शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
3
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
4
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

वनौषधी लागवड; शून्य टक्के प्रतिसाद

By admin | Updated: April 5, 2016 00:51 IST

कृषी विभाग : जिल्ह््यातून एकही प्रस्ताव नाही

रत्नागिरी : कृषी विभागातर्फे गेली तीन वर्षे वनौषधी लागवड योजना राबविण्यात येत आहे. मात्र, या योजनेसाठी जिल्ह््यातून एकही प्रस्ताव शेतकऱ्यांनी पाठविलेला नाही. केंद्र शासनाच्या आयुष विभागातर्फे औषधी वनस्पती लागवडीसाठी करोडो रूपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. लागवडीची पध्दत व उपलब्ध बाजारपेठ याबाबत शेतकरी अनभिज्ञ असल्यामुळे या योजनेला आत्तापर्यंत शून्य टक्के प्रतिसाद लाभला आहे. राष्ट्रीय आयुष अभियान योजनेंतर्गत राज्यात वनौषधी लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. राज्याला ३७३ कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्याची सूचना केंद्र सरकारने केली आहे. सर्व जिल्ह््यांकडून प्राप्त होणाऱ्या आराखड्यानुसार राज्याचा आराखडा तयार होणार आहे. गेल्या तीन वर्षात रत्नागिरी जिल्ह््यात एकाही शेतकऱ्याने वनौषधी लागवडीसाठी प्रस्ताव पाठविलेला नाही. त्यामुळे जिल्ह््याचा अद्याप आराखडाच तयार केलेला नाही. भाजप शासनाने वनौषधी लागवडीवर विशेष भर दिला आहे. परंतु, जिल्ह््यात कोणत्या प्रकारची वनौषधी लागवड केली जावू शकते, याबद्दल शेतकरी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविली आहे. वास्तविक कोणतीही योजना राबवित असताना शासनाने दिलेल्या निकषांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. शासनाच्या निकषाप्रमाणे या योजनेसाठी घालण्यात आलेली जागेची, बाजारपेठेची अट शेतकऱ्यांना जाचक ठरत आहे. उत्पादित वनौषधींची विक्री नेमकी कोणाला करायची, वनौषधी उत्पादनामुळे शेतकऱ्यांना नेमका किती नफा होईल याबाबतही शेतकऱ्यांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या योजनेप्रमाणे ५४ प्रकारच्या वनौषधींची लागवड केली जावू शकते. दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठ व खासगी वनौषधी रोपवाटिकांमधून शेतकऱ्यांना रोपे उपलब्ध करून दिली जावू शकतात. त्यामुळे या योजनेंतर्गत वनौषधी लागवड करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी) जागृतीच नाही : शेतकरी अनभिज्ञच वनौषधीच्या लागवडीसाठी शासनाकडून योजना तयार करण्यात आली. मात्र, ही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलीच नाही. अनेक शेतकऱ्यांना योजनेची माहितीच नसल्याने प्रतिसाद कमी मिळाला आहे. लागवडीला चालना राज्याला ३७२ कोटींचा आराखडा तयार करण्याची सूचना केंद्र सरकारने केली आहे. या निधीतून अनेक वनौषधी पु्न्हा मूळ घेऊ शकतात.