शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली, मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात
4
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
5
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
6
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
7
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
8
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
9
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
10
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
11
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
12
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
13
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
14
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
15
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
16
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
17
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
18
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
20
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी

मुसळधार पावसाने रत्नागिरीत पडझड

By admin | Updated: July 15, 2014 23:45 IST

नवीन भाजीमार्केट इमारतीला धोका

रत्नागिरी : रत्नागिरी शहरासह तालुक्यातील विविध भागांना आज (मंगळवार) मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला. त्यामुळे शहरातील अनेक भागांत पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शहरातील मिरकरवाडा येथे घराची, तर मच्छिमार्केटजवळ खान कॉम्प्लेक्सची संरक्षक भिंत कोसळली. शहर बाजारपेठेतील नवीन भाजी मार्केट इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला, तर मुरुगवाडा येथील लिलाधर नागवेकर, मनोज नागवेकर यांच्या घरात पावसाचे साचलेले पाणी शिरले. गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून, नद्या नाले भरून वाहात आहेत. मात्र, आता या अतिवृष्टीमुळे घरांच्या भिंती, संरक्षक भिंती फुगल्याने कोसळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागात पाणी साठले आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरातील मुरुगवाडा येथील मनोज नागवेकर, लीलाधर नागवेकर यांच्या घरात पावसाचे पाणी शिरले आहे. या भागात असलेले गटार चार वर्षांपूर्वी बंद केले गेल्याने पाणी जाण्यास जागाच नाही. त्यामुळे साचलेले पाणी घरात, माजघरात, स्वयंपाक घरात, बाथरुममध्येही शिरले आहे. गेल्या चार दिवसांपासून या समस्येने हे कुटुंबीय त्रस्त झाले आहेत. गटाराची समस्या न सोडवल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा या कुटुंबीयांनी दिला आहे. मिरकरवाडा किल्ला पायथ्याशी असलेल्या निसार दर्वे यांच्या घरासाठी उभारलेली दगडी संरक्षक भिंत आज पावसाच्या तडाख्याने कोसळली. त्यामुळे दर्वे यांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानभरपाई शासनाकडून मिळावी, अशी मागणी दर्वे यांनी केली आहे. ही संरक्षक भिंत कोसळल्याने त्यालगत उंचावर असलेल्या रत्नकांत बावकर यांच्या घराला धोका निर्माण झाला आहे. शहरातील नवीन भाजी मार्केटची इमारत मोडकळीस आली असून, पावसामुळे आज या इमारतीच्या बाहेरील स्लॅबचा काही भाग जमिनीवर कोसळला. त्यावेळी तेथे असलेल्या भाजी दुकानांजवळ कोणीही ग्राहक नव्हते. या इमारतीत भाजी विक्रीचे ३0 गाळे असून, त्यातील २८ गाळे सुरू आहेत. इमारत मोडकळीस आली असून, मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त होत आहे. पालिकेचे या इमारतीकडे दुर्लक्ष आहे.जमीन खचल्याने मच्छी मार्केटजवळील खान कॉम्प्लेक्सच्या संरक्षक भिंतीचा काही भागही मुसळधार पावसाने कोसळला. सायंकाळी उशिरापर्यंत कोसळेली भिंत व माती उचलण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)