शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

मुंबईच्या श्वान-मांजरांना हवंय दही -दूध-लोणी; क्वारंटाईन केलेल्या लोकांची मिजास भारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 18:36 IST

मुंबईमधून येताना या क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांनी स्वत: सोबत त्यांनी पाळलेले श्वान, मांजरी देखील आणली आहेत. या क्वारंटाईन लोकांच्या खाण्या-पिण्या सोबतच या श्वान व मांजराच्या खाण्यापिण्याची मिजास अधिकाऱ्यांना पुरवावी लागत आहे.

राजापूर : तालुक्यातील रायपाटण येथील क्वारंटाईन केलेल्या लोकांपेक्षा त्यांनी मुंबईतून सोबत आणलेल्या श्वान, मांजराची मिजास पुरविण्यास प्रशासन अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत. क्वारंटाईन लोकांना सेवा-सुविधा पुरवताना भीक नको पण कुत्रं आवर अशी म्हणण्यायची वेळ आली आहे.रायपाटण येथील शासनाने बांधलेल्या समाज कल्याण वसतिगृहात १००-१५० लोकांना राहण्यास सुयोग्य अत्याधुनिक सोयी-सुविधा अशा व विद्यार्थी वस्तीगृहाची उभारणी केली गेली आहे. गाव-वस्तीपासून दूर असलेल्या पाचल-हरळ सीमेवरील रायपाटणच्या हद्दीत असलेल्या समाज कल्याण वसतिगृहात सुमारे १२५ क्वारंटाईन नागरिक ठेवण्याची व्यवस्था आहे. समाज कल्याण वसतिगृह शासनाने अद्याप ताब्यात घेतलेले नाही. त्यामुळे अद्यापही अपुऱ्या सोई-सुविधा तसेच कोणताही समाज कल्याण वस्तीगृहाचा कर्मचारी कार्यरत नाहीत, प्रशासनाने तूर्तास ही इमारत आहे. त्या स्थितीत ताब्यात घेऊन क्वारंटाईन नागरिकांना आणून ठेवले आहेत.त्याचबरोबर मुंबईमधून येताना या क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांनी स्वत: सोबत त्यांनी पाळलेले श्वान, मांजरी देखील आणली आहेत. या क्वारंटाईन लोकांच्या खाण्या-पिण्या सोबतच या श्वान व मांजराच्या खाण्यापिण्याची मिजास अधिकाऱ्यांना पुरवावी लागत आहे.श्वान-मांजरी आणलेले हे लोक श्वान आणि मांजरांसाठी दही-भाताची ही मागणी करत आहेत. त्यामुळे या पाळीव प्राण्यांची ही मिजास पुरवताना प्रशासन बेजार झाले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcorona virusकोरोना वायरस बातम्या