शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:21 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर असला तरी सध्या पाऊस सरींवर पडत आहे. अधूनमधून थोडीशी विश्रांती घेत सरी कोसळत आहेत. ...

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर असला तरी सध्या पाऊस सरींवर पडत आहे. अधूनमधून थोडीशी विश्रांती घेत सरी कोसळत आहेत. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत जोरदार पाऊस झाला असून, ३९० मिलिमीटर (सरासरी ४३.३३ मिलिमीटर) एकूण पावसाची नोंद झाली आहे.

जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार, दापोली पाजपंढरी येथे भागवत पावसे यांच्या घराचे अंशत: १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शिरसोली येथील काशिनाथ जाधव यांच्या घराचे अंशत: चार हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले आहे. शिरसोश्वर येथील बाळाराम डेवणकर यांच्या घराचे पावसामुळे तीन हजार ९५० एवढे नुकसान झाले आहे. शिरसोली येथे दिनकर जाधव यांच्या घराचे एक हजार ६०० रुपयांचे नुकसान झाले आहे. शिरसाडी येथील वसंत वाजे यांच्या घराचे अंशत: दोन हजार ८०० रुपये नुकसान झाले आहे. गिम्हवणे येथील चांदणी चंद्रकांत यादव यांच्या घराचे अंशत: आठ हजार ४५० रुपये नुकसान झाले आहे. माटवण येथील सार्वजनिक पाण्याच्या टाकीची एका बाजूकडील संरक्षक भिंत पडून अंशत: चार हजार ५०० रुपये नुकसान झाले आहे.

चिपळूण तालुक्यात कळकवणे-आकणे-तिवरे येथील रस्त्यावर दरड कोसळली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे ती हटविण्याचे काम चालू आहे. पर्यायी आकळे-कादवड-तिवरे रस्ता चालू आहे. टेटव येथील लिंगेश्वर मंदिराची संरक्षक भिंत कोसळल्याने अंशत: २४ हजार रुपये नुकसान झाले आहे. गुहागर तालुक्यात पडवे येथील शमशाद शिरगावकर यांच्या घराचे अंशत: १० हजार रुपये नुकसान झाले आहे. अडूर येथील सुरेश रसाळ यांच्या घराचे अंशत: २५ हजार रुपये नुकसान झाले आहे. पडवे येथील कैसर शिरगाव यांच्या घराचे अंशत: नऊ हजार रुपये नुकसान झाले आहे.

संगमेश्वर तालुक्यात मौजे कुचांबे येथील राजू गोविंद काजवे यांचे घराचे पावसामुळे अंशत: नुकसान झाले आहे. मौजे पांगरी येथील सूर्यकांत सागवेकर यांच्या घराचे पावसामुळे अंशत: पाच हजार ४०० रुपये नुकसान झाले आहे. देवळे बौद्धवाडी येथील सिद्धार्थ पवार यांच्या घराचे अंशत: नुकसान झाले आहे. तुळसणी येथील जलऊदीन अस्ली बोट यांच्या पक्क्या विहिरीचे अंशत: एक लाख ५० हजार रुपये एवढे नुकसान झाले आहे. तुळसणी येथील ग्रामपंचायतीजवळील मोरीचे पावसामुळे कोसळून अंशत: नुकसान झाले आहे. गेल्या २४ तासांत कुठेही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

सध्या पावसाचा जोर असला तरी पावसाची संततधार थांबली आहे. शुक्रवारी दिवसभर पाऊस सरींवर कोसळत होता. या पावसाने तापमान खाली आले असून वातावरणात गारवा आला आहे.