शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

वनौषधी लागवड; शून्य टक्के प्रतिसाद

By admin | Updated: April 5, 2016 00:51 IST

कृषी विभाग : जिल्ह््यातून एकही प्रस्ताव नाही

रत्नागिरी : कृषी विभागातर्फे गेली तीन वर्षे वनौषधी लागवड योजना राबविण्यात येत आहे. मात्र, या योजनेसाठी जिल्ह््यातून एकही प्रस्ताव शेतकऱ्यांनी पाठविलेला नाही. केंद्र शासनाच्या आयुष विभागातर्फे औषधी वनस्पती लागवडीसाठी करोडो रूपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. लागवडीची पध्दत व उपलब्ध बाजारपेठ याबाबत शेतकरी अनभिज्ञ असल्यामुळे या योजनेला आत्तापर्यंत शून्य टक्के प्रतिसाद लाभला आहे. राष्ट्रीय आयुष अभियान योजनेंतर्गत राज्यात वनौषधी लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. राज्याला ३७३ कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्याची सूचना केंद्र सरकारने केली आहे. सर्व जिल्ह््यांकडून प्राप्त होणाऱ्या आराखड्यानुसार राज्याचा आराखडा तयार होणार आहे. गेल्या तीन वर्षात रत्नागिरी जिल्ह््यात एकाही शेतकऱ्याने वनौषधी लागवडीसाठी प्रस्ताव पाठविलेला नाही. त्यामुळे जिल्ह््याचा अद्याप आराखडाच तयार केलेला नाही. भाजप शासनाने वनौषधी लागवडीवर विशेष भर दिला आहे. परंतु, जिल्ह््यात कोणत्या प्रकारची वनौषधी लागवड केली जावू शकते, याबद्दल शेतकरी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविली आहे. वास्तविक कोणतीही योजना राबवित असताना शासनाने दिलेल्या निकषांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. शासनाच्या निकषाप्रमाणे या योजनेसाठी घालण्यात आलेली जागेची, बाजारपेठेची अट शेतकऱ्यांना जाचक ठरत आहे. उत्पादित वनौषधींची विक्री नेमकी कोणाला करायची, वनौषधी उत्पादनामुळे शेतकऱ्यांना नेमका किती नफा होईल याबाबतही शेतकऱ्यांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या योजनेप्रमाणे ५४ प्रकारच्या वनौषधींची लागवड केली जावू शकते. दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठ व खासगी वनौषधी रोपवाटिकांमधून शेतकऱ्यांना रोपे उपलब्ध करून दिली जावू शकतात. त्यामुळे या योजनेंतर्गत वनौषधी लागवड करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी) जागृतीच नाही : शेतकरी अनभिज्ञच वनौषधीच्या लागवडीसाठी शासनाकडून योजना तयार करण्यात आली. मात्र, ही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलीच नाही. अनेक शेतकऱ्यांना योजनेची माहितीच नसल्याने प्रतिसाद कमी मिळाला आहे. लागवडीला चालना राज्याला ३७२ कोटींचा आराखडा तयार करण्याची सूचना केंद्र सरकारने केली आहे. या निधीतून अनेक वनौषधी पु्न्हा मूळ घेऊ शकतात.