शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

मुसळधार पावसाचा तळवडे गावाला सर्वाधिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:33 IST

पाचल : मुसळधार पावसाचा जोरदार फटका राजापूर तालुक्यातील तळवडे गावाला बसला असून, शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज ...

पाचल : मुसळधार पावसाचा जोरदार फटका राजापूर तालुक्यातील तळवडे गावाला बसला असून, शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, सुदैवाने कुठेही जीवितहानी झालेली नाही. गावातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश गुडेकर यांनी राजापूरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे यांना या नुकसानाची महिती दिली. त्यानंतर तहसीलदार प्रतिभा वराळे, गटविकास आधिकारी सागर पाटील, मंडल अधिकारी गजानन राईन, तलाठी विकास भंडारी यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानाची पाहणी केली व आपद्ग्रस्तांना धीर दिला.

मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे अर्जुना नदीला प्रचंड पूर आला होता. या पुराचे पाणी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बाजावाडीतील अरुण प्रभुदेसाई यांच्या घरात व गोठ्यात शिरले. पाण्याचा प्रचंड प्रवाह घरात शिरत असल्याने त्यांनी आपले कुटंब ग्रामपंचायत सभागृहामध्ये स्थलांतरित केले. गोठ्यातील म्हशी बाहेर काढत असताना त्यातील एक म्हैस दाव्यासहित नदीच्या दिशेने पळाली व पुरात वाहून गेली. या म्हशीची आजच्या बाजारभावाप्रमाणे सुमारे ५० हजार रूपये किंमत आहे. या म्हशीबरोबरच त्यांनी वर्षाची बेगमी करून ठेवलेल्या दोन गवताच्या गंजी (वैरण) वाहून गेल्या. अरूण प्रभुदेसाई यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

इंजनवाडीतील शेतकरी संतोष मसूरकर यांची नदीकाठी असलेली पाच एकरवरची भातशेती वाहून जाऊन त्या जागेवर गाळ व दगडांचा खच पडला आहे. शासनाने त्यांच्या शेतीला संरक्षक भिंत बांधून देण्याच्या लाेंढ्यामुळे ब्राह्मणदेव येथील शेतकरी बाबाजी गोरे व गणेश अनंत कोलते यांच्या घरातील साहित्य वाहून गेले. मोरेवाडीतील राधिका राजाराम चव्हाण यांचे घर जमीनदोस्त झाले आहे. राववाडी येथे सुरेश गुडेकर यांच्या जुन्या घरामागील दरड (घळण) ओढ्यात कोसळल्याने येथील पाच एकर मातीत गाडली गेली आहे. बाजारवाडीतील दिलीप साळवी यांचे नदीकाठचे भातशेत वाहून गेले आहे. एकंदरीत या मुसळधार पावसाने मोठा दणका तळवडे गावाला दिला असून, शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी सरपंच प्रदीप प्रभुदेसाई, आप्पा साळवी, शैलेश साळवी, संजय कदम यांनी केली आहे.