी व्यक्त केली. प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे आज निधन झाले. त्या अनुषंगाने डॉ. मुळ्ये यांनी आठवणी जागृत केल्या. १९९९ साली विधानसभा निवडणुका घोषित झाल्या. यावेळी ‘जय भवानी जय शिवाजी, टाक खंडणी’चे राजकारण मुंबईसह कोकणात वाढू लागले होते. या धर्मांध राजकारणाविरोधात डॉ. नरेंद्र दाभोलकर, सदाशिव अमरापूरकर, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, प्रा. हरी नरके आदी समाजवादी मंडळींनी मतदारांमध्ये प्रबोधन व्हावे, त्यांनी कुठल्याही प्रकाराला बळी न पडता, निर्भयपणे मतदान करता यावे, यासाठी महाराष्ट्रभर या मंडळींनी ‘लोकशाही प्रबोधन व्यासपीठ’ यात्रा काढली. या यात्रेला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. रत्नागिरीत दत्तमंगल कार्यालयात या ‘लोकशाही प्रबोधन व्यासपीठ’ कार्यक्रमाचे आयोजन अंधश्रद्धा निर्मुलन समितीतर्फे करण्यात आले होते. यावेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर, सदाशिव अमरापूरकर, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, प्रा. हरी नरके हे चौघेही उपस्थित होते. यावेळी हे मंगल कार्यालय तुडुंब भरले होते. या निवडणुकीसाठी मतदारांनी जागृत व्हावे, यासाठी या चौघांनी केलेली भाषणे अतिशय प्रभावी झाल्याचे डॉ. मुळ्ये यांनी सांगितले. ते म्हणाले, कार्यक्रम झाल्यानंतर डॉ. लागू आणि सदाशिव अमरापूरकर यांनी या यात्रेसाठी मदतीचा हात मागताच तिथल्या तिथे १२,००० रूपये जमा झाले होते. सर्व ठिकाणच्या यात्रेपेक्षा रत्नागिरीत मिळालेली ही रक्कम सर्वाधिक होती. सदाशिव अमरापूरकर खलनायकाच्या भूमिका केवळ रंगवित असले तरी त्यांच्यात सामाजिक बांधिलकीची जाणीव किती तीव्र होती, हे त्यावेळी दिसून आले. अभिनेता म्हणून ते श्रेष्ठच होते. पण त्यांच्यातील संवेदनशील व्यक्ती सतत जागृत राहिली, कार्य करत राहिली, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)अमरापूरकर यांच्यातील संवेदनशील माणूस कायम जागता राहिला.अंधश्रध्दा निर्मुलन समितीने वाहिली शब्दपुष्पांजली.अमरापूरकर यांनी यात्रेच्या मदतीसाठी हात मागताच जागच्या जागी १२ हजार रूपये जमा.सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेला माणूस