शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

पडद्यावरचा खलनायक होता वास्तवातला नायकच

By admin | Updated: November 3, 2014 23:27 IST

सदाशिव अमरापूरकर : अंनिसने जागवल्या जुन्या आठवणीत

रत्नागिरी : नाटक, चित्रपट यातून अप्रतिम खलनायक रंगवणाऱ्या सदाशिव अमरापूरकर यांच्यात संवेदनशील माणूस कायम जागृत राहिला, त्याचा प्रत्यय १९९९ साली निवडणुकीच्या वेळी समाजवादी मंडळींनी काढलेल्या प्रबोधन यात्रेवेळी आल्याची प्रतिक्रिया येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ. आशुतोष मुळ्ये यांनी व्यक्त केली. प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे आज निधन झाले. त्या अनुषंगाने डॉ. मुळ्ये यांनी आठवणी जागृत केल्या. १९९९ साली विधानसभा निवडणुका घोषित झाल्या. यावेळी ‘जय भवानी जय शिवाजी, टाक खंडणी’चे राजकारण मुंबईसह कोकणात वाढू लागले होते. या धर्मांध राजकारणाविरोधात डॉ. नरेंद्र दाभोलकर, सदाशिव अमरापूरकर, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, प्रा. हरी नरके आदी समाजवादी मंडळींनी मतदारांमध्ये प्रबोधन व्हावे, त्यांनी कुठल्याही प्रकाराला बळी न पडता, निर्भयपणे मतदान करता यावे, यासाठी महाराष्ट्रभर या मंडळींनी ‘लोकशाही प्रबोधन व्यासपीठ’ यात्रा काढली. या यात्रेला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. रत्नागिरीत दत्तमंगल कार्यालयात या ‘लोकशाही प्रबोधन व्यासपीठ’ कार्यक्रमाचे आयोजन अंधश्रद्धा निर्मुलन समितीतर्फे करण्यात आले होते. यावेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर, सदाशिव अमरापूरकर, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, प्रा. हरी नरके हे चौघेही उपस्थित होते. यावेळी हे मंगल कार्यालय तुडुंब भरले होते. या निवडणुकीसाठी मतदारांनी जागृत व्हावे, यासाठी या चौघांनी केलेली भाषणे अतिशय प्रभावी झाल्याचे डॉ. मुळ्ये यांनी सांगितले. ते म्हणाले, कार्यक्रम झाल्यानंतर डॉ. लागू आणि सदाशिव अमरापूरकर यांनी या यात्रेसाठी मदतीचा हात मागताच तिथल्या तिथे १२,००० रूपये जमा झाले होते. सर्व ठिकाणच्या यात्रेपेक्षा रत्नागिरीत मिळालेली ही रक्कम सर्वाधिक होती. सदाशिव अमरापूरकर खलनायकाच्या भूमिका केवळ रंगवित असले तरी त्यांच्यात सामाजिक बांधिलकीची जाणीव किती तीव्र होती, हे त्यावेळी दिसून आले. अभिनेता म्हणून ते श्रेष्ठच होते. पण त्यांच्यातील संवेदनशील व्यक्ती सतत जागृत राहिली, कार्य करत राहिली, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)अमरापूरकर यांच्यातील संवेदनशील माणूस कायम जागता राहिला.अंधश्रध्दा निर्मुलन समितीने वाहिली शब्दपुष्पांजली.अमरापूरकर यांनी यात्रेच्या मदतीसाठी हात मागताच जागच्या जागी १२ हजार रूपये जमा.सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेला माणूस