शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:21 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर असला तरी सध्या पाऊस सरींवर पडत आहे. अधूनमधून थोडीशी विश्रांती घेत सरी कोसळत आहेत. ...

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर असला तरी सध्या पाऊस सरींवर पडत आहे. अधूनमधून थोडीशी विश्रांती घेत सरी कोसळत आहेत. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत जोरदार पाऊस झाला असून, ३९० मिलिमीटर (सरासरी ४३.३३ मिलिमीटर) एकूण पावसाची नोंद झाली आहे.

जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार, दापोली पाजपंढरी येथे भागवत पावसे यांच्या घराचे अंशत: १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शिरसोली येथील काशिनाथ जाधव यांच्या घराचे अंशत: चार हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले आहे. शिरसोश्वर येथील बाळाराम डेवणकर यांच्या घराचे पावसामुळे तीन हजार ९५० एवढे नुकसान झाले आहे. शिरसोली येथे दिनकर जाधव यांच्या घराचे एक हजार ६०० रुपयांचे नुकसान झाले आहे. शिरसाडी येथील वसंत वाजे यांच्या घराचे अंशत: दोन हजार ८०० रुपये नुकसान झाले आहे. गिम्हवणे येथील चांदणी चंद्रकांत यादव यांच्या घराचे अंशत: आठ हजार ४५० रुपये नुकसान झाले आहे. माटवण येथील सार्वजनिक पाण्याच्या टाकीची एका बाजूकडील संरक्षक भिंत पडून अंशत: चार हजार ५०० रुपये नुकसान झाले आहे.

चिपळूण तालुक्यात कळकवणे-आकणे-तिवरे येथील रस्त्यावर दरड कोसळली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे ती हटविण्याचे काम चालू आहे. पर्यायी आकळे-कादवड-तिवरे रस्ता चालू आहे. टेटव येथील लिंगेश्वर मंदिराची संरक्षक भिंत कोसळल्याने अंशत: २४ हजार रुपये नुकसान झाले आहे. गुहागर तालुक्यात पडवे येथील शमशाद शिरगावकर यांच्या घराचे अंशत: १० हजार रुपये नुकसान झाले आहे. अडूर येथील सुरेश रसाळ यांच्या घराचे अंशत: २५ हजार रुपये नुकसान झाले आहे. पडवे येथील कैसर शिरगाव यांच्या घराचे अंशत: नऊ हजार रुपये नुकसान झाले आहे.

संगमेश्वर तालुक्यात मौजे कुचांबे येथील राजू गोविंद काजवे यांचे घराचे पावसामुळे अंशत: नुकसान झाले आहे. मौजे पांगरी येथील सूर्यकांत सागवेकर यांच्या घराचे पावसामुळे अंशत: पाच हजार ४०० रुपये नुकसान झाले आहे. देवळे बौद्धवाडी येथील सिद्धार्थ पवार यांच्या घराचे अंशत: नुकसान झाले आहे. तुळसणी येथील जलऊदीन अस्ली बोट यांच्या पक्क्या विहिरीचे अंशत: एक लाख ५० हजार रुपये एवढे नुकसान झाले आहे. तुळसणी येथील ग्रामपंचायतीजवळील मोरीचे पावसामुळे कोसळून अंशत: नुकसान झाले आहे. गेल्या २४ तासांत कुठेही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

सध्या पावसाचा जोर असला तरी पावसाची संततधार थांबली आहे. शुक्रवारी दिवसभर पाऊस सरींवर कोसळत होता. या पावसाने तापमान खाली आले असून वातावरणात गारवा आला आहे.