शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

चिपळुणातील कोसळलेल्या उड्डाणपुलासाठी घेणार तज्ज्ञ एजन्सीची मदत

By संदीप बांद्रे | Updated: November 22, 2023 17:09 IST

दिल्लीतील बैठकीतही निर्णय, पुलाचे काम आणखी लांबणीवर पडणार

संदीप बांद्रे, चिपळूण: मुबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुलाची तज्ज्ञ समितीने चौकशी केल्यानंतर त्याचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे सादर केला आहे. त्यानुसार दिल्ली येथे राष्ट्रीय महामार्ग विभागाची कोसळलेल्या उड्डाणपुलासंदर्भात मंगळवारी प्राथमिक बैठक झाली. कोसळलेल्या उड्डाणपुलाचे गर्डर काढणे आणि लाँचर काढण्याचे काम हे अतिशय अवघड असल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाने यासंदर्भात अशी कामे केलेल्या तज्ज्ञ एजन्सीची मदत घेण्याचे ठरले. त्यामुळे हे काम आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाशिष्ठी पुलाजवळून बहादूरशेखनाका ते प्रांत कार्यालय दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. उड्डाणपुलासाठी आवश्यक ते पिलर उभारल्यानंतर पुलावर गर्डर बसविण्याचे काम सुरू झाले होते. अशातच काम सुरू असताना बहादूरशेखनाका येथे उड्डाणपुलासाठी बसवलेले गर्डर आणि लाँचर कोसळली. त्यावर शासनाने तज्ञ अधिकाऱ्यांची चौकशी समिती नियुक्त केली. या समितीने पाहणी केल्यानंतर त्याचा अहवाल केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे सादर केला आहे. त्यानुसार दिल्ली येथे मंगळवारी प्राथमिक बैठक घेण्यात आली. उड्डाणपुलाचे गर्डर हटवणे आणि लाँचर काढण्याचे काम अत्यंत जोखमीचे आहे. त्यामुळे अशी कामे केलेल्या एजन्सीची अथवा संस्थेची मदत देखील घेण्याचे बैठकीत ठरवण्यात आले.

उड्डाणपुलाचे दोन्ही बाजूने गर्डर बसवण्याचे काम करता येते. यासाठी ईगल कंपनीने आणखी एख लाँचर देखील आणला आहे. मात्र काम सुरू असताना जोडलेले गर्डर कोसळले. त्यामुळे गर्डर जोडणीसाठी आणखी उच्च तंत्रज्ञानाची अवलंब करण्याची चाचपणी देखील केली जात आहे. कोसळलेल्या पुलाचे गर्डर हटविण्यासाठी पुढील काही दिवसात आणखी एक संयुक्त बैठक घेतली जाणार आहे. उड्डाणपुलासंदर्भात प्राथमिक बैठक झाली असली, तरी त्यामध्ये गर्डर हटविण्यासाठी अंतिम नियोजन अजूनही झालेले नाही. उड्डाणपुलाच्या दुर्घटनेस महिनाभराचा कालावधी उलटला तरी गर्डर हटवण्या संदर्भातील आराखडा तयार झालेला नाही. तज्ज्ञ एजन्सीची मदत घ्यावी लागणार असल्याने उड्डाणपुलाच्या कामास आणखी विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दोन मीटरच्या सर्व्हिस रोडचेही काम थांबले

उड्डाण पुलाच्या दुर्घटनेनंतर तेथील परिसर लोखंडी पत्रे उभारून बंदिस्त केला आहे. त्यामुळे तेथील रस्ता अरुंद झाला आहे. शिवाय सर्व्हिस रोड अरुंद असल्याने वाहतुकदारांची नियमित गैरसोय होत आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत चर्चा केल्यानंतर उड्डाण पुलाच्या हद्दीत दोन मीटरने सर्व्हिस रोड वाढविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु अद्याप या कामाला सुरुवात झालेली नाही.  त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागासह ठेकेदार कंपनीच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Chiplunचिपळुण