शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणातील कोसळलेल्या उड्डाणपुलासाठी घेणार तज्ज्ञ एजन्सीची मदत

By संदीप बांद्रे | Updated: November 22, 2023 17:09 IST

दिल्लीतील बैठकीतही निर्णय, पुलाचे काम आणखी लांबणीवर पडणार

संदीप बांद्रे, चिपळूण: मुबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुलाची तज्ज्ञ समितीने चौकशी केल्यानंतर त्याचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे सादर केला आहे. त्यानुसार दिल्ली येथे राष्ट्रीय महामार्ग विभागाची कोसळलेल्या उड्डाणपुलासंदर्भात मंगळवारी प्राथमिक बैठक झाली. कोसळलेल्या उड्डाणपुलाचे गर्डर काढणे आणि लाँचर काढण्याचे काम हे अतिशय अवघड असल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाने यासंदर्भात अशी कामे केलेल्या तज्ज्ञ एजन्सीची मदत घेण्याचे ठरले. त्यामुळे हे काम आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाशिष्ठी पुलाजवळून बहादूरशेखनाका ते प्रांत कार्यालय दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. उड्डाणपुलासाठी आवश्यक ते पिलर उभारल्यानंतर पुलावर गर्डर बसविण्याचे काम सुरू झाले होते. अशातच काम सुरू असताना बहादूरशेखनाका येथे उड्डाणपुलासाठी बसवलेले गर्डर आणि लाँचर कोसळली. त्यावर शासनाने तज्ञ अधिकाऱ्यांची चौकशी समिती नियुक्त केली. या समितीने पाहणी केल्यानंतर त्याचा अहवाल केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे सादर केला आहे. त्यानुसार दिल्ली येथे मंगळवारी प्राथमिक बैठक घेण्यात आली. उड्डाणपुलाचे गर्डर हटवणे आणि लाँचर काढण्याचे काम अत्यंत जोखमीचे आहे. त्यामुळे अशी कामे केलेल्या एजन्सीची अथवा संस्थेची मदत देखील घेण्याचे बैठकीत ठरवण्यात आले.

उड्डाणपुलाचे दोन्ही बाजूने गर्डर बसवण्याचे काम करता येते. यासाठी ईगल कंपनीने आणखी एख लाँचर देखील आणला आहे. मात्र काम सुरू असताना जोडलेले गर्डर कोसळले. त्यामुळे गर्डर जोडणीसाठी आणखी उच्च तंत्रज्ञानाची अवलंब करण्याची चाचपणी देखील केली जात आहे. कोसळलेल्या पुलाचे गर्डर हटविण्यासाठी पुढील काही दिवसात आणखी एक संयुक्त बैठक घेतली जाणार आहे. उड्डाणपुलासंदर्भात प्राथमिक बैठक झाली असली, तरी त्यामध्ये गर्डर हटविण्यासाठी अंतिम नियोजन अजूनही झालेले नाही. उड्डाणपुलाच्या दुर्घटनेस महिनाभराचा कालावधी उलटला तरी गर्डर हटवण्या संदर्भातील आराखडा तयार झालेला नाही. तज्ज्ञ एजन्सीची मदत घ्यावी लागणार असल्याने उड्डाणपुलाच्या कामास आणखी विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दोन मीटरच्या सर्व्हिस रोडचेही काम थांबले

उड्डाण पुलाच्या दुर्घटनेनंतर तेथील परिसर लोखंडी पत्रे उभारून बंदिस्त केला आहे. त्यामुळे तेथील रस्ता अरुंद झाला आहे. शिवाय सर्व्हिस रोड अरुंद असल्याने वाहतुकदारांची नियमित गैरसोय होत आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत चर्चा केल्यानंतर उड्डाण पुलाच्या हद्दीत दोन मीटरने सर्व्हिस रोड वाढविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु अद्याप या कामाला सुरुवात झालेली नाही.  त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागासह ठेकेदार कंपनीच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Chiplunचिपळुण