शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

जिल्ह्यात वादळी पावसाचा जोर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:22 IST

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पावसाने सुरूवात केली आहे. बुधवारपासून वादळी वाऱ्याला सुरूवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ...

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पावसाने सुरूवात केली आहे. बुधवारपासून वादळी वाऱ्याला सुरूवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरे, गोठे यांच्या पडझडीला सुरूवात झाली असून, दरड कोसळण्याचे प्रकार वाढले आहेत. खेड तालुक्यातील जगबुडी आणि राजापूर तालुक्यातील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात ६९७.२० मिलिमीटर (सरासरी ८३.४४ मिलिमीटर) पावसाची नोंद झाली आहे. खेड तालुक्यात सर्वाधिक १६५ मिलिमीटर तर त्याखालोखाल संगमेश्वर तालुक्यात १०९.२० मिलिमीटर पाऊस पडला आहे.

जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार, दापोली तालुक्यात हर्णै येथील रफीक अहवास बुरोंडकर यांच्या घरावर नारळाचे झाड पडले आहे. पिचकोळी येथे निर्मल कुळये यांच्या घराचे अंशत: ५७ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले. सालदुरे येथील सुरेश खेडेकर यांच्या घराचे अंशत: १ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले. आसूद येथे अर्जुन रांगले यांच्या घराशेजारील दगडी संरक्षक भिंत कोसळून अंशत: १५ हजार रुपयांचे नुकसान झाले. राजापूर येथे मारुती मोकल यांच्या घराचे पावसामुळे अंशत: ४ हजार रुपयांचे नुकसान झाले. पिचकोळी येथे नारायण चौगुले यांच्या घराचे अंशत: ७ हजार ५०० रूपयांचे नुकसान झाले. पाजपंढरी येथे बाळकृष्ण दोरकुळकर यांच्या घराचे अंशत: २ हजार रुपयांचे नुकसान झाले. पाजपंढरी येथे मुरुडकर यांच्या घराचे अंशत: ४९ हजार रुपयांचे नुकसान झाले तसेच पांडुरंग दोरखुडकर यांच्या घराचे अंशत: ७ हजार रुपयांचे नुकसान झाले. हर्णै येथे बिलाल अश्रफ मेमन यांच्या दुकानाचे अंशत: ४७ हजार ९०० रुपयांचे नुकसान झाले.

चिपळूण तालुक्यात आरे-वाली-पिंपळघर येथील रस्त्यावर दरड कोसळली होती. अंदाजे ३५ हजार रुपये नुकसान झाले आहे. चिखली - कारळ पांगारी येथील रस्त्यावर दरड कोसळली होती. अंदाजे १८ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हलवून वाहतूक सुरळीत केली. कळकवणे - आतले रस्ता येथे आंब्याचे झाड पडल्याने व पुलाच्या बाजूचा रस्ता खचलेला असल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे. झाड काढण्याचे काम सुरु आहे.

संगमेश्वर तालुक्यात आरवली - शिंदेवाडी येथे रस्त्यावर दरड कोसळून रस्ता बंद झाला होता. रत्नागिरी तालुक्यात निवळी घाट येथे रस्त्यावर रात्री दरड कोसळून रस्ता बंद झाला होता. ही दरड बाजू करण्याचे काम सुरू असून, पालीमार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. राजापूर तालुक्यात कौजे मागरे सडेवाडी येथे सुभाष शिवगण यांच्या घराचे पत्रे उडून घरात शिरल्याने धान्याचे नुकसान झाले.

बुधवारी रात्रीपासून जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू होता. गुरूवारी सकाळीही जोर कायम होता. दुपारनंतर काही काळ पावसाने उघडीप दिली. मात्र, रात्री पुन्हा जोर वाढण्याची शक्यता वाटत होती.