शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

मोठी वित्तहानी करून पावसाची रजा

By admin | Updated: September 25, 2016 23:01 IST

खेडमध्ये जनजीवन हळूहळू पूर्वपदावर : स्वच्छतेचे काम सुरु; मुंबई-गोवा महामार्ग ठप्पच

रत्नागिरी : गेल्या दहा दिवसात अक्षरश: जिल्ह्याला झोडपून काढणाऱ्या पावसाने रविवारी सकाळपासून विश्रांती घेतल्याने नागरिकांना हायसे वाटले आहे. अतिवृष्टीने जिल्ह्याच्या अनेक भागात मोठी वित्तहानी झाली असून, खेड तालुक्यासह जिल्ह्यातील अन्य भागातील पूर ओसरू लागला आहे. त्यामुळे आता जिल्हावासी सावरू लागले आहेत. मात्र, शेतीचे मोठे नुकसान झाल्याने ओल्या दुष्काळाची भीती निर्माण झाली आहे. गणेशोत्सवाचे पहिले ९ दिवस अधूनमधून लागणाऱ्या पावसामुळे उत्सवप्रेमींमध्येही समाधान होते. मात्र, त्यानंतर पावसाने जिल्ह्यावर संततधार धरली होती. मात्र, हा पाऊस जोराचा नव्हता. परंतु, गेल्या चार दिवसांत जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. चिपळूण व खेड तालुक्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी भरले. चिपळूण शहरातही पाणी भरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, शनिवार दुपारनंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्याने चिपळूणमधील पुराचे संकट दूर झाले. खेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी भरल्याने त्या गावांकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक बंद होती. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणाशी या गावांचा संपर्क तुटला होता. मात्र, रविवारी पावसाने जिल्ह्यात बऱ्यापैकी विश्रांती घेतली. काही ठिकाणी किरकोळ स्वरुपाची रिमझिम झाली. पावसाच्या विश्रांतीमुळे नदी, नाल्यांना आलेला पूर ओसरू लागला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये समाधानाचे वातावरण असून, जिल्हा आता या संकटातून सावरू लागला आहे. (प्रतिनिधी) ४तब्बल नऊ दिवसानंतर अथक बरसणाऱ्या पावसाची विश्रांती. नागरिकांनी सोडला नि:श्वास. खेड तालुक्याला सर्वाधिक फटका. खेडसह चिपळूणमधील जनजीवन पूर्वपदावर. जिल्ह््यात शेतीचे मोठे नुकसान. ओला दुष्काळ पडण्याची भीती. चिपळूण, खेडमध्ये अनेक ठिकाणी भरलेले पाणी ओसरले. खेडमध्ये ग्रामीण भागातील अनेक रस्ते वाहून गेले. बस पडल्या अडकून. नद्या, नाल्यांना आलेला पूर ओसरला. नुकसानीचे पंचनामे सुरु.