शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

मुसळधार पावसाचा तळवडे गावाला सर्वाधिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:33 IST

पाचल : मुसळधार पावसाचा जोरदार फटका राजापूर तालुक्यातील तळवडे गावाला बसला असून, शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज ...

पाचल : मुसळधार पावसाचा जोरदार फटका राजापूर तालुक्यातील तळवडे गावाला बसला असून, शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, सुदैवाने कुठेही जीवितहानी झालेली नाही. गावातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश गुडेकर यांनी राजापूरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे यांना या नुकसानाची महिती दिली. त्यानंतर तहसीलदार प्रतिभा वराळे, गटविकास आधिकारी सागर पाटील, मंडल अधिकारी गजानन राईन, तलाठी विकास भंडारी यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानाची पाहणी केली व आपद्ग्रस्तांना धीर दिला.

मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे अर्जुना नदीला प्रचंड पूर आला होता. या पुराचे पाणी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बाजावाडीतील अरुण प्रभुदेसाई यांच्या घरात व गोठ्यात शिरले. पाण्याचा प्रचंड प्रवाह घरात शिरत असल्याने त्यांनी आपले कुटंब ग्रामपंचायत सभागृहामध्ये स्थलांतरित केले. गोठ्यातील म्हशी बाहेर काढत असताना त्यातील एक म्हैस दाव्यासहित नदीच्या दिशेने पळाली व पुरात वाहून गेली. या म्हशीची आजच्या बाजारभावाप्रमाणे सुमारे ५० हजार रूपये किंमत आहे. या म्हशीबरोबरच त्यांनी वर्षाची बेगमी करून ठेवलेल्या दोन गवताच्या गंजी (वैरण) वाहून गेल्या. अरूण प्रभुदेसाई यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

इंजनवाडीतील शेतकरी संतोष मसूरकर यांची नदीकाठी असलेली पाच एकरवरची भातशेती वाहून जाऊन त्या जागेवर गाळ व दगडांचा खच पडला आहे. शासनाने त्यांच्या शेतीला संरक्षक भिंत बांधून देण्याच्या लाेंढ्यामुळे ब्राह्मणदेव येथील शेतकरी बाबाजी गोरे व गणेश अनंत कोलते यांच्या घरातील साहित्य वाहून गेले. मोरेवाडीतील राधिका राजाराम चव्हाण यांचे घर जमीनदोस्त झाले आहे. राववाडी येथे सुरेश गुडेकर यांच्या जुन्या घरामागील दरड (घळण) ओढ्यात कोसळल्याने येथील पाच एकर मातीत गाडली गेली आहे. बाजारवाडीतील दिलीप साळवी यांचे नदीकाठचे भातशेत वाहून गेले आहे. एकंदरीत या मुसळधार पावसाने मोठा दणका तळवडे गावाला दिला असून, शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी सरपंच प्रदीप प्रभुदेसाई, आप्पा साळवी, शैलेश साळवी, संजय कदम यांनी केली आहे.