शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

मुसळधार पावसाने रत्नागिरीत पडझड

By admin | Updated: July 15, 2014 23:45 IST

नवीन भाजीमार्केट इमारतीला धोका

रत्नागिरी : रत्नागिरी शहरासह तालुक्यातील विविध भागांना आज (मंगळवार) मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला. त्यामुळे शहरातील अनेक भागांत पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शहरातील मिरकरवाडा येथे घराची, तर मच्छिमार्केटजवळ खान कॉम्प्लेक्सची संरक्षक भिंत कोसळली. शहर बाजारपेठेतील नवीन भाजी मार्केट इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला, तर मुरुगवाडा येथील लिलाधर नागवेकर, मनोज नागवेकर यांच्या घरात पावसाचे साचलेले पाणी शिरले. गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून, नद्या नाले भरून वाहात आहेत. मात्र, आता या अतिवृष्टीमुळे घरांच्या भिंती, संरक्षक भिंती फुगल्याने कोसळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागात पाणी साठले आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरातील मुरुगवाडा येथील मनोज नागवेकर, लीलाधर नागवेकर यांच्या घरात पावसाचे पाणी शिरले आहे. या भागात असलेले गटार चार वर्षांपूर्वी बंद केले गेल्याने पाणी जाण्यास जागाच नाही. त्यामुळे साचलेले पाणी घरात, माजघरात, स्वयंपाक घरात, बाथरुममध्येही शिरले आहे. गेल्या चार दिवसांपासून या समस्येने हे कुटुंबीय त्रस्त झाले आहेत. गटाराची समस्या न सोडवल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा या कुटुंबीयांनी दिला आहे. मिरकरवाडा किल्ला पायथ्याशी असलेल्या निसार दर्वे यांच्या घरासाठी उभारलेली दगडी संरक्षक भिंत आज पावसाच्या तडाख्याने कोसळली. त्यामुळे दर्वे यांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानभरपाई शासनाकडून मिळावी, अशी मागणी दर्वे यांनी केली आहे. ही संरक्षक भिंत कोसळल्याने त्यालगत उंचावर असलेल्या रत्नकांत बावकर यांच्या घराला धोका निर्माण झाला आहे. शहरातील नवीन भाजी मार्केटची इमारत मोडकळीस आली असून, पावसामुळे आज या इमारतीच्या बाहेरील स्लॅबचा काही भाग जमिनीवर कोसळला. त्यावेळी तेथे असलेल्या भाजी दुकानांजवळ कोणीही ग्राहक नव्हते. या इमारतीत भाजी विक्रीचे ३0 गाळे असून, त्यातील २८ गाळे सुरू आहेत. इमारत मोडकळीस आली असून, मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त होत आहे. पालिकेचे या इमारतीकडे दुर्लक्ष आहे.जमीन खचल्याने मच्छी मार्केटजवळील खान कॉम्प्लेक्सच्या संरक्षक भिंतीचा काही भागही मुसळधार पावसाने कोसळला. सायंकाळी उशिरापर्यंत कोसळेली भिंत व माती उचलण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)