शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

मोठी वित्तहानी करून पावसाची रजा

By admin | Updated: September 25, 2016 23:01 IST

खेडमध्ये जनजीवन हळूहळू पूर्वपदावर : स्वच्छतेचे काम सुरु; मुंबई-गोवा महामार्ग ठप्पच

रत्नागिरी : गेल्या दहा दिवसात अक्षरश: जिल्ह्याला झोडपून काढणाऱ्या पावसाने रविवारी सकाळपासून विश्रांती घेतल्याने नागरिकांना हायसे वाटले आहे. अतिवृष्टीने जिल्ह्याच्या अनेक भागात मोठी वित्तहानी झाली असून, खेड तालुक्यासह जिल्ह्यातील अन्य भागातील पूर ओसरू लागला आहे. त्यामुळे आता जिल्हावासी सावरू लागले आहेत. मात्र, शेतीचे मोठे नुकसान झाल्याने ओल्या दुष्काळाची भीती निर्माण झाली आहे. गणेशोत्सवाचे पहिले ९ दिवस अधूनमधून लागणाऱ्या पावसामुळे उत्सवप्रेमींमध्येही समाधान होते. मात्र, त्यानंतर पावसाने जिल्ह्यावर संततधार धरली होती. मात्र, हा पाऊस जोराचा नव्हता. परंतु, गेल्या चार दिवसांत जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. चिपळूण व खेड तालुक्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी भरले. चिपळूण शहरातही पाणी भरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, शनिवार दुपारनंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्याने चिपळूणमधील पुराचे संकट दूर झाले. खेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी भरल्याने त्या गावांकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक बंद होती. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणाशी या गावांचा संपर्क तुटला होता. मात्र, रविवारी पावसाने जिल्ह्यात बऱ्यापैकी विश्रांती घेतली. काही ठिकाणी किरकोळ स्वरुपाची रिमझिम झाली. पावसाच्या विश्रांतीमुळे नदी, नाल्यांना आलेला पूर ओसरू लागला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये समाधानाचे वातावरण असून, जिल्हा आता या संकटातून सावरू लागला आहे. (प्रतिनिधी) ४तब्बल नऊ दिवसानंतर अथक बरसणाऱ्या पावसाची विश्रांती. नागरिकांनी सोडला नि:श्वास. खेड तालुक्याला सर्वाधिक फटका. खेडसह चिपळूणमधील जनजीवन पूर्वपदावर. जिल्ह््यात शेतीचे मोठे नुकसान. ओला दुष्काळ पडण्याची भीती. चिपळूण, खेडमध्ये अनेक ठिकाणी भरलेले पाणी ओसरले. खेडमध्ये ग्रामीण भागातील अनेक रस्ते वाहून गेले. बस पडल्या अडकून. नद्या, नाल्यांना आलेला पूर ओसरला. नुकसानीचे पंचनामे सुरु.