शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने रत्नागिरीत पडझड

By admin | Updated: July 15, 2014 23:45 IST

नवीन भाजीमार्केट इमारतीला धोका

रत्नागिरी : रत्नागिरी शहरासह तालुक्यातील विविध भागांना आज (मंगळवार) मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला. त्यामुळे शहरातील अनेक भागांत पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शहरातील मिरकरवाडा येथे घराची, तर मच्छिमार्केटजवळ खान कॉम्प्लेक्सची संरक्षक भिंत कोसळली. शहर बाजारपेठेतील नवीन भाजी मार्केट इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला, तर मुरुगवाडा येथील लिलाधर नागवेकर, मनोज नागवेकर यांच्या घरात पावसाचे साचलेले पाणी शिरले. गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून, नद्या नाले भरून वाहात आहेत. मात्र, आता या अतिवृष्टीमुळे घरांच्या भिंती, संरक्षक भिंती फुगल्याने कोसळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागात पाणी साठले आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरातील मुरुगवाडा येथील मनोज नागवेकर, लीलाधर नागवेकर यांच्या घरात पावसाचे पाणी शिरले आहे. या भागात असलेले गटार चार वर्षांपूर्वी बंद केले गेल्याने पाणी जाण्यास जागाच नाही. त्यामुळे साचलेले पाणी घरात, माजघरात, स्वयंपाक घरात, बाथरुममध्येही शिरले आहे. गेल्या चार दिवसांपासून या समस्येने हे कुटुंबीय त्रस्त झाले आहेत. गटाराची समस्या न सोडवल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा या कुटुंबीयांनी दिला आहे. मिरकरवाडा किल्ला पायथ्याशी असलेल्या निसार दर्वे यांच्या घरासाठी उभारलेली दगडी संरक्षक भिंत आज पावसाच्या तडाख्याने कोसळली. त्यामुळे दर्वे यांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानभरपाई शासनाकडून मिळावी, अशी मागणी दर्वे यांनी केली आहे. ही संरक्षक भिंत कोसळल्याने त्यालगत उंचावर असलेल्या रत्नकांत बावकर यांच्या घराला धोका निर्माण झाला आहे. शहरातील नवीन भाजी मार्केटची इमारत मोडकळीस आली असून, पावसामुळे आज या इमारतीच्या बाहेरील स्लॅबचा काही भाग जमिनीवर कोसळला. त्यावेळी तेथे असलेल्या भाजी दुकानांजवळ कोणीही ग्राहक नव्हते. या इमारतीत भाजी विक्रीचे ३0 गाळे असून, त्यातील २८ गाळे सुरू आहेत. इमारत मोडकळीस आली असून, मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त होत आहे. पालिकेचे या इमारतीकडे दुर्लक्ष आहे.जमीन खचल्याने मच्छी मार्केटजवळील खान कॉम्प्लेक्सच्या संरक्षक भिंतीचा काही भागही मुसळधार पावसाने कोसळला. सायंकाळी उशिरापर्यंत कोसळेली भिंत व माती उचलण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)